शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मार्च २०२० पर्यंत ‘टेंभू’च्या पूर्णत्वाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:55 IST

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असणाऱ्या, परंतु अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाºया ...

प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असणाऱ्या, परंतु अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाºया व सध्या दुष्काळाने होरपळत असणाºया भागातील शेतकºयांना योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. आता या योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालास शासनमान्यता मिळाली आहे. त्यामुळे योजनेसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु आता मार्च २०२० पर्यंत या योजनेच्या पूर्णत्वाचे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर आहे.द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालाच्या मान्यतेमुळे टेंभू योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कºहाड, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अशा एकंदरीत ७ तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास योजनेचे पाणी मिळणार आहे. आतापर्यंत योजनेवर १ हजार ९८४ कोटी ८८ हजार इतका खर्च झाला आहे. चालूवर्षी २०१८-२०१९ मध्ये टेंभू योजनेला बळीराजा योजनेतून ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी १०० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ४०० कोटींचा निधी लवकरच मिळणार आहे. पुढीलवर्षी २०१९-२० मध्ये ७०० कोटींचा निधी मिळणार आहे. असा एकंदरीत ३ हजार १८४ कोटी ८८ लाख खर्च योजनेच्या कामांसाठी होणार आहे. उर्वरित ९ हजार ४० कोटी ६ लाख इतका इतर अनुषंगिक खर्च होणार आहे. यामुळे टेंभू योजना ४ हजार ८८ कोटी ९४ लाखांची झाली आहे.चालूवर्षी प्राप्त निधीतून टप्पा क्र. ५ कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. टेंभूसह ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत. यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांमध्ये जात आहे. हे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे. यासाठी अपूर्ण कामे मार्च २०२० पर्यंतच्या मुदतीत पूर्ण करून लाभक्षेत्राची तहान भागविण्याचे आव्हान राज्यकर्त्यांसमोर उभे आहे.वंचित भागात टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याची खुदाई तसेच वितरिकांची कामे अपूर्ण आहेत. बहुतांशी ठिकाणी मुख्य कालव्याचे अस्तरीकरण झालेले नाही. ही सर्व कामे मुदतीत पूर्ण करून उपवितरिकेऐवजी बंदिस्त पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी देण्याचे आव्हान आहे.तासगाव तालुक्यातील विसापूर-पुणदी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३५० कि.मी.चे कालवे आहेत. त्यापैकी २७० कि.मी.पर्यंतच्या कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८० कि.मी. लांबीच्या दरम्यान येणारे लाभक्षेत्र योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. ही कामे बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत प्राप्त होणाºया निधीतून पूर्ण होण्यास मदत होणार आहे.