शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

वृक्षांचे जळीतकांड अजूनही सुरूच

By admin | Updated: July 23, 2016 00:12 IST

शासनासमोर आव्हान : अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची वृक्षप्रेमींकडून मागणी

सातारा : ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा नारा सर्वत्र दिला जात आहे. झाडे लावली तर ती जगविण्याचे आव्हान आहे; पण जी झाडे आहे ती देखील जाळून टाकण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात वाढत चालला आहे. याकडे पर्यावरणवादीसह शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून, यावर वेळीच उपाययोजना राबविली गेली नाही तर या वृक्षांचे जळीतकांड थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे.सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय जागेवरील मोठी वृक्ष जाळून तोडण्याचा प्रकार अलीकडील दोन वर्षांपासून वाढला आहे. त्यामुळे महामार्गाबरोबर अनेक ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गावर वड, जांभूळ, आंबा आदी झाडे जाळून तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आजअखेर लाखो झाडांची कत्तल अशी झाली आहेत. तर अनेक झाडे सध्या या आगीत होरपळत आहेत. तरीही याविषयी शासनाने गांधारीची भूमिका बजावत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी ‘लोकमत’समोर व्यक्त केला.झाडाच्या खोडाला आग लावल्यानंतर ते विझविण्याचा प्रश्नही कोणाकडून लवकर केला जात नाही. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी वनअधिकारी, महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याने विघ्नसंतोषी व्यक्तींनी ही झाडे तोडताना कोणताच विचार करत नाही, याला आळा बसला पाहिजे. (प्रतिनिधी)झाडाची सालही काढली..खोड जाळण्याबरोबर काहीजण झाडाच्या बुंद्याची साल काढत आहे. यामुळे कालांतराने साल काढलेल्या बुंद्याला वाळवी लागून झाड कमकुवत होते. पाऊस, वाऱ्यामध्ये हे झाड कोसळते. त्यामुळे जाळण्याबरोबर आता साल काढण्याचा प्रकारही आता वाढला आहे. अजामीनपात्र गुन्हावृक्ष जाळणारी व्यक्तीवर तसेच त्यांच्या घरी जळणासाठी झाडांच्या फांद्या दिसल्या तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, तरच ही तोड थांबेल, यासाठी शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.साताऱ्यातील गोडोली तसेच बोगदा ते डबेवाडी या मार्गावर सध्या वृक्ष जाळण्याचे प्रकार दिसून येत आहेत. बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाच्या हद्दीतील जांभळाची झाडे जाळली आहेत. त्यामुळे हा रस्ता आता भकास झाला आहे.