शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वृक्षांचे जळीतकांड अजूनही सुरूच

By admin | Updated: July 23, 2016 00:12 IST

शासनासमोर आव्हान : अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची वृक्षप्रेमींकडून मागणी

सातारा : ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा नारा सर्वत्र दिला जात आहे. झाडे लावली तर ती जगविण्याचे आव्हान आहे; पण जी झाडे आहे ती देखील जाळून टाकण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात वाढत चालला आहे. याकडे पर्यावरणवादीसह शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून, यावर वेळीच उपाययोजना राबविली गेली नाही तर या वृक्षांचे जळीतकांड थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे.सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय जागेवरील मोठी वृक्ष जाळून तोडण्याचा प्रकार अलीकडील दोन वर्षांपासून वाढला आहे. त्यामुळे महामार्गाबरोबर अनेक ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गावर वड, जांभूळ, आंबा आदी झाडे जाळून तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आजअखेर लाखो झाडांची कत्तल अशी झाली आहेत. तर अनेक झाडे सध्या या आगीत होरपळत आहेत. तरीही याविषयी शासनाने गांधारीची भूमिका बजावत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी ‘लोकमत’समोर व्यक्त केला.झाडाच्या खोडाला आग लावल्यानंतर ते विझविण्याचा प्रश्नही कोणाकडून लवकर केला जात नाही. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी वनअधिकारी, महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याने विघ्नसंतोषी व्यक्तींनी ही झाडे तोडताना कोणताच विचार करत नाही, याला आळा बसला पाहिजे. (प्रतिनिधी)झाडाची सालही काढली..खोड जाळण्याबरोबर काहीजण झाडाच्या बुंद्याची साल काढत आहे. यामुळे कालांतराने साल काढलेल्या बुंद्याला वाळवी लागून झाड कमकुवत होते. पाऊस, वाऱ्यामध्ये हे झाड कोसळते. त्यामुळे जाळण्याबरोबर आता साल काढण्याचा प्रकारही आता वाढला आहे. अजामीनपात्र गुन्हावृक्ष जाळणारी व्यक्तीवर तसेच त्यांच्या घरी जळणासाठी झाडांच्या फांद्या दिसल्या तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, तरच ही तोड थांबेल, यासाठी शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.साताऱ्यातील गोडोली तसेच बोगदा ते डबेवाडी या मार्गावर सध्या वृक्ष जाळण्याचे प्रकार दिसून येत आहेत. बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाच्या हद्दीतील जांभळाची झाडे जाळली आहेत. त्यामुळे हा रस्ता आता भकास झाला आहे.