शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

वृक्षांचे जळीतकांड अजूनही सुरूच

By admin | Updated: July 23, 2016 00:12 IST

शासनासमोर आव्हान : अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची वृक्षप्रेमींकडून मागणी

सातारा : ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा नारा सर्वत्र दिला जात आहे. झाडे लावली तर ती जगविण्याचे आव्हान आहे; पण जी झाडे आहे ती देखील जाळून टाकण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात वाढत चालला आहे. याकडे पर्यावरणवादीसह शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून, यावर वेळीच उपाययोजना राबविली गेली नाही तर या वृक्षांचे जळीतकांड थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे.सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय जागेवरील मोठी वृक्ष जाळून तोडण्याचा प्रकार अलीकडील दोन वर्षांपासून वाढला आहे. त्यामुळे महामार्गाबरोबर अनेक ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गावर वड, जांभूळ, आंबा आदी झाडे जाळून तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आजअखेर लाखो झाडांची कत्तल अशी झाली आहेत. तर अनेक झाडे सध्या या आगीत होरपळत आहेत. तरीही याविषयी शासनाने गांधारीची भूमिका बजावत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी ‘लोकमत’समोर व्यक्त केला.झाडाच्या खोडाला आग लावल्यानंतर ते विझविण्याचा प्रश्नही कोणाकडून लवकर केला जात नाही. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी वनअधिकारी, महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याने विघ्नसंतोषी व्यक्तींनी ही झाडे तोडताना कोणताच विचार करत नाही, याला आळा बसला पाहिजे. (प्रतिनिधी)झाडाची सालही काढली..खोड जाळण्याबरोबर काहीजण झाडाच्या बुंद्याची साल काढत आहे. यामुळे कालांतराने साल काढलेल्या बुंद्याला वाळवी लागून झाड कमकुवत होते. पाऊस, वाऱ्यामध्ये हे झाड कोसळते. त्यामुळे जाळण्याबरोबर आता साल काढण्याचा प्रकारही आता वाढला आहे. अजामीनपात्र गुन्हावृक्ष जाळणारी व्यक्तीवर तसेच त्यांच्या घरी जळणासाठी झाडांच्या फांद्या दिसल्या तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, तरच ही तोड थांबेल, यासाठी शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.साताऱ्यातील गोडोली तसेच बोगदा ते डबेवाडी या मार्गावर सध्या वृक्ष जाळण्याचे प्रकार दिसून येत आहेत. बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाच्या हद्दीतील जांभळाची झाडे जाळली आहेत. त्यामुळे हा रस्ता आता भकास झाला आहे.