शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

Lok Sabha Election ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीने भाजपसमोर तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:22 IST

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : गत लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात भाजपने मिरज तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : गत लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात भाजपने मिरज तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. मात्र यावेळी खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील यांच्यातील लढतीमुळे समीकरणे बदलली आहेत. गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविणाऱ्या भाजपला पुन्हा मताधिक्य मिळविण्याचे आव्हान आहे.गत लोकसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघात मिरज पूर्व भाग व शहरातही भाजपने मताधिक्य मिळवून काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. मिरज पूर्व भागात आ. सुरेश खाडे यांच्या विरोधातील माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्याशी जवळीक केली. आताच्या निवडणुकीत ही मंडळी विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची नाराजी दूर झाल्याने विकास आघाडीचे कार्यकर्ते खा. पाटील यांच्या प्रचारात आहेत. मात्र घोरपडे गट खा. पाटील यांना कितपत मदत करणार, हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्याने आ. सुरेश खाडे यांचाही खासदारांसोबत छुपा संघर्ष संपुष्टात आला आहे. मात्र आ. खाडे समर्थक काय भूमिका घेतात, यावरच भाजपचे मताधिक्य अवलंबून आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे विशाल पाटील यांना पूर्व भागातील व नदीकाठच्या ऊस उत्पादकांचा पाठिंबा मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचे लक्ष धनगर समाज, दलित व मुस्लिम मतांवर आहे. मिरजेत मोठ्या संख्येने असलेले मुस्लिम मतदार स्वाभिमानी आघाडीकडे असल्याने, दलित व मुस्लिम मतांचे विभाजन होणार आहे. मत विभाजनामुळे खा. पाटील यांना यावेळी मताधिक्य मिळविणे कठीण असल्याचे चित्र आहे.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना ९३,७९५ हजार व काँग्रेसचे प्रा. सिध्दार्थ जाधव यांना २९,७२८ हजार मते मिळाली होती. ६४ हजार ६७ मतांनी खाडे यांना विजय मिळाला होता.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?मिरजेत भाजपचे आमदार व सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मतभेद आहेत. शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. काँग्रेस, राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना पदे मिळाली असल्याने, जुने भाजप कार्यकर्ते उपेक्षित आहेत.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?गेल्या पाच वर्षात पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. गेल्या दहा वर्षात भाजप-सेना युतीच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?मिरज विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शहरात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेस व राष्टÑवादीची एकत्रित ताकद स्वाभिमानीसाठी फायद्याची आहे.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?मिरज राखीव विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे. काँग्रेस व राष्टÑवादीत समन्वयाचा अभाव आहे. पक्षाच्या नेत्यांविरोधात कामाची मिरज पॅटर्नची परंपरा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक