शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात दूषित पाणी पुरवठ्याविरोधात नागरिकांत संताप; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:04 IST

तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली.

ठळक मुद्दे तासगाव पालिकेत तणाव; पोलिसांंचा लाठीमार

तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली. सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी एकत्रित येत मुख्याधिकाºयांकडे शुध्द पाणी देण्याची मागणी केली. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी आणि नागरिकांत तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करून जमाव पांगवण्यात आला.

शहरातील मार्केट यार्डसमोरील कोळी, जाधव आणि पवार गल्लीत अनेक महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा होत असलेली पाईपलाईन लिकेज असल्यामुळे गटारीतील सांडपाणी या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या गल्लीतील लोकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सहा महिन्यांपूर्वी संबंधित नागरिकांनी पालिकेला याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. चार दिवसांत उपाययोजना न केल्यास पालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पालिकेत निवेदन देण्यासाठी आलेले नागरिक चांगलेच संतप्त झालेले होते. दूषित पाण्याच्या विषयावरून पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि नागरिकांत शाब्दिक चकमक झाली. पालिकेच्या आवारात तणावाचे वातावरण दिसू लागताच, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. मुख्याधिकारी वायकोस यांनी पंधरा दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीwater pollutionजल प्रदूषण