शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपत्तीवर केंद्र सरकारचा दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

सांगलीतील स्टेशन चौकात दिल्लीत सुरू असलेल्या किसान बाग आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शनिवारी सभा झाली. यावेळी माजी ...

सांगलीतील स्टेशन चौकात दिल्लीत सुरू असलेल्या किसान बाग आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शनिवारी सभा झाली. यावेळी माजी खा. शेट्टी बोलत होते. यावेळी प्रा. बाबूराव गुरव, ॲड. सुभाष पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आय्याज नायकवडी, सदाशिव मगदूम, ॲड. के. डी. शिंदे, कॉ. उमेश देशमुख, विकास मगदूम, शंकर पुजारी, प्रा. सुभाष दगडे, राजू कांबळे, संदीप कांबळे, शिवसेनेचे बजरंग कदम, शंभूराज काटकर, आदी उपस्थित आहे.

राजू शेट्टी म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिली, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दिल्लीत थंडीमध्ये कुडकुडत बसलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार चुकीची वागणूक देत आहे. या पाषाणहृदयी सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. केंद्रानं कुठलाही शेतकरी, कुठल्याही शेतकरी संघटनेसोबत चर्चा केली नाही. मग हे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकार उद्योगपतींना विकले गेले आहे. हे कायदे उद्योगपतींना शेतकऱ्यांना लुटता यावं म्हणून केले गेले आहेत. हे सगळेजण हस्तक म्हणून काम करत आहेत. शेतकरी आणि सरकारी मालमत्तांवर केंद्र सरकार उद्योगपतींच्या माध्यमातून दरोडा टाकत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

समन्वय समितीचे महेश खराडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. संजय पाटील यांनी सभेत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधातील ठराव मांडले, त्यास सर्वांनी पाठिंबा दिला.

चौकट

शेतकरी, कष्टकऱ्यांचा हक्क नाकारण्याचा प्रकार : बाबूराव गुरव

डॉ. प्रा. बाबूराव गुरव म्हणाले, केंद्र सरकारने केलेला कायदा हा केवळ शेतकऱ्यांच्या विरोधातील नसून १३० कोटी भारतीयांच्या विरोधातील आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येणार आहे. खासगीकरणातून विकास अशा पद्धतीचा कारभार चालू आहे. कायद्यात सुधारणा करून गरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा हक्क नाकारण्याचा प्रकार सुरू आहे.