शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

उटगी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:05 IST

जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर ...

जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर (वय ४५) यांनी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी लायाप्पा यांची पत्नी महानंदा इंचूर यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.लायाप्पा इंचूर यांचे उटगी गावात घर आहे. तेथे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी व तीन मुले असे कुटुंब आहे. उटगी ते सलगर (ता. मंगळवेढा) रस्त्यादरम्यान उटगीपासून तीन किलोमीटरवर त्यांची साडेतीन एकर शेतजमीन आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील कूपनलिका कोरडी पडली आहे. पावसाच्या भरवशावर त्यांनी दोन एकर क्षेत्रात तूर, तर दीड एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. महिन्यापूर्वी ते कर्नाटकातील रोन्याळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील बसवेश्वर साखर कारखान्याकडून एक लाख रुपये उचल घेऊन ऊसतोडणी कामगार म्हणून गेले होते.ज्वारीचे पीक पूर्णपणे करपून गेल्यानंतर तुरीच्या काढणीसाठी दोन दिवसांपूर्वी ते उटगी (ता. जत) येथे आले होते. दोन एकरातून त्यांना केवळ २५ ते ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने ते निराश होते.सोमवारी सकाळी त्यांनी पत्नी महानंदा हिला बसने उमदी (ता. जत) येथील बहिणीकडे पाठवून दिले. त्यानंतर ते शेताकडे एकटेच गेले. जमीन नापीक झाल्यामुळे व तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.