शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

बहुजनांनी ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य उलथवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:29 AM

वाटेगाव : बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य बदलून टाकावे, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथून बहुजन क्रांती मोर्चा, परिवर्तन यात्रेचा प्रारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.मेश्राम म्हणाले, कोरेगाव-भीमा ...

वाटेगाव : बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य बदलून टाकावे, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथून बहुजन क्रांती मोर्चा, परिवर्तन यात्रेचा प्रारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.मेश्राम म्हणाले, कोरेगाव-भीमा येथे भिडे-एकबोटेंनी दंगल घडवून एकसंध बहुजन समाजामध्ये जातीय भावना भडकावून विभाजन करण्याचे षड्यंत्र रचले. ते षड्यंत्र जागरुक बहुजन समाजाने हाणून पाडले. बहुजन समाजाला एकसंध करुन ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाने परिवर्तन यात्रेचे आयोजन केले आहे. तेव्हा बहुजन समाजातील मराठा, ओ.बी.सी., अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, बलुतेदार, एस.बी.सी., मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, लिंगायत, शीख, जैन आदी समूहातील बांधवांनी आपले हक्क व अधिकार नष्ट होऊ नयेत, म्हणून एकत्र येऊन न्याय्य हक्कासाठी एकीची वज्रमूठ करुन लढा दिला पाहिजे.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे म्हणाले, बहुजन समाजातील लोकांनी बहुजनक्रांती मोर्चाला बळ देऊन संघटना मोठी बनवावी. राज्याच्या ग्रामीण भागात ही परिवर्तन यात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार आहे. यावेळी सरपंच सुरेश साठे, पोलीसपाटील संतोष करांडे, ग्रा. पं. सदस्य विनोद जाधव, संजय जाधव, अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री साठे, नीशा मेश्राम, डॉ. आर. एन. कवठेकर, माया जमदाडे उपस्थित होते. योगेश साठे यांनी प्रास्ताविक केले. शालिग्राम आलामी यांनी आभार मानले.