शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

लाडेगावचा ‘चंदूभाई एमबीबीएस’

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत : दारू सोडविण्याचा धंदा बारा वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरु--आॅन द स्पॉट रिपोर्टिंग

युनूस शेख - इस्लामपूर--शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत. वैद्यकीय पदवी आणि परवान्याचा प्रश्नच नाही. फक्त वडिलांचा व्यवसाय म्हणून वारसा हक्काने सुरु असलेला हा दारू सोडविण्याचा धंदा गेल्या १0-१२ वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरु होता. मात्र आटपाडीजवळच्या घरनिकीमधील एकाचा बळी गेला अन् वाळवा तालुक्यातील लाडेगाव फाट्याजवळ सुरू असलेला हा प्रकार उजेडात आला. जंगलातील झाडपाला आणि बावडेकरांची आयुर्वेदिक भुकटी देऊन दारू सोडविण्याच्या या गोरखधंद्याची कथा डोळे पांढरे करायला लावणारी आहे.चंद्रकांत जिनू नाईक-मदने (वय ५५, रा. लाडेगाव, ता. वाळवा) असे या तथाकथित, अघोषित वैदूचे नाव. लाडेगाव फाट्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या डाव्या बाजूला ५ ते ६ गुंठे जागेतील घर. वाहने लावायला ऐसपैस जागा. मुख्य रस्त्यावरुन दोन वळणे घेत आत गेले की, बाहेर कशाचाही मागमूस रहात नाही, अशी इथली व्यवस्था. ना इथे औषध देण्यासंबंधीचा फलक, ना की जाहिरातबाजी. तरी प्रसिध्दी मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यापर्यंत पसरलेली. पण दारू सोडविण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून झालेली अख्यायिका एका रात्रीत दंतकथा बनून गेली.चंद्रकांत नाईक यांचे वडील जिनू नाईक यांचा हा पारंपरिक व्यवसाय. सांधेदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, पित्त, मूळव्याध, दारूचे व्यसन अशा नानाविध विकारांवर आपल्या बटव्यातून मिळेल तो झाडपाला देऊन रुग्णाला विकारापासून मुक्ती द्यायची, हा त्यांचा नामी फंडा. बाहेरवसा उतरवणे, तंत्र-मंत्राने दोरा देऊन येणाऱ्या प्रत्येकाला व्याधिमुक्त करण्यात त्यांचा हातखंडा होता, अशी या परिसरातील ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती. त्यांच्या निधनानंतर हा वारसा चंद्रकांत नाईक यांनी पुढे सुरु ठेवला आहे.एकूणच वैद्यकीय विश्वाला आव्हान देणारा आणि माणसांची डोकी सुन्न करणारा नाईक यांचा हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु होता. प्रत्येकाकडून २५० रुपयांची आकारणी, त्याची वहीमध्ये नोंद. त्यानंतर औषध देणे, अशी त्यांची पध्दत. पोलिसांनी काल रात्री तेथे छापा मारुन नाईकांचे सगळे रेकॉर्ड, झाडपाला, आयुर्वेदिक गोळ्या, भुकट्या आदी ताब्यात घेतले. त्यांच्या दफ्तरात दारू सोडवणे, मूळव्याध अशा व्याधींवर औषध घेतलेल्या ५0 ते ६0 पोलिसांचीही नावे आहेत. नाईकांच्या या व्यवसायाबाबत तक्रार नसल्याने सगळाच मामला खुशीचा असल्याने, कारवाईचा प्रश्न आला नाही.एखाद्या पदवीप्राप्त डॉक्टरचा व्यवसाय फिका पडेल, अशी चंद्रकांत नाईकांची ख्याती होती. रोज किमान २0 ते २५ व्यक्ती दारू सोडविण्याचे औषध घेऊन जात होत्या. म्हणजे नाईकांची रोजची मिळकत किमान ५ ते ७ हजारांची होती. नाईकांचे दारू सोडवायचे औषधही दारूच्या बाटलीतूनच दिले जायचे. (कारण काय, तर औषध घेणाऱ्याला ती दारुच आहे असे वाटावे.) हे औषध घेतले की उलट्या होतात. त्यातून शरीरातील अल्कोहोल बाहेर पडते. पोटाचा कोटा साफ होतो आणि त्यानंतर त्या माणसाला दारू पिण्याची इच्छा होत नाही, हा या धंद्याचा साधा सरळ सिध्दांत. नाईक सांधेदुखीवरही विविध प्रकारचे तेलही देतात अन् स्वत: मसाजही करतात. आतापर्यंत त्यांच्या या धंद्याविषयी कधी तक्रार आली नाही. मात्र काल घरनिकीच्या एकाचा बळी गेला अन् ८ जण तडफडले. त्यातून मग या गोरखधंद्याची चाहूल पोलिसांना लागली. घटनेचे गांभीर्य आणि मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनाचा धसका घेत पोलिसांनी रातोरात चंद्रकांत नाईकांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.आम्ही काय खून तर केला नाय..!ही घटना घडल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने थेट घटनास्थळाला भेट देत नाईक कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी ते निर्विकारपणे बोलत होते. वडिलांपासून हा व्यवसाय सुरु आहे. आता मुलगा चालवतोय. कधी कुणाची तक्रार नाही. मात्र कालच्या घटनेत जाणारा त्याच्या कर्माने गेला. मात्र फळाला आमच्या आलं. आमच्याकडे व्यवसायाचा परवाना नाही, एवढीच आमची चूक होईल. त्रास जरा आता सोसायचा. नाही तर आम्ही काय खून केलाय का? अशा शब्दात नाईक कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.माणसं तशी साधी, सरळ..!हा व्यवसाय करताना आपण काही चुकीचे करतोय, याचा लवलेशही या कुटुंबाला नाही. शिक्षणच जेमतेम असल्याने कायद्याबाबत काही माहितीच नाही. वडिलांचाच व्यवसाय करतोय, कित्येक जणांना त्याचा लाभ होतोय, हीच या कुटुंबाची साधी भावना. मात्र लक्ष्मण मानेंच्या मृत्यूने त्यांच्या या व्यवसायावरच बालंट आले. चंद्रकांत नाईक याला अटक केल्याची बातमी थडकताच आज सकाळपासून ग्रामस्थांनी तेथे रीघ लावली होती. प्रत्येकजण विचारपूस करीत होता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य त्यांना जाणवलेच नव्हते.२५0 रुपयांत मरण..!चंद्रकांत नाईक याचा दारू सोडविण्यावर औषध म्हणून झाडपाला आणि आयुर्वेदिक गोळ्या, भुकटी देण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याच्या व्यवसायाची व्याप्ती अन् प्रसिध्दीही मोठी होती. मात्र लक्ष्मण माने यांच्या मृत्यूने त्याच्या व्यवसायाची धूळदाण उडाली. दारु सोडण्याच्या इच्छेने आलेल्या लक्ष्मण माने याच्या वाट्याला मात्र केवळ २५0 रुपयांत मरण आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच नाईकांचा व्यवसायही अडचणीत आला.