शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सदाभाऊंपुढे खासदार-आमदारांचे आव्हान : ‘हातकणंगले’त संपर्क वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:07 IST

गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या ताकदीवर लागणार भाजपची प्रतिष्ठा पणाला

अशोक पाटील ।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिली होती, तर इस्लामपूर मतदार संघात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात कोण? असाही प्रश्न निर्माण झाला होता.

आगामी निवडणुकीत मात्र दोन्ही मातब्बरांचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच आव्हान असणार आहे. यासाठी खोत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त लाभणार आहे.गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे उलटे होते. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे एकत्रित होते. त्यांना भाजपने साथ दिली होती. आता फक्त सदाभाऊ खोत हेच भाजपमध्ये राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही निवडणुकांची जबाबदारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर दिली आहे.

मंत्री खोत यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी सलगी वाढवत त्यांना भाजपमध्ये आणले आहे. त्यांनाच विधानसभेची उमेदवारी देण्याविषयीही प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये त्यांना यशही मिळाल्याचे दिसते. या दोघांच्या राजकीय समीकरणामुळे महाडिक गटात अस्वस्थता आहे.भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी आपली मैत्री वाढविल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपसमोर आव्हान असणार आहे.

वेळ पडल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच मैदानात उतरण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी आपला संपर्क हातकणंगले लोकसभा मतदार संघात वाढविला आहे. त्याचबरोबर त्यांना विधानसभेची कसरतही पार पाडावी लागणार आहे. उमेदवार कोणीही असला तरी, मतदार संघासह संपूर्ण राज्यातील स्टार प्रचारकाची जबाबदारी मंत्री खोत यांच्यावरच असणार आहे. भविष्याचा विचार करुनच मंत्री खोत यांनी जि. प. निवडणुकीपासून मुलगा सागर खोत यांना राजकारणात सक्रिय केले आहे.

आमदार जयंत पाटील यांना नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही राज्याची जबाबदारी आली आहे. त्यांना स्वत:च्या मतदार संघाला जास्त वेळ देता येणार नाही, हे ओळखूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मतदार संघात सक्रिय केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतून राजकीय वारसदारांचीही रेलचेल दिसणार आहे.

पुन्हा आघाडीची मोट बांधण्याचे आव्हानइस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकत्रित होते. परंतु आता या आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. सख्खे चुलत भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तर महाडिक गटानेही आपला सवतासुभा मांडत आगामी विधानसभा निवडणूक सोडायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे या विस्कटत चाललेल्या आघाडीची मोट पुन्हा बांधण्यासाठी मंत्री खोत यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत