शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मार्च २०२० पर्यंत ‘टेंभू’च्या पूर्णत्वाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:55 IST

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असणाऱ्या, परंतु अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाºया ...

प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असणाऱ्या, परंतु अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाºया व सध्या दुष्काळाने होरपळत असणाºया भागातील शेतकºयांना योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. आता या योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालास शासनमान्यता मिळाली आहे. त्यामुळे योजनेसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु आता मार्च २०२० पर्यंत या योजनेच्या पूर्णत्वाचे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर आहे.द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालाच्या मान्यतेमुळे टेंभू योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कºहाड, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अशा एकंदरीत ७ तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास योजनेचे पाणी मिळणार आहे. आतापर्यंत योजनेवर १ हजार ९८४ कोटी ८८ हजार इतका खर्च झाला आहे. चालूवर्षी २०१८-२०१९ मध्ये टेंभू योजनेला बळीराजा योजनेतून ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी १०० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ४०० कोटींचा निधी लवकरच मिळणार आहे. पुढीलवर्षी २०१९-२० मध्ये ७०० कोटींचा निधी मिळणार आहे. असा एकंदरीत ३ हजार १८४ कोटी ८८ लाख खर्च योजनेच्या कामांसाठी होणार आहे. उर्वरित ९ हजार ४० कोटी ६ लाख इतका इतर अनुषंगिक खर्च होणार आहे. यामुळे टेंभू योजना ४ हजार ८८ कोटी ९४ लाखांची झाली आहे.चालूवर्षी प्राप्त निधीतून टप्पा क्र. ५ कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. टेंभूसह ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत. यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांमध्ये जात आहे. हे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे. यासाठी अपूर्ण कामे मार्च २०२० पर्यंतच्या मुदतीत पूर्ण करून लाभक्षेत्राची तहान भागविण्याचे आव्हान राज्यकर्त्यांसमोर उभे आहे.वंचित भागात टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याची खुदाई तसेच वितरिकांची कामे अपूर्ण आहेत. बहुतांशी ठिकाणी मुख्य कालव्याचे अस्तरीकरण झालेले नाही. ही सर्व कामे मुदतीत पूर्ण करून उपवितरिकेऐवजी बंदिस्त पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी देण्याचे आव्हान आहे.तासगाव तालुक्यातील विसापूर-पुणदी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३५० कि.मी.चे कालवे आहेत. त्यापैकी २७० कि.मी.पर्यंतच्या कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८० कि.मी. लांबीच्या दरम्यान येणारे लाभक्षेत्र योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. ही कामे बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत प्राप्त होणाºया निधीतून पूर्ण होण्यास मदत होणार आहे.