शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
2
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
3
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
4
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
5
VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
6
बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली, ढसाढसा रडली; कुटुंबाला संशय, पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन्...
7
कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?
8
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
9
WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!
10
Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!
11
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
12
Viral Story: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाचले लग्न! एका व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितली कहाणी
13
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
14
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
15
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
18
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
19
Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
20
"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
Daily Top 2Weekly Top 5

मला आव्हान देऊन सगळे दमले! : जयंत पाटील, वाळव्यातील विरोधकांच्या एकीवरून भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 13:11 IST

सांगली : ‘मला आव्हान देऊन सगळे दमले, त्यावर चर्चा नको’, अशा एका ओळीच्या प्रतिक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या विरोधकांच्या एकत्रीकरणावर हल्लाबोल

ठळक मुद्दे त्यांच्या जागी राष्ट्रवादी जाऊन बसेल, याची त्यांना चिंता इतिहासातील आठवणी काढून लोकांत मतभेद निर्माण करण्याचे काम ठाकरे करीत आहेत

सांगली : ‘मला आव्हान देऊन सगळे दमले, त्यावर चर्चा नको’, अशा एका ओळीच्या प्रतिक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या विरोधकांच्या एकत्रीकरणावर हल्लाबोल केला. हुतात्मा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाबद्दल अभिनंदन करताना हुतात्मा कारखाना व माझे नाते मुख्यमंत्र्यांना माहीत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.आ. पाटील महापालिका क्षेत्रातील विविध कार्यक्रमांसाठी सांगलीत सोमवारी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोनच दिवसांपूर्वी वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद््घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाळव्यात आले होते. त्यांनी पाटील यांच्या विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, मला आव्हान देऊन सगळे दमले आहेत, त्यावर अधिक चर्चा नको, असे म्हणत विरोधकांच्या मोर्चेबांधणीला बेदखल केले.उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही आ. पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ठाकरे सत्तेत राहून भाजपवर टीका करीत आहेत, तर त्यांचे मंत्री भाजप सरकारच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देतात. त्यांना धड सत्तेतही राहता येत नाही आणि विरोधी पक्षातही! पाठिंबा काढला तर, त्यांच्या जागी राष्ट्रवादी जाऊन बसेल, याची त्यांना चिंता आहे. जनतेचे हित जोपासण्यापेक्षा ते वेगळ्याच विवंचनेत अडकले आहेत. वसंतदादा पाटील यांनीच राज्याची सूत्रे शरद पवार यांच्या हाती दिली होती. त्यानंतर दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांच्यासह सर्व नेते पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. इतिहासातील आठवणी काढून लोकांत मतभेद निर्माण करण्याचे काम ठाकरे करीत आहेत. त्यांनी शिवसेना भाजपसोबत आहे की नाही, हे आधी ठरवावे. महागाईने भरडली जात असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत; पण शिवसेनेला मात्र दिशाच सापडत नाही. सर्वात दिशाहीन पक्ष शिवसेना आहे.चांगल्या कामाला कधीच विरोध नाही : पाटीलहुतात्मा साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प रद्द केल्यावरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली होती. त्यावर आ. जयंत पाटील म्हणाले की, हुतात्मा कारखान्याने इथेनॉलचा प्रस्ताव कधी दिला, तो कधी रद्द झाला आणि पुन्हा त्याला कधी मान्यता मिळाली, हे मला माहीत नाही. चांगल्या कामाला मी कधीच विरोध करीत नाही. मुख्यमंत्री कोणाबद्दल बोलले हे कळत नाही; पण माझ्याबद्दल नक्कीच ते बोलले नाहीत. कारण मी असे कोणतेही कृत्य केलेले नाही. शेतकºयांना चार पैसे देणाºया प्रकल्पाचे मी स्वागत करतो. ‘हुतात्मा’ व माझे नाते त्यांना माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली