शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाची भाजप सरकारकडून फसवणूक : विश्वनाथ मिरजकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:25 IST

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्देलिंगायत समाजाची भाजप सरकारकडून फसवणूक : विश्वनाथ मिरजकरलोकांनी विचार करून मतदान करावे

सांगली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.सांगलीमध्ये लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य नेते वसंतराव नगरकर आणि विश्वनाथ मिरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून आगामी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबत मागील काही वर्षांपासून मागणी केली जात आहे. त्यासाठी समाजाची चळवळ गेल्या सहा महिन्यात तीव्र करण्यात आली होती. केवळ आरक्षण नको असून राजकीय आरक्षण हवे आहे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. आरक्षणासाठी सरकारविरोधात आंदोलन केले.

हिंदू लिंगायत मधील पोट जातींवर अन्याय होत असून त्यांना आरक्षण मिळत नाही. मात्र सरकारकडून अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे समाजाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.गत आठवड्यात समाजातील एका गटाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते, परंतु निवडणुकीवर बहिष्कार करणे हा पोरकटपणा आहे. त्यामुळे समाजाने निवडणुकीवर बहिष्कार घालू नये. मात्र कोणाला मतदान करायचे हे समाजातील लोकांनी ठरवावे, असे आवाहन मिरजकर यांनी केले.

नाक दाबून धरल्याशिवाय तोड उघडणार नाही. राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघातील निकाल बदलण्याची ताकद लिंगायत समाजामध्ये आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज सरकारला आहे. समाजाला कुणी बाजूला ठेवू नये. आरक्षण मिळेपर्यंत लढाई चालू ठेवली जाईल.

विधानसभा निवडणुकीपर्यंत धरणे, निदर्शने, मोर्चा अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करू, अन्यथा समाजाची ताकद त्या निवडणुकीत दाखवून देण्यात येईल, असा इशाराही यावेळी मिरजकर यांनी दिला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी- पाटील, डॉ. रवींद्र आरळी, प्रदीप वाले, नगरसेवक राजेंद्र कुंभार, मनोहर कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आरळी यांच्याकडे नेतृत्वडॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व लिंगायत समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी जतमधील डॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. समाजाची ताकद ही महत्वाचे आहे. मात्र स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात चालढकल केली जात असल्याचे स्पष्ट झाले. आहे. मात्र संपूर्ण समाज एकत्र करून समाजाची ताकद दाखवून देण्यात येईल, असेही डॉ आरळी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाSangliसांगली