शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST

पालिका लोगो लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळच नाही. मात्र ...

पालिका लोगो

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळच नाही. मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथे बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

पालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्ष विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले. शिवसेनाही त्यांच्यात सामील झाली, परंतु धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढली. त्यांचे पाच नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून ‘मातोश्री’वर जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे वजन वाढले. राज्यात महाआघाडी सत्तेवर आल्यानंतर पालिका सभागृहात शिवसेनेला सावध भूमिका घ्यावी लागत आहे.

सध्या वैभव पवार काँग्रेसचे असले, तरी त्यांना विकास आघाडीसोबतच राहावे लागते. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात काँग्रेसची स्वतंत्र ताकद नाही. तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडे ठराविक कार्यकर्त्यांची फळी आहे. येथील मनीषा रोटे राज्यपातळीवरील नेत्या आहेत. मात्र पालिकेच्या राजकारणात महिलांचे संघटन नाही.

जिल्हा पातळीवरून येथील काँग्रेसला कधीच ताकद मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अर्थात जयंत पाटील यांची ताकद अबाधित राहिली आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील यांना भाजपची वाट निवडावी लागली.

आता काँग्रेसच्या माध्यमातून विश्वजित कदम हे जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत, मात्र राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथे बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

चौकट

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते परततील का?

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत विश्वजित कदम यांनी ताकद पणाला लावली होती, परंतु जयंत पाटील गटानेच बाजी मारली. आता कदम थेट जयंत पाटील यांनाच आव्हान देत आहेत. त्यांची ही भूमिका कायम राहिली तरच भाजपमध्ये गेलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते त्यांचा विचार करू शकतात. त्यानंतर राजकीय संघर्षाला धार येईल.