शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच! ; भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:34 IST

बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाºयांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्टÑवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देतासगावच्या जनतेची अपेक्षा : सत्ताधारी-अधिकाऱ्यांमधील वाद उफाळला

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाºयांनीदेखील, भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला. एकमेकांच्या भानगडीमुळे पालिकेतील भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब झाले. आता मुख्याधिकाºयांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता भानगडी चव्हाट्यावर आणाव्यात, अशी मागणी तासगावकरांकडून होत आहे.

तासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकासाची गंगा वाहती ठेवण्याचा प्रयत्न केला. नेमके याच वाहत्या गंगेत सत्ताधा-यांनी हात धुऊन घेण्याचे अनेक कारनामे केले. काही कारभाºयांनी स्वत:च ठेकेदारी सुरु केली. काहींनी ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग केले. जादा दराच्या निविदा, बेकायदा आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाची कामे, अशा एक ना अनेक कामांचा पायंडाच सत्ताधा-यांनी सुरु केला होता.

बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाºयांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्टवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात आले होते. सत्ताधारी आणि अधिकाºयांचा हम करे सो कायदा, याप्रमाणेच कारभार सुरु होता. किंंबहुना अनेक बेकायदा कामे नियमात बसवून करण्याची नामी शक्कल लढवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही ना सत्ताधा-यांनी खदखद केली, ना प्रशासनाने आक्षेप केला. मिळून सारे जण... असाच सर्व रागरंग होता.

मात्र काही महिन्यांपासून पालिकेच्या कारभारात बदल होत होता. तत्कालीन मुख्याधिकाºयांची फ्री हॅन्ड कामाची पध्दत सत्ताधाºयांच्या पथ्थ्यावर पडणारी होती. मात्र नव्याने आलेले मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या कारकीर्दीत नियमांची सांगड घालून काम करण्यास सुरुवात झाली. इथूनच पालिकेच्या कारभाराला कलाटणी मिळाली.गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरु असलेल्या बेलगाम कारभाराला मुख्याधिकारी शिंंदे यांनी लगाम लावला. त्यामुळे कारभा-यांच्या मनमानीला चाप बसला. मुख्याधिकारी जुमानत नाहीत म्हटल्यावर आतापर्यंत सत्ताधा-यांनीच भ्रष्टाचाराविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप केला. या आरोपांच्या फैरींनी संतप्त झालेल्या मुख्याधिकाºयांनी नगरसेवकांना ‘तुमच्या भानगडी बाहेर काढू’ असा सज्जड इशाराच भर सभेत देऊन टाकला.मुख्याधिकाºयांच्या वक्तव्याने पालिकेत भानगडी आहेत, यावर शिक्कामोर्तब झालेच. मुळातच पालिकेचा कारभार भानगडबाज असल्याचे अनेकदा चव्हाट्यावर आले होते. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाचे अंडरस्टॅँडिंग असल्याने या कारभाराची चिरफाड झाली नाही. मात्र मुख्याधिकारी शिंंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच, पालिकेतील स्वच्छतेच्या ठेक्याची बोगस कागदपत्रे बाहेर पडली. त्यापूर्वी अशा बेकायदा कामाचा एकही कागद जनतेसमारे आला नाही.मात्र आता मुख्याधिकारी शिंंदे यांनी चॅलेंज केलेच आहे, तर भानगडी चव्हाट्यावर काढाव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कारभारी असोत अथवा प्रशासनातील अधिकारी असोत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जनतेच्या हितासाठी नगरसेवकांनी अधिकाºयांच्या भानगडी बाहेर काढाव्यात, नाही तर अधिकाºयांनी कारभाºयांच्या भानगडी बाहेर काढाव्यात. नेमक्या भानगडी जनतेसमोर आल्याशिवाय भानगडबाज पालिकेतील नेमक्या भानगडी कोणी केल्या, हे चव्हाट्यावर येणार नाही.

 

  • राज्यात हवा बदलल्याने सदस्य आक्रमक

तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. यापूर्वी राज्यातील सत्तेची सूत्रे भाजपकडेच होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला वरूनच वरदहस्त होता. मात्र आता राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे, नगरपालिकेतही हवाबदल झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी राष्टÑवादीचा आवाज दबला जात होता. मात्र राज्यात सत्तेत आल्याने राष्टÑवादीचे नगरसेवकही चांगलेच आक्रमक झाले आहेत. कदाचित या हवा बदलामुळेच पालिकेत प्रशासनाचा आवाज देखील दबला जात नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकारMuncipal Corporationनगर पालिका