शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

८९ लाख क्विंटल साखर उत्पादन विक्रीसह साठवणुकीचे आव्हान : जिल्ह्यातील कारखान्यांच्या हंगामाची सांगता

By admin | Updated: May 10, 2014 23:46 IST

सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून

सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीस साखरेला दर नसल्याने बहुतांशी कारखान्यांनी साखर विक्री थांबविली होती. यंदाही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात साखर उत्पादित झाल्यामुळे शिल्लक साखरेचा साठा कोठे ठेवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. किरकोळ बाजारपेठेत साखरेचे दर तेजीत असले, तरी व्यापार्‍यांकडून चांगला दर मिळत नसल्याचा आरोप कारखानदार करत आहेत. आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत साखरेचे दर गडगडलेलेच होते. मार्च २०१४ मध्ये २७०० रुपये क्विंटलवरून २८०० ते २९५० रुपयांपर्यंत दर पोहोचले. एप्रिल महिन्यात तर ३००० ते ३१०० रुपये क्विंटल दर होता, पण तो दर साखर कारखानदारांच्या पदरात पडलाच नाही. कारखानदारांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांशी जुनी साखर विक्री करून बँकांची देणी काहीप्रमाणात भागविली. कारखानदारांकडून साखरेची विक्री झाल्यानंतर व्यापार्‍यांनी अचानक साखरेचे दर वाढविले. मग निविदा काढून साखर विक्री करेपर्यंत मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यापासून शंभर ते दीडशे रुपयांनी दर उतरले. साखर दरातील चढ-उताराच्या धोरणामुळे कारखानदारी अडचणीत आल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी अशा सोळा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. हंगाम उशिरा सुरू होऊनही ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. शिल्लक साखर मिळेल त्या दराने विक्री केली आहे. परंतु, काही कारखान्यांनी उशिरापर्यंत साखर ठेवली होती. या कारखान्यांसमोर सध्या उत्पादित साखर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कडेगाव येथील केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याने तात्पुरते गोदाम उभारून तेथे साखरेचा साठा केला होता; पण वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात ती साखर भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. केन अ‍ॅग्रोप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनीही तात्पुरत्या स्वरूपाची गोदामे तयार केली आहेत. त्यांना वादळाचा तडाखा बसलेला नाही; पण धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच भरीस भर म्हणून सध्या साखरेचे दरही उतरल्यामुळे साखर कारखानदारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)