शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Lok Sabha Election ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीने भाजपसमोर तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:22 IST

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : गत लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात भाजपने मिरज तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : गत लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात भाजपने मिरज तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. मात्र यावेळी खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील यांच्यातील लढतीमुळे समीकरणे बदलली आहेत. गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविणाऱ्या भाजपला पुन्हा मताधिक्य मिळविण्याचे आव्हान आहे.गत लोकसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघात मिरज पूर्व भाग व शहरातही भाजपने मताधिक्य मिळवून काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. मिरज पूर्व भागात आ. सुरेश खाडे यांच्या विरोधातील माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्याशी जवळीक केली. आताच्या निवडणुकीत ही मंडळी विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची नाराजी दूर झाल्याने विकास आघाडीचे कार्यकर्ते खा. पाटील यांच्या प्रचारात आहेत. मात्र घोरपडे गट खा. पाटील यांना कितपत मदत करणार, हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्याने आ. सुरेश खाडे यांचाही खासदारांसोबत छुपा संघर्ष संपुष्टात आला आहे. मात्र आ. खाडे समर्थक काय भूमिका घेतात, यावरच भाजपचे मताधिक्य अवलंबून आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे विशाल पाटील यांना पूर्व भागातील व नदीकाठच्या ऊस उत्पादकांचा पाठिंबा मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचे लक्ष धनगर समाज, दलित व मुस्लिम मतांवर आहे. मिरजेत मोठ्या संख्येने असलेले मुस्लिम मतदार स्वाभिमानी आघाडीकडे असल्याने, दलित व मुस्लिम मतांचे विभाजन होणार आहे. मत विभाजनामुळे खा. पाटील यांना यावेळी मताधिक्य मिळविणे कठीण असल्याचे चित्र आहे.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना ९३,७९५ हजार व काँग्रेसचे प्रा. सिध्दार्थ जाधव यांना २९,७२८ हजार मते मिळाली होती. ६४ हजार ६७ मतांनी खाडे यांना विजय मिळाला होता.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?मिरजेत भाजपचे आमदार व सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मतभेद आहेत. शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. काँग्रेस, राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना पदे मिळाली असल्याने, जुने भाजप कार्यकर्ते उपेक्षित आहेत.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?गेल्या पाच वर्षात पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. गेल्या दहा वर्षात भाजप-सेना युतीच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?मिरज विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शहरात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेस व राष्टÑवादीची एकत्रित ताकद स्वाभिमानीसाठी फायद्याची आहे.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?मिरज राखीव विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे. काँग्रेस व राष्टÑवादीत समन्वयाचा अभाव आहे. पक्षाच्या नेत्यांविरोधात कामाची मिरज पॅटर्नची परंपरा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक