शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

क्रांतीची धगधगती मशाल : नागनाथअण्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक ...

वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक कार्यातून उभारलेल्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या "हुतात्मा पॅटर्न"ला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणाऱ्या संस्थापक क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या २२ मार्च रोजी ९ व्या स्मृतिदिनानिमित्त-------!

नागनाथअण्णा म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवर क्रांतिकारी वाळवा तालुक्यात जन्माला आलेले एक तुफानी वजनदार आणि करारी व्यक्तिमत्त्व होय. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सातारा प्रतिसरकार याद्वारे झालेले कार्य व शौर्य वर्णन करणेस कागद आणि शाई सुद्धा कमी पडेल. त्याच नागनाथ अण्णांनी स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या नावे शिक्षण व उद्योग क्षेत्रांत जिवंत मंदिरे उभी करून, अखेरच्या क्षणांपर्यंत समाजासाठीच रचनात्मक भरीव सामाजिक कार्य केले आहे.

सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील तेरा दुष्काळी तालुक्यांना आज कृष्णेचे पाणी मिळाले आहे, त्यासाठी आटपाडी पाणी परिषदेद्वारे अण्णांनी ३० वर्षे मोठा संघर्ष केला आहे, हा सर्वश्रूत इतिहास आहे तो कुणी बदलूच शकत नाही. हुतात्मा साखर कारखाना अंगठेबहाद्दर कामगारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर " हुतात्मा पॅटर्न " म्हणून नावारूपाला आणला आहे. जगांतील हे कितवे आश्चर्य म्हणून नोंद झाली पाहिजे ते तुम्हींच ठरवावे, ते म्हणजे त्यांनी उभारलेल्या हुतात्मा साखर कारखान्याचे ते स्वत: सभासद नाहीत. तसेच ट्रायल सिझनची मूठभर साखर चाखून कारखाना गेटच्या बाहेर पडलेले नागनाथअण्णा अखेरचा श्वास घेतला तरी कारखान्याच्या गेटच्या आत परत गेले नाहीत. नागनाथअण्णा जितके प्रेमळ तितकेच करारीपण होते. त्यांची कामे शासनदरबारी धूळ खात पडत नव्हती. जातीयवादाला त्यांनी अखेरपर्यंत थारा दिला नाही.

गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून शाळा, काॅलेज सुरू केलीत. त्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृहे व भोजन व्यवस्था केली. शेतकरी, शेतमजूर व कामगार आर्थिक सक्षम झाला पाहिजे म्हणून ऊस दराची स्पर्धाच सुरू केली. कामगारांना प्रसंगी ५० टक्केपर्यंत बोनस दिला आहे, तर खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरीच बनवली आहे. दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीच वाळव्यात खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरी गौरवोद्गार काढले आहेत. धरणग्रस्तांच्यासाठी अनेक आंदोलने करून सरकारला धारेवर धरून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. अशा या महान स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा ९वा स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम !