शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

सदाभाऊंपुढे खासदार-आमदारांचे आव्हान : ‘हातकणंगले’त संपर्क वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:07 IST

गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या ताकदीवर लागणार भाजपची प्रतिष्ठा पणाला

अशोक पाटील ।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिली होती, तर इस्लामपूर मतदार संघात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात कोण? असाही प्रश्न निर्माण झाला होता.

आगामी निवडणुकीत मात्र दोन्ही मातब्बरांचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच आव्हान असणार आहे. यासाठी खोत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त लाभणार आहे.गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे उलटे होते. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे एकत्रित होते. त्यांना भाजपने साथ दिली होती. आता फक्त सदाभाऊ खोत हेच भाजपमध्ये राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही निवडणुकांची जबाबदारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर दिली आहे.

मंत्री खोत यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी सलगी वाढवत त्यांना भाजपमध्ये आणले आहे. त्यांनाच विधानसभेची उमेदवारी देण्याविषयीही प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये त्यांना यशही मिळाल्याचे दिसते. या दोघांच्या राजकीय समीकरणामुळे महाडिक गटात अस्वस्थता आहे.भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी आपली मैत्री वाढविल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपसमोर आव्हान असणार आहे.

वेळ पडल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच मैदानात उतरण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी आपला संपर्क हातकणंगले लोकसभा मतदार संघात वाढविला आहे. त्याचबरोबर त्यांना विधानसभेची कसरतही पार पाडावी लागणार आहे. उमेदवार कोणीही असला तरी, मतदार संघासह संपूर्ण राज्यातील स्टार प्रचारकाची जबाबदारी मंत्री खोत यांच्यावरच असणार आहे. भविष्याचा विचार करुनच मंत्री खोत यांनी जि. प. निवडणुकीपासून मुलगा सागर खोत यांना राजकारणात सक्रिय केले आहे.

आमदार जयंत पाटील यांना नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही राज्याची जबाबदारी आली आहे. त्यांना स्वत:च्या मतदार संघाला जास्त वेळ देता येणार नाही, हे ओळखूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मतदार संघात सक्रिय केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतून राजकीय वारसदारांचीही रेलचेल दिसणार आहे.

पुन्हा आघाडीची मोट बांधण्याचे आव्हानइस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकत्रित होते. परंतु आता या आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. सख्खे चुलत भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तर महाडिक गटानेही आपला सवतासुभा मांडत आगामी विधानसभा निवडणूक सोडायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे या विस्कटत चाललेल्या आघाडीची मोट पुन्हा बांधण्यासाठी मंत्री खोत यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत