शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

प्रकाश आंबेडकरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:07 IST

सांगली : कोरेगाव-भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागल्यानंतर एक-दोघांचा बळी गेला. यास प्रकाश आंबेडकर कारणीभूत असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.चौगुले म्हणाले, जातीयवाद्यांनी संभाजीराव भिडे (गुरुजी) यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटीचा’चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. ...

सांगली : कोरेगाव-भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागल्यानंतर एक-दोघांचा बळी गेला. यास प्रकाश आंबेडकर कारणीभूत असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.चौगुले म्हणाले, जातीयवाद्यांनी संभाजीराव भिडे (गुरुजी) यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटीचा’चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. कोेरेगाव-भीमा प्रकरणामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील वातावरण दूषित झाले आहे. ३ जानेवारीला महाराष्टÑ बंद पुकारण्यात आला; पण या बंदला हिंसक वळण लागले. जाळपोळ, दगडफेक केली. खासगी व शासकीय मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका महिलेने गुरुजींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीबाबतही संभ्रमावस्था आहे. जातीयवादी शक्तीने ‘कट’ रचून हा प्रकार घडवून आणला आहे. बंद काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक-दोघांचा बळी गेला. यास प्रकाश आंबेडकर कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच तोडफोडीत जे काही नुकसान झाले, ते त्यांच्याकडून वसूल करावेत. भिडे गुरुजींविरुद्ध जे गुन्हे दाखल केले आहेत, ते शासनाने सन्मानपूर्वक मागे घेऊन काढून टाकावेत. गुरुजींनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही.शिवप्रतिष्ठानतर्फे गावभागातील हरिदास भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी १८ पगड जातीच्या बांधवांनाही बोलाविण्यात आले होते. यामध्ये कळंबी (ता. मिरज) येथील वीर शिदनाक इनामदार यांचे पंधरावे वंशज अभिजित इनामदार, तसेच अभिमन्यू भोसले, अंकुश माने, शशिकांत नागे, महेंद्र चंडाळे, दत्तात्रय माळी, प्रदीप बर्गे, संतोष लोखंडे, सचिन पवार, मनोहर साळुंखे, धनंजय सूर्यवंशी, अमित करमुसे, संजय गोसावी, गणेश कोडते, विनायक एडके, मोहन पतंगे, विजय काबरा, गोविंद नगरकर उपस्थित होते. या सर्वांनी, भिडे गुरुजींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे, शासनाने हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करुन, आम्ही सर्वजण भिडे गुरुजींच्या पाठीशी असल्याचे सांगितले.मुंबईत बसून बोलू नयेवीर शिदनाक इनामदार यांचे वंशज अभिजित इनामदार म्हणाले, २०१२ मध्ये भिडे गुरुजी पाच हजार धारकºयांंना घेऊन कळंबी येथे वीर शिदनाक यांच्या स्मारकास मानवंदना देण्यास आले होते. कोरेगाव-भीमा येथील हे प्रकरण मतांच्या राजकारणाचा डाव आहे. पण आंबेडकरवादी जनता त्यांचा हा डाव आणून पाडेल.मुंबईत बसून कोरगाव-भीमा प्रकरणावर बोलणारे कधीही कळंबीत वीर शिदनाक यांच्या स्मारकावर नतमस्तक होण्यास आले नाहीत, असा टोलाही इनामदार यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला.