शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सदाभाऊंपुढे खासदार-आमदारांचे आव्हान : ‘हातकणंगले’त संपर्क वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:07 AM

गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या ताकदीवर लागणार भाजपची प्रतिष्ठा पणाला

अशोक पाटील ।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिली होती, तर इस्लामपूर मतदार संघात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात कोण? असाही प्रश्न निर्माण झाला होता.

आगामी निवडणुकीत मात्र दोन्ही मातब्बरांचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच आव्हान असणार आहे. यासाठी खोत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त लाभणार आहे.गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे उलटे होते. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे एकत्रित होते. त्यांना भाजपने साथ दिली होती. आता फक्त सदाभाऊ खोत हेच भाजपमध्ये राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही निवडणुकांची जबाबदारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर दिली आहे.

मंत्री खोत यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी सलगी वाढवत त्यांना भाजपमध्ये आणले आहे. त्यांनाच विधानसभेची उमेदवारी देण्याविषयीही प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये त्यांना यशही मिळाल्याचे दिसते. या दोघांच्या राजकीय समीकरणामुळे महाडिक गटात अस्वस्थता आहे.भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी आपली मैत्री वाढविल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपसमोर आव्हान असणार आहे.

वेळ पडल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच मैदानात उतरण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी आपला संपर्क हातकणंगले लोकसभा मतदार संघात वाढविला आहे. त्याचबरोबर त्यांना विधानसभेची कसरतही पार पाडावी लागणार आहे. उमेदवार कोणीही असला तरी, मतदार संघासह संपूर्ण राज्यातील स्टार प्रचारकाची जबाबदारी मंत्री खोत यांच्यावरच असणार आहे. भविष्याचा विचार करुनच मंत्री खोत यांनी जि. प. निवडणुकीपासून मुलगा सागर खोत यांना राजकारणात सक्रिय केले आहे.

आमदार जयंत पाटील यांना नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही राज्याची जबाबदारी आली आहे. त्यांना स्वत:च्या मतदार संघाला जास्त वेळ देता येणार नाही, हे ओळखूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मतदार संघात सक्रिय केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतून राजकीय वारसदारांचीही रेलचेल दिसणार आहे.

पुन्हा आघाडीची मोट बांधण्याचे आव्हानइस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकत्रित होते. परंतु आता या आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. सख्खे चुलत भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तर महाडिक गटानेही आपला सवतासुभा मांडत आगामी विधानसभा निवडणूक सोडायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे या विस्कटत चाललेल्या आघाडीची मोट पुन्हा बांधण्यासाठी मंत्री खोत यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत