शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

तासगावात साडेतीन कोटींच्या कामांना सत्ताधाºयांचा ब्रेक उदासीन कारभार : प्रशासकीय मंजुरीनंतरही निविदा प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:35 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही सत्ताधाऱ्यांच्या उदासीन

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही सत्ताधाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी पडून आहे. चार महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरी असूनही निविदा प्रक्रिया राबवली जात नसल्याने, ठेकेदारीच्या उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे.

तासगाव नगरपालिकेवर खासदार संजयकाका पाटील यांची वर्चस्व मिळवल्यानंतर, केंद्र आणि राज्य शासनाकडे वजन वापरुन संजयकाकांनी तासगाव पालिकेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातूनही तासगाव पालिकेला निधी उपलब्ध करुन दिला. सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला काही दिवस पालिकेतील सत्ताधाºयांनी विकासकामांचा धडाका दाखवला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पालिकेत निधी शिल्लक असूनही कामे केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

तासगाव नगरपालिकेकडे सुमारे सात कोटींपेक्षा जास्त कामे मंजूर आहेत. यापैकी बहुतांश कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. सुमारे साडेतीन कोटींच्या कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. यामध्ये नगरोत्थान अभियान, दलितेत्तर अनुदान, पाणी पुरवठा योजनेचे अनुदान, नावीन्यपूर्ण योजनेचे अनुदान, जिल्हा नियोजन समितीचा निधी यासह अन्य विभागांकडील कामांचा समावेश आहे.गेल्या चार महिन्यांपासून निधी असूनही सत्ताधाऱ्यांनी निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे सत्ताधाºयांच्या या कारभाराची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

यापूर्वी झालेल्या कामांवरून पालिकेतील कारभाऱ्यांत कुरघोड्या सुरू होत्या. अनेकदा त्या जाहीरपणे चव्हाट्यावर आल्या होत्या. या कुरघोड्या आणि टक्केवारीची किनार या कामांना असल्यामुळेच कामे थांबवण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. कामे थांबवल्यामुळे शिल्लक निधी शासनाकडे परत जाण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर ओढावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.शिल्लक निधीची : नामुष्कीतासगाव नगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या साडेतीन कोटींच्या कामांसह सुमारे सात कोटींपर्यंत अखर्चित निधी तासगाव पालिकेकडे असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार अखर्चित निधी शासनाकडून परत घेतला जाणार आहे. त्यामुळे अखर्चित निधी परत जाण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून ३१ तारखेला होणाºया सभेत शासनाकडे शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ मागण्याचा ठराव अजेंड्यावर घेण्यात आला आहे.ठेकेदारीचा वादग्रस्त कारभारतासगाव नगरपालिकेत सत्ता कोणात्याही गटाची असली तरी, नगरसेवक आणि ठेकेदारीचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. सत्तेतील काही नगरसेवकांचा अपवाद वगळता, त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ठेकेदारीतील इंटरेस्ट तासगावकरांपासून लपून राहिलेला नाही. कोणाच्या प्रभागातील काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे? कोणते काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे? हे ठरवण्यावरुनही अनेकदा धुसफूस झाली. होती. त्यामुळेच या कामांना ब्रेक दिल्याची चर्चा आहे.