शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीची धगधगती मशाल : नागनाथअण्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक ...

वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक कार्यातून उभारलेल्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या "हुतात्मा पॅटर्न"ला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणाऱ्या संस्थापक क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या २२ मार्च रोजी ९ व्या स्मृतिदिनानिमित्त-------!

नागनाथअण्णा म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवर क्रांतिकारी वाळवा तालुक्यात जन्माला आलेले एक तुफानी वजनदार आणि करारी व्यक्तिमत्त्व होय. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सातारा प्रतिसरकार याद्वारे झालेले कार्य व शौर्य वर्णन करणेस कागद आणि शाई सुद्धा कमी पडेल. त्याच नागनाथ अण्णांनी स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या नावे शिक्षण व उद्योग क्षेत्रांत जिवंत मंदिरे उभी करून, अखेरच्या क्षणांपर्यंत समाजासाठीच रचनात्मक भरीव सामाजिक कार्य केले आहे.

सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील तेरा दुष्काळी तालुक्यांना आज कृष्णेचे पाणी मिळाले आहे, त्यासाठी आटपाडी पाणी परिषदेद्वारे अण्णांनी ३० वर्षे मोठा संघर्ष केला आहे, हा सर्वश्रूत इतिहास आहे तो कुणी बदलूच शकत नाही. हुतात्मा साखर कारखाना अंगठेबहाद्दर कामगारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर " हुतात्मा पॅटर्न " म्हणून नावारूपाला आणला आहे. जगांतील हे कितवे आश्चर्य म्हणून नोंद झाली पाहिजे ते तुम्हींच ठरवावे, ते म्हणजे त्यांनी उभारलेल्या हुतात्मा साखर कारखान्याचे ते स्वत: सभासद नाहीत. तसेच ट्रायल सिझनची मूठभर साखर चाखून कारखाना गेटच्या बाहेर पडलेले नागनाथअण्णा अखेरचा श्वास घेतला तरी कारखान्याच्या गेटच्या आत परत गेले नाहीत. नागनाथअण्णा जितके प्रेमळ तितकेच करारीपण होते. त्यांची कामे शासनदरबारी धूळ खात पडत नव्हती. जातीयवादाला त्यांनी अखेरपर्यंत थारा दिला नाही.

गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून शाळा, काॅलेज सुरू केलीत. त्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृहे व भोजन व्यवस्था केली. शेतकरी, शेतमजूर व कामगार आर्थिक सक्षम झाला पाहिजे म्हणून ऊस दराची स्पर्धाच सुरू केली. कामगारांना प्रसंगी ५० टक्केपर्यंत बोनस दिला आहे, तर खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरीच बनवली आहे. दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीच वाळव्यात खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरी गौरवोद्गार काढले आहेत. धरणग्रस्तांच्यासाठी अनेक आंदोलने करून सरकारला धारेवर धरून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. अशा या महान स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा ९वा स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम !