शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

८९ लाख क्विंटल साखर उत्पादन विक्रीसह साठवणुकीचे आव्हान : जिल्ह्यातील कारखान्यांच्या हंगामाची सांगता

By admin | Updated: May 10, 2014 23:46 IST

सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून

सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीस साखरेला दर नसल्याने बहुतांशी कारखान्यांनी साखर विक्री थांबविली होती. यंदाही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात साखर उत्पादित झाल्यामुळे शिल्लक साखरेचा साठा कोठे ठेवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. किरकोळ बाजारपेठेत साखरेचे दर तेजीत असले, तरी व्यापार्‍यांकडून चांगला दर मिळत नसल्याचा आरोप कारखानदार करत आहेत. आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत साखरेचे दर गडगडलेलेच होते. मार्च २०१४ मध्ये २७०० रुपये क्विंटलवरून २८०० ते २९५० रुपयांपर्यंत दर पोहोचले. एप्रिल महिन्यात तर ३००० ते ३१०० रुपये क्विंटल दर होता, पण तो दर साखर कारखानदारांच्या पदरात पडलाच नाही. कारखानदारांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांशी जुनी साखर विक्री करून बँकांची देणी काहीप्रमाणात भागविली. कारखानदारांकडून साखरेची विक्री झाल्यानंतर व्यापार्‍यांनी अचानक साखरेचे दर वाढविले. मग निविदा काढून साखर विक्री करेपर्यंत मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यापासून शंभर ते दीडशे रुपयांनी दर उतरले. साखर दरातील चढ-उताराच्या धोरणामुळे कारखानदारी अडचणीत आल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी अशा सोळा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. हंगाम उशिरा सुरू होऊनही ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. शिल्लक साखर मिळेल त्या दराने विक्री केली आहे. परंतु, काही कारखान्यांनी उशिरापर्यंत साखर ठेवली होती. या कारखान्यांसमोर सध्या उत्पादित साखर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कडेगाव येथील केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याने तात्पुरते गोदाम उभारून तेथे साखरेचा साठा केला होता; पण वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात ती साखर भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. केन अ‍ॅग्रोप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनीही तात्पुरत्या स्वरूपाची गोदामे तयार केली आहेत. त्यांना वादळाचा तडाखा बसलेला नाही; पण धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच भरीस भर म्हणून सध्या साखरेचे दरही उतरल्यामुळे साखर कारखानदारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)