शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’

By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST

पाच डिसेंबरला मुंबईत कार्यशाळा : अण्णा हजारे मार्गदर्शन करणार

सांगली : पाणी, चारा टंचाईतून महाराष्ट्राची मुक्तता करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी दि. ५ डिसेंबर रोजी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सचिवांसह सर्व विभागाचे सचिव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, विभागीय आयुक्तांसह अधिकाऱ्यांना कार्यशाळेस बोलविली आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रात टंचाईची फारशी परिस्थिती नसली तरी मराठवाडा, विदर्भात शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षोन वर्षे टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी काय करावे लागेल, याचा अभ्यास फडणवीस करत आहेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पाणी विषयावर जनजागृतीचे काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श सरपंच पोपटराव पवार आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ‘जलसंधारणातून टंचाईवर कायमस्वरूपी मात’ आणि ‘टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी कृती कार्यक्रम’ या विषयांवर जलसंधारण विभागाचे सचिव मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)