शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

क्रांतीची धगधगती मशाल : नागनाथअण्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक ...

वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक कार्यातून उभारलेल्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या "हुतात्मा पॅटर्न"ला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणाऱ्या संस्थापक क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या २२ मार्च रोजी ९ व्या स्मृतिदिनानिमित्त-------!

नागनाथअण्णा म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवर क्रांतिकारी वाळवा तालुक्यात जन्माला आलेले एक तुफानी वजनदार आणि करारी व्यक्तिमत्त्व होय. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सातारा प्रतिसरकार याद्वारे झालेले कार्य व शौर्य वर्णन करणेस कागद आणि शाई सुद्धा कमी पडेल. त्याच नागनाथ अण्णांनी स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या नावे शिक्षण व उद्योग क्षेत्रांत जिवंत मंदिरे उभी करून, अखेरच्या क्षणांपर्यंत समाजासाठीच रचनात्मक भरीव सामाजिक कार्य केले आहे.

सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील तेरा दुष्काळी तालुक्यांना आज कृष्णेचे पाणी मिळाले आहे, त्यासाठी आटपाडी पाणी परिषदेद्वारे अण्णांनी ३० वर्षे मोठा संघर्ष केला आहे, हा सर्वश्रूत इतिहास आहे तो कुणी बदलूच शकत नाही. हुतात्मा साखर कारखाना अंगठेबहाद्दर कामगारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर " हुतात्मा पॅटर्न " म्हणून नावारूपाला आणला आहे. जगांतील हे कितवे आश्चर्य म्हणून नोंद झाली पाहिजे ते तुम्हींच ठरवावे, ते म्हणजे त्यांनी उभारलेल्या हुतात्मा साखर कारखान्याचे ते स्वत: सभासद नाहीत. तसेच ट्रायल सिझनची मूठभर साखर चाखून कारखाना गेटच्या बाहेर पडलेले नागनाथअण्णा अखेरचा श्वास घेतला तरी कारखान्याच्या गेटच्या आत परत गेले नाहीत. नागनाथअण्णा जितके प्रेमळ तितकेच करारीपण होते. त्यांची कामे शासनदरबारी धूळ खात पडत नव्हती. जातीयवादाला त्यांनी अखेरपर्यंत थारा दिला नाही.

गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून शाळा, काॅलेज सुरू केलीत. त्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृहे व भोजन व्यवस्था केली. शेतकरी, शेतमजूर व कामगार आर्थिक सक्षम झाला पाहिजे म्हणून ऊस दराची स्पर्धाच सुरू केली. कामगारांना प्रसंगी ५० टक्केपर्यंत बोनस दिला आहे, तर खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरीच बनवली आहे. दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीच वाळव्यात खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरी गौरवोद्गार काढले आहेत. धरणग्रस्तांच्यासाठी अनेक आंदोलने करून सरकारला धारेवर धरून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. अशा या महान स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा ९वा स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम !