शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कडेगाव तालुक्यातील ४२ मराठा आंदोलकांवरील खटला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

कडेगाव : राज्य सरकारने मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्याची विनंती स्थानिक न्यायालयांना केली होती. यानुसार ...

कडेगाव : राज्य सरकारने मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्याची विनंती स्थानिक न्यायालयांना केली होती. यानुसार कडेगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चातील ४२ आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. सरकार पक्ष सदरची केस पुढे चालविण्यास तयार नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३२१ प्रमाणे केस काढून टाकण्यात आली आहे, असा आदेश कडेगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वि. रा. घराळ यांनी सोमवारी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगाव येथील न्यायालयात मराठा क्रांती मोर्चाचे राहुल पाटील व दादासाहेब यादव यांच्यासह ४२ जणांविरुद्ध खटला सुरू होता. या सर्वांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी २७ जुलै २०१८ रोजी आंदोलन केले होते. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यात टायर पेटवून रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी प्रमुख ४२ जणांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यानंतर सरकारच्या आदेशाप्रमाणे फौजदारी प्रक्रिया कलम ३२१ प्रमाणे केस मागे घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज १२ नोव्हेंबर २०२० रोजी कडेगाव न्यायालयात सादर केला होता.

यावर सोमवार, दि. २२ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार तालुक्यातील ४२ आंदोलकांविरुद्धचा खटला मागे घेण्यात आला आहे.

चौकट

"न्याय हक्कासाठी लढतच राहू"

सरकारने गुन्हे मागे घेऊन दिलासा दिला. मात्र, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही. आम्ही लढतच राहू, असा निर्धार खटल्यातून बाहेर पडलेले राहुल पाटील यांनी व्यक्त केला.