शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

चारुता सागर यांचे साहित्यात वेगळे स्थान

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

विश्वासराव मोरे : मळणगावमध्ये एकदिवसीय साहित्य संमेलन

शिरढोण : ‘नागीण’ कथासंग्रहातील नागीण, अंघोळ या मराठी साहित्यामधील अस्सल वाण कथा वाचत असताना, आजूबाजूला हुबेहूब घडत असल्याचा भास या कथांमध्ये दिसून येतो. उपेक्षितांचे जीवन उलगडून दाखविण्यात चारुता सागर यांचा हातखंडा असायचा. त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या कथांनी मराठी सारस्वतात स्वत:चं वेगळं स्थान पटकावलं आहे, असे मत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे यांनी व्यक्त केले.मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ज्येष्ठ कथाकार व लेखक चारुता सागर यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त एकदिवसीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक, चक्रव्यूह आकृती कादंबरीकार आप्पासाहेब पाटील होते. दत्ताजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.यावेळी प्राध्यापक अनिल पाटील यांनी ‘हराळी’ ही गवतावर आधारित कविता सादर केली, तर प्रा. विजय जाधव यांनी कथा सादर केली. चारुता सागर यांच्या कथेचे अभिवाचन दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले, तर संयोजन राजेंद्र भोसले, अनिल कुंभार, राजेंद्र साळुंखे यांनी केले.या साहित्य संमेलनामध्ये ‘नागीण, मामाचा वाडा, नदीपार’ आदी कथासंग्रहांचे वाचन करण्यात आले. साहित्यरसिकांच्या मनात राज्य करणारे ज्येष्ठ कथाकार व कसदार लेखन करणारे चारुता सागर यांच्या कथा ऐकून उपस्थित भारावून गेले होते.यावेळी सरपंच रमेश भोसले, अविराजे शिंदे, धनाजी पाटील, दिग्विजय शिंदे, भालचंद्र क्षीरसागर, माजी सरपंच जगन्नाथ चव्हाण, उध्दव पाटील, राजाराम पाटील, राजेंद्र भोसले, दत्ताजीराव शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चारुता सागर साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मळणगाव यांनी केले. (वार्ताहर)