शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संसर्गाची साखळी तोडू, साथ नियंत्रणात आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:25 IST

फोटो : १४०४२०२१प्रिया प्रभू कोणत्याही रोगाला नियंत्रित करायचे असेल, तर ‘ब्रेक द चेन’ला पर्याय नाही. चांगला डॉक्टर केवळ रुग्ण ...

फोटो : १४०४२०२१प्रिया प्रभू

कोणत्याही रोगाला नियंत्रित करायचे असेल, तर ‘ब्रेक द चेन’ला पर्याय नाही. चांगला डॉक्टर केवळ रुग्ण बरा करत नाही, तर त्याच्यापासून इतरांपर्यंत आजार फैलावू नये म्हणून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी योग्य ते सल्लेही देतो. आजार निर्माण करणाऱ्या बहुतांश जंतूंना सहसा शरीराबाहेर जगता येत नाही.

जंतूंच्या दृष्टीने त्यांचे जीवनध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जंतूला रुग्णाच्या शरीरातून बाहेर निघण्याचे दार वापरून विविध मार्गांनी नव्या संसर्गक्षम व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरून संसर्ग निर्माण करावाच लागतो, नाहीतर जंतू जगू शकत नाहीत.

मानवाच्या दृष्टीने मात्र प्रत्येक जंतूची संसर्गशृंखला समजून घेऊन ती साखळी तोडून जंतूंची वाढ, पर्यायाने रुग्णांची वाढ रोखणे महत्त्वाचे असते. आजअखेर ज्या-ज्या रोगांवर मानवाने नियंत्रण मिळवले आहे, ते ‘ब्रेक द चेन’ याच मार्गाने मिळवले आहे. आता हा उपाय आपण कोरोनाविरुद्धही वापरत आहोत.

तो उपाय कसा वापरत आहोत, ते पाहू : शृंखलेतील कडी आणि त्यावरील उपाय :

१. जंतू (कोरोना विषाणू) : जंतुनाशकांचा वापर (सॅनिटायझर).

२. विषाणूचे भांडार (रुग्ण) : संसर्ग झाल्यास विलगीकरण (आयसोलेशन), उपचार, रुग्णाशी संपर्क आल्यास १४ दिवस अलगीकरण (क्वारंटाइन), लक्षण सुरू होताच तपासणी.

३. शरीराबाहेर पडण्याचा मार्ग (नाक किंवा तोंड) : मास्कचा सुयोग्य वापर.

४. प्रसाराचे मार्ग (हवेतून किंवा पृष्ठभागावरून) : अंतर राखणे, गर्दी टाळणे, बंदिस्त जागी न जाणे, वायुविजन वाढवणे, मास्क न काढणे, पृष्ठभाग निर्जंतुक करणे, हातांची स्वच्छता, एकत्र न खाणे किंवा पिणे.

५. प्रवेशाचे मार्ग (नाक, तोंड, डोळे) : चेहऱ्याला, नाकतोंडाला स्पर्श न करणे, मास्क वापरून नाक व तोंड सुरक्षित ठेवणे, शिल्ड किंवा गॉगल्स वापरणे.

६. संसर्गक्षम व्यक्ती : मास्कचा योग्य वापर अनिवार्य, कामाशिवाय इतरांना न भेटणे, लसीकरण, आरोग्यपूर्ण जीवनशैली.

गेल्या मार्चपासून ही शृंखला तोडण्यासाठीच सरकारने विविध नियम केले होते. मात्र, जनतेने ते मनापासून पाळले नाहीत. प्रशासनास एकजुटीने सहकार्य केले नाही. जनतेने हे नियम पाळले नसल्यामुळेच कोरोनाचे फावले. कोरोनासाठी ही संसर्गशृंखला बळकट झाली आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. अशावेळी सरकारला ही शृंखला तोडण्यासाठी विविध निर्बंध घालावे लागतात आणि तरीही साखळी तुटली नाही की, मग दोन ते चार आठवड्यांचा लॉकडाऊन करावा लागतो.

लॉकडाऊन केल्याने ही शृंखला कशी तोडली जाते हे पाहू :

१. विषाणूचे भांडार असलेल्या रुग्णांनी स्वतःच्या घरी थांबावे. बाहेर पडून संसर्ग फैलावू नये. (लक्षणे येण्यापूर्वी दोन दिवस संसर्ग फैलावण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्यात रुग्णाची चूक असतेच, असे नाही) लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार घेणे अपेक्षित आहे.

२. जे कळत-नकळत एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गित झाले आहेत, मात्र अजून लक्षणे दिसत नाहीत, अशांनीही स्वतःच्या घरी थांबावे. १४ दिवसांमध्ये त्यांची लक्षणे दिसू लागतात आणि त्यांच्यापासून पुढे होणारा प्रसार थांबतो.

३. संसर्गक्षम व्यक्तीनेही स्वतःच्या घरामध्येच थांबावे. बाहेर पडायचे नसल्याने त्यांचा संपर्क बाधित व्यक्तींसोबत येत नाही आणि त्यामुळे संसर्गाची ही साखळी तोडली जाते. साथ थांबवायची असेल तर एका रुग्णापासून आजार दुसऱ्याकडेही जाता कामा नये.

आता आपण ही शृंखला तोडली नाही, तर रुग्णसंख्या अमर्याद वाढेल आणि प्रतिदिवशी हजारो मृत्यू होतील. हे टाळणे केवळ आपल्याच हातात आहे.

(लेखिका मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका असून, साथरोगतज्ज्ञ आहेत.)