शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

अपघाताला निमंत्रण देणारी ऊस वाहतूक?????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम आता बहरात आला असला तरी, ऊस वाहतूक धोक्याच्या वाटेवरुन चालली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम आता बहरात आला असला तरी, ऊस वाहतूक धोक्याच्या वाटेवरुन चालली आहे. बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर अशाा वाहनांमधून रात्री होणारी ऊस वाहतूक व रिफ्लेक्टर नसताना केला जाणारा प्रवास अपघाताला निमंत्रण देत आहे.

सांगली जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा १ लाख ९ हजार १५५ हेक्टर उसाचे उत्पादन आहे. साखर कारखान्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रत्येक कारखाना मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू आहे. बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांचा यासाठी वापर केला जातो. ९८ टक्के बैलगाडीला रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून आले. बहुतांश ट्रॅक्टरचे रिफ्लेक्टर जुने व नावापुरते लावल्याचे दिसून येते. ट्रकचीही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना ही ऊस वाहतूक करणारी वाहने दिसत नाहीत. त्यांचा अंदाज न आल्याने दरवर्षी अपघात होतात. या अपघातात अनेकांचे जीवही जातात. त्यामुळे अशाप्रकारच्या वाहतुकीला नियमांच्या काटेकोर पालनाचे बंधन घातले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या ऊस वाहतुकीकडे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे दरवर्षी अपघात वाढत आहेत.

चौकट

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर घ्यावी सर्वाधिक काळजी

सांगली-इस्लामपूर या मार्गावर सर्वाधिक ऊस वाहतूक केली जाते. या मार्गावरुन वसंतदादा, सर्वोदय, हुतात्मा व राजारामबापू साखर कारखान्याला ऊस जात असतो. त्यामुळे सांगलीपासून इस्लामपूर शहरापर्यंत सर्वत्र उसाची वाहने दिसतात. हा रस्ता खराब असून, त्यात ऊस वाहतूक मोठी असल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे.

चौकट

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एकूण संख्या १४

कोट

ऊस वाहतूक वाहनांच्या मालकांनी, कारखान्यांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत दक्षता घ्यायला हवी. या वाहनांमुळे होणारे अपघात हे रिफ्लेक्टरअभावी होतात. त्यामुळे आम्ही वाहतूक विभागालाही अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीस अधीक्षक

चौकट

ऊस वाहतुकीमुळे वाढताहेत अपघात

जिल्ह्यात २०१९ मध्ये एकूण ७५६ अपघात झाले असून, त्यात २९३ जणांचा मृत्यू झाला. ६६५ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात ट्रक, ट्रॅक्टरचे अपघात हे ३ टक्के आहेत. यात ऊस वाहतुकीमुळे झालेल्या अपघातांचाही समावेश आहे. जिल्ह्यात अरुंद रस्त्यांची संख्याही अधिक आहे. अशा मार्गांवरुन ऊस वाहतूक होत असतानाही अपघात होत आहेत. रात्री जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी रात्री ऊस वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. हे प्रकारही अपघाताला निमंत्रण देत आहेत.ऊस वाहतुकीमुळे वाढताहेत अपघात