शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तासगावात साडेतीन कोटींच्या कामांना सत्ताधाºयांचा ब्रेक उदासीन कारभार : प्रशासकीय मंजुरीनंतरही निविदा प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:35 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही सत्ताधाऱ्यांच्या उदासीन

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही सत्ताधाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी पडून आहे. चार महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरी असूनही निविदा प्रक्रिया राबवली जात नसल्याने, ठेकेदारीच्या उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे.

तासगाव नगरपालिकेवर खासदार संजयकाका पाटील यांची वर्चस्व मिळवल्यानंतर, केंद्र आणि राज्य शासनाकडे वजन वापरुन संजयकाकांनी तासगाव पालिकेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातूनही तासगाव पालिकेला निधी उपलब्ध करुन दिला. सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला काही दिवस पालिकेतील सत्ताधाºयांनी विकासकामांचा धडाका दाखवला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पालिकेत निधी शिल्लक असूनही कामे केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

तासगाव नगरपालिकेकडे सुमारे सात कोटींपेक्षा जास्त कामे मंजूर आहेत. यापैकी बहुतांश कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. सुमारे साडेतीन कोटींच्या कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. यामध्ये नगरोत्थान अभियान, दलितेत्तर अनुदान, पाणी पुरवठा योजनेचे अनुदान, नावीन्यपूर्ण योजनेचे अनुदान, जिल्हा नियोजन समितीचा निधी यासह अन्य विभागांकडील कामांचा समावेश आहे.गेल्या चार महिन्यांपासून निधी असूनही सत्ताधाऱ्यांनी निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे सत्ताधाºयांच्या या कारभाराची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

यापूर्वी झालेल्या कामांवरून पालिकेतील कारभाऱ्यांत कुरघोड्या सुरू होत्या. अनेकदा त्या जाहीरपणे चव्हाट्यावर आल्या होत्या. या कुरघोड्या आणि टक्केवारीची किनार या कामांना असल्यामुळेच कामे थांबवण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. कामे थांबवल्यामुळे शिल्लक निधी शासनाकडे परत जाण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर ओढावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.शिल्लक निधीची : नामुष्कीतासगाव नगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या साडेतीन कोटींच्या कामांसह सुमारे सात कोटींपर्यंत अखर्चित निधी तासगाव पालिकेकडे असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार अखर्चित निधी शासनाकडून परत घेतला जाणार आहे. त्यामुळे अखर्चित निधी परत जाण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून ३१ तारखेला होणाºया सभेत शासनाकडे शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ मागण्याचा ठराव अजेंड्यावर घेण्यात आला आहे.ठेकेदारीचा वादग्रस्त कारभारतासगाव नगरपालिकेत सत्ता कोणात्याही गटाची असली तरी, नगरसेवक आणि ठेकेदारीचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. सत्तेतील काही नगरसेवकांचा अपवाद वगळता, त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ठेकेदारीतील इंटरेस्ट तासगावकरांपासून लपून राहिलेला नाही. कोणाच्या प्रभागातील काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे? कोणते काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे? हे ठरवण्यावरुनही अनेकदा धुसफूस झाली. होती. त्यामुळेच या कामांना ब्रेक दिल्याची चर्चा आहे.