शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने साखर कारखान्यांना अनुदान द्यावे

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

वैभव नायकवडी : हुतात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

वाळवा : यावर्षी साखरेचे दर गडगडल्याने ‘हुतात्मा’ला सुध्दा शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देणे अडचणीचे झाले आहे. त्यासाठी शासनाने अनुदानाचा निर्णय ताबडतोब घ्यावा. तसेच एफआरपीप्रमाणेच साखरेचे दरसुध्दा शाश्वतस्वरूपी अंतर्भूत करावेत, असे प्रतिपादन अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी नायकवडी बोलत होते.यावेळी माजी अध्यक्ष महादेव कांबळे, श्रीमती नीलावती माळी, उपाध्यक्षा सौ. वंदना माने, संचालिका सौ. सुनीता माळी उपस्थित होते. नायकवडी म्हणाले की, सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल २६00 रुपये आहेत. बँका कारखान्यांना मार्केटमधील साखरेच्या दरावर ८५ टक्केच उचल देतात. त्यात कारखान्यांना तोडणी, ओढणी व कामगार पगार आणि इतर खर्च देऊनच शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा लागतो. सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी, केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन साखर धंदा टिकण्यासाठी व शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळण्यासाठी प्रयत्न करून निर्णय घ्यावा. हा निर्णय तात्पुरता मलमपट्टीचा असू नये. कायमस्वरुपी जखम बरी होईल, असाच निर्णय असावा.यावर्षी कारखाना मे २0१५ अखेर सुरू राहील. ७ लाख मेट्रिक टन गाळप व १३.५0 टक्के सरासरी रिकव्हरी घेण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने निश्चित केले आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस यांनी स्वागत केले. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. काटा पूजन उपाध्यक्षा सौ. वंदना माने व माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी केले. (वार्ताहर)