शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

केंद्राने साखर कारखान्यांना अनुदान द्यावे

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

वैभव नायकवडी : हुतात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

वाळवा : यावर्षी साखरेचे दर गडगडल्याने ‘हुतात्मा’ला सुध्दा शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देणे अडचणीचे झाले आहे. त्यासाठी शासनाने अनुदानाचा निर्णय ताबडतोब घ्यावा. तसेच एफआरपीप्रमाणेच साखरेचे दरसुध्दा शाश्वतस्वरूपी अंतर्भूत करावेत, असे प्रतिपादन अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी नायकवडी बोलत होते.यावेळी माजी अध्यक्ष महादेव कांबळे, श्रीमती नीलावती माळी, उपाध्यक्षा सौ. वंदना माने, संचालिका सौ. सुनीता माळी उपस्थित होते. नायकवडी म्हणाले की, सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल २६00 रुपये आहेत. बँका कारखान्यांना मार्केटमधील साखरेच्या दरावर ८५ टक्केच उचल देतात. त्यात कारखान्यांना तोडणी, ओढणी व कामगार पगार आणि इतर खर्च देऊनच शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा लागतो. सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी, केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन साखर धंदा टिकण्यासाठी व शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळण्यासाठी प्रयत्न करून निर्णय घ्यावा. हा निर्णय तात्पुरता मलमपट्टीचा असू नये. कायमस्वरुपी जखम बरी होईल, असाच निर्णय असावा.यावर्षी कारखाना मे २0१५ अखेर सुरू राहील. ७ लाख मेट्रिक टन गाळप व १३.५0 टक्के सरासरी रिकव्हरी घेण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने निश्चित केले आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस यांनी स्वागत केले. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. काटा पूजन उपाध्यक्षा सौ. वंदना माने व माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी केले. (वार्ताहर)