शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उटगी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:05 IST

जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर ...

जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर (वय ४५) यांनी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी लायाप्पा यांची पत्नी महानंदा इंचूर यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.लायाप्पा इंचूर यांचे उटगी गावात घर आहे. तेथे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी व तीन मुले असे कुटुंब आहे. उटगी ते सलगर (ता. मंगळवेढा) रस्त्यादरम्यान उटगीपासून तीन किलोमीटरवर त्यांची साडेतीन एकर शेतजमीन आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील कूपनलिका कोरडी पडली आहे. पावसाच्या भरवशावर त्यांनी दोन एकर क्षेत्रात तूर, तर दीड एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. महिन्यापूर्वी ते कर्नाटकातील रोन्याळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील बसवेश्वर साखर कारखान्याकडून एक लाख रुपये उचल घेऊन ऊसतोडणी कामगार म्हणून गेले होते.ज्वारीचे पीक पूर्णपणे करपून गेल्यानंतर तुरीच्या काढणीसाठी दोन दिवसांपूर्वी ते उटगी (ता. जत) येथे आले होते. दोन एकरातून त्यांना केवळ २५ ते ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने ते निराश होते.सोमवारी सकाळी त्यांनी पत्नी महानंदा हिला बसने उमदी (ता. जत) येथील बहिणीकडे पाठवून दिले. त्यानंतर ते शेताकडे एकटेच गेले. जमीन नापीक झाल्यामुळे व तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.