शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

लाडेगावचा ‘चंदूभाई एमबीबीएस’

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत : दारू सोडविण्याचा धंदा बारा वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरु--आॅन द स्पॉट रिपोर्टिंग

युनूस शेख - इस्लामपूर--शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत. वैद्यकीय पदवी आणि परवान्याचा प्रश्नच नाही. फक्त वडिलांचा व्यवसाय म्हणून वारसा हक्काने सुरु असलेला हा दारू सोडविण्याचा धंदा गेल्या १0-१२ वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरु होता. मात्र आटपाडीजवळच्या घरनिकीमधील एकाचा बळी गेला अन् वाळवा तालुक्यातील लाडेगाव फाट्याजवळ सुरू असलेला हा प्रकार उजेडात आला. जंगलातील झाडपाला आणि बावडेकरांची आयुर्वेदिक भुकटी देऊन दारू सोडविण्याच्या या गोरखधंद्याची कथा डोळे पांढरे करायला लावणारी आहे.चंद्रकांत जिनू नाईक-मदने (वय ५५, रा. लाडेगाव, ता. वाळवा) असे या तथाकथित, अघोषित वैदूचे नाव. लाडेगाव फाट्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या डाव्या बाजूला ५ ते ६ गुंठे जागेतील घर. वाहने लावायला ऐसपैस जागा. मुख्य रस्त्यावरुन दोन वळणे घेत आत गेले की, बाहेर कशाचाही मागमूस रहात नाही, अशी इथली व्यवस्था. ना इथे औषध देण्यासंबंधीचा फलक, ना की जाहिरातबाजी. तरी प्रसिध्दी मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यापर्यंत पसरलेली. पण दारू सोडविण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून झालेली अख्यायिका एका रात्रीत दंतकथा बनून गेली.चंद्रकांत नाईक यांचे वडील जिनू नाईक यांचा हा पारंपरिक व्यवसाय. सांधेदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, पित्त, मूळव्याध, दारूचे व्यसन अशा नानाविध विकारांवर आपल्या बटव्यातून मिळेल तो झाडपाला देऊन रुग्णाला विकारापासून मुक्ती द्यायची, हा त्यांचा नामी फंडा. बाहेरवसा उतरवणे, तंत्र-मंत्राने दोरा देऊन येणाऱ्या प्रत्येकाला व्याधिमुक्त करण्यात त्यांचा हातखंडा होता, अशी या परिसरातील ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती. त्यांच्या निधनानंतर हा वारसा चंद्रकांत नाईक यांनी पुढे सुरु ठेवला आहे.एकूणच वैद्यकीय विश्वाला आव्हान देणारा आणि माणसांची डोकी सुन्न करणारा नाईक यांचा हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु होता. प्रत्येकाकडून २५० रुपयांची आकारणी, त्याची वहीमध्ये नोंद. त्यानंतर औषध देणे, अशी त्यांची पध्दत. पोलिसांनी काल रात्री तेथे छापा मारुन नाईकांचे सगळे रेकॉर्ड, झाडपाला, आयुर्वेदिक गोळ्या, भुकट्या आदी ताब्यात घेतले. त्यांच्या दफ्तरात दारू सोडवणे, मूळव्याध अशा व्याधींवर औषध घेतलेल्या ५0 ते ६0 पोलिसांचीही नावे आहेत. नाईकांच्या या व्यवसायाबाबत तक्रार नसल्याने सगळाच मामला खुशीचा असल्याने, कारवाईचा प्रश्न आला नाही.एखाद्या पदवीप्राप्त डॉक्टरचा व्यवसाय फिका पडेल, अशी चंद्रकांत नाईकांची ख्याती होती. रोज किमान २0 ते २५ व्यक्ती दारू सोडविण्याचे औषध घेऊन जात होत्या. म्हणजे नाईकांची रोजची मिळकत किमान ५ ते ७ हजारांची होती. नाईकांचे दारू सोडवायचे औषधही दारूच्या बाटलीतूनच दिले जायचे. (कारण काय, तर औषध घेणाऱ्याला ती दारुच आहे असे वाटावे.) हे औषध घेतले की उलट्या होतात. त्यातून शरीरातील अल्कोहोल बाहेर पडते. पोटाचा कोटा साफ होतो आणि त्यानंतर त्या माणसाला दारू पिण्याची इच्छा होत नाही, हा या धंद्याचा साधा सरळ सिध्दांत. नाईक सांधेदुखीवरही विविध प्रकारचे तेलही देतात अन् स्वत: मसाजही करतात. आतापर्यंत त्यांच्या या धंद्याविषयी कधी तक्रार आली नाही. मात्र काल घरनिकीच्या एकाचा बळी गेला अन् ८ जण तडफडले. त्यातून मग या गोरखधंद्याची चाहूल पोलिसांना लागली. घटनेचे गांभीर्य आणि मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनाचा धसका घेत पोलिसांनी रातोरात चंद्रकांत नाईकांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.आम्ही काय खून तर केला नाय..!ही घटना घडल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने थेट घटनास्थळाला भेट देत नाईक कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी ते निर्विकारपणे बोलत होते. वडिलांपासून हा व्यवसाय सुरु आहे. आता मुलगा चालवतोय. कधी कुणाची तक्रार नाही. मात्र कालच्या घटनेत जाणारा त्याच्या कर्माने गेला. मात्र फळाला आमच्या आलं. आमच्याकडे व्यवसायाचा परवाना नाही, एवढीच आमची चूक होईल. त्रास जरा आता सोसायचा. नाही तर आम्ही काय खून केलाय का? अशा शब्दात नाईक कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.माणसं तशी साधी, सरळ..!हा व्यवसाय करताना आपण काही चुकीचे करतोय, याचा लवलेशही या कुटुंबाला नाही. शिक्षणच जेमतेम असल्याने कायद्याबाबत काही माहितीच नाही. वडिलांचाच व्यवसाय करतोय, कित्येक जणांना त्याचा लाभ होतोय, हीच या कुटुंबाची साधी भावना. मात्र लक्ष्मण मानेंच्या मृत्यूने त्यांच्या या व्यवसायावरच बालंट आले. चंद्रकांत नाईक याला अटक केल्याची बातमी थडकताच आज सकाळपासून ग्रामस्थांनी तेथे रीघ लावली होती. प्रत्येकजण विचारपूस करीत होता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य त्यांना जाणवलेच नव्हते.२५0 रुपयांत मरण..!चंद्रकांत नाईक याचा दारू सोडविण्यावर औषध म्हणून झाडपाला आणि आयुर्वेदिक गोळ्या, भुकटी देण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याच्या व्यवसायाची व्याप्ती अन् प्रसिध्दीही मोठी होती. मात्र लक्ष्मण माने यांच्या मृत्यूने त्याच्या व्यवसायाची धूळदाण उडाली. दारु सोडण्याच्या इच्छेने आलेल्या लक्ष्मण माने याच्या वाट्याला मात्र केवळ २५0 रुपयांत मरण आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच नाईकांचा व्यवसायही अडचणीत आला.