शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

८९ लाख क्विंटल साखर उत्पादन विक्रीसह साठवणुकीचे आव्हान : जिल्ह्यातील कारखान्यांच्या हंगामाची सांगता

By admin | Updated: May 10, 2014 23:46 IST

सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून

सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीस साखरेला दर नसल्याने बहुतांशी कारखान्यांनी साखर विक्री थांबविली होती. यंदाही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात साखर उत्पादित झाल्यामुळे शिल्लक साखरेचा साठा कोठे ठेवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. किरकोळ बाजारपेठेत साखरेचे दर तेजीत असले, तरी व्यापार्‍यांकडून चांगला दर मिळत नसल्याचा आरोप कारखानदार करत आहेत. आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत साखरेचे दर गडगडलेलेच होते. मार्च २०१४ मध्ये २७०० रुपये क्विंटलवरून २८०० ते २९५० रुपयांपर्यंत दर पोहोचले. एप्रिल महिन्यात तर ३००० ते ३१०० रुपये क्विंटल दर होता, पण तो दर साखर कारखानदारांच्या पदरात पडलाच नाही. कारखानदारांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांशी जुनी साखर विक्री करून बँकांची देणी काहीप्रमाणात भागविली. कारखानदारांकडून साखरेची विक्री झाल्यानंतर व्यापार्‍यांनी अचानक साखरेचे दर वाढविले. मग निविदा काढून साखर विक्री करेपर्यंत मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यापासून शंभर ते दीडशे रुपयांनी दर उतरले. साखर दरातील चढ-उताराच्या धोरणामुळे कारखानदारी अडचणीत आल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी अशा सोळा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. हंगाम उशिरा सुरू होऊनही ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. शिल्लक साखर मिळेल त्या दराने विक्री केली आहे. परंतु, काही कारखान्यांनी उशिरापर्यंत साखर ठेवली होती. या कारखान्यांसमोर सध्या उत्पादित साखर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कडेगाव येथील केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याने तात्पुरते गोदाम उभारून तेथे साखरेचा साठा केला होता; पण वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात ती साखर भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. केन अ‍ॅग्रोप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनीही तात्पुरत्या स्वरूपाची गोदामे तयार केली आहेत. त्यांना वादळाचा तडाखा बसलेला नाही; पण धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच भरीस भर म्हणून सध्या साखरेचे दरही उतरल्यामुळे साखर कारखानदारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)