शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST

पालिका लोगो लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळच नाही. मात्र ...

पालिका लोगो

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळच नाही. मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथे बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

पालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्ष विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले. शिवसेनाही त्यांच्यात सामील झाली, परंतु धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढली. त्यांचे पाच नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून ‘मातोश्री’वर जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे वजन वाढले. राज्यात महाआघाडी सत्तेवर आल्यानंतर पालिका सभागृहात शिवसेनेला सावध भूमिका घ्यावी लागत आहे.

सध्या वैभव पवार काँग्रेसचे असले, तरी त्यांना विकास आघाडीसोबतच राहावे लागते. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात काँग्रेसची स्वतंत्र ताकद नाही. तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडे ठराविक कार्यकर्त्यांची फळी आहे. येथील मनीषा रोटे राज्यपातळीवरील नेत्या आहेत. मात्र पालिकेच्या राजकारणात महिलांचे संघटन नाही.

जिल्हा पातळीवरून येथील काँग्रेसला कधीच ताकद मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अर्थात जयंत पाटील यांची ताकद अबाधित राहिली आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील यांना भाजपची वाट निवडावी लागली.

आता काँग्रेसच्या माध्यमातून विश्वजित कदम हे जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत, मात्र राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथे बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

चौकट

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते परततील का?

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत विश्वजित कदम यांनी ताकद पणाला लावली होती, परंतु जयंत पाटील गटानेच बाजी मारली. आता कदम थेट जयंत पाटील यांनाच आव्हान देत आहेत. त्यांची ही भूमिका कायम राहिली तरच भाजपमध्ये गेलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते त्यांचा विचार करू शकतात. त्यानंतर राजकीय संघर्षाला धार येईल.