शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

उटगी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:05 IST

जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर ...

जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर (वय ४५) यांनी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी लायाप्पा यांची पत्नी महानंदा इंचूर यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.लायाप्पा इंचूर यांचे उटगी गावात घर आहे. तेथे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी व तीन मुले असे कुटुंब आहे. उटगी ते सलगर (ता. मंगळवेढा) रस्त्यादरम्यान उटगीपासून तीन किलोमीटरवर त्यांची साडेतीन एकर शेतजमीन आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील कूपनलिका कोरडी पडली आहे. पावसाच्या भरवशावर त्यांनी दोन एकर क्षेत्रात तूर, तर दीड एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. महिन्यापूर्वी ते कर्नाटकातील रोन्याळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील बसवेश्वर साखर कारखान्याकडून एक लाख रुपये उचल घेऊन ऊसतोडणी कामगार म्हणून गेले होते.ज्वारीचे पीक पूर्णपणे करपून गेल्यानंतर तुरीच्या काढणीसाठी दोन दिवसांपूर्वी ते उटगी (ता. जत) येथे आले होते. दोन एकरातून त्यांना केवळ २५ ते ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने ते निराश होते.सोमवारी सकाळी त्यांनी पत्नी महानंदा हिला बसने उमदी (ता. जत) येथील बहिणीकडे पाठवून दिले. त्यानंतर ते शेताकडे एकटेच गेले. जमीन नापीक झाल्यामुळे व तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.