शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पक्ष मजबुतीसाठी बूथ रचना महत्त्वाची : पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:15 IST

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत.

ठळक मुद्देभाजपची ताकद वाढलीरेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत. पक्ष मजबुतीसाठी बूथरचना महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत पक्ष टिकविण्याचे काम विक्रम पाटील यांनी केले आहे. यापुढेसुध्दा पक्षाची ताकद वाढविण्याचे इंद्रधनुष्य त्यांनी पेलावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.

येथे वाळवा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत देशमुख बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. देशमुख म्हणाले, देशात व राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वच योजना चांगल्याप्रकारे राबविल्या जात असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हतबल झालेला आहे. वाळवा तालुक्यात नवीन लोक पक्षात घेऊन पक्ष मजबूत करावा.

आमदार नाईक म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे भूमिपूजन केले. ही योजना पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले आहे. शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान होऊ नये म्हणून पाईपद्वारे ही योजना पूर्ण होईल. रेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात निघेल.नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात परिवर्तन घडवू. साखराळे गावातील ज्या बूथवर जयंत पाटील मतदान करतात, तेथे ग्रामपंचायत निवडणुकीत जादा मतदान घेतले आहे. येडेमच्छिंद्र येथे आमचा सरपंच झालेला आहे.

जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आपण आष्टा तालुक्याची मागणी केली आहे. ती लवकरच मार्गी लागेल. आष्टा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन करावा, यासाठी सामुदायिक प्रयत्न करू. राहुल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष सयाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी भगवानराव साळुंखे,जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, गजानन फल्ले, रणधीर नाईक, स्वरुपराव पाटील, तालुकाध्यक्ष शंकर पाटील, प्रसाद पाटील, समीर आगा, संदीपराज पवार, खुदा खिलारे, बजरंग माने, भानुदास पाटोळे, बबनराव शिंदे, युवराज खामकर, नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.आता वन बूथ-टेन बूथ भाजप नेते विक्रम पाटील म्हणालेकी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अशोकदादा पाटील यांना ३१ हजार ५०० मते मिळाली होती. त्यावेळी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही निर्माण केले. या कार्यकर्त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक आमिषे दाखवली. परंतु स्वाभिमानी कार्यकर्ते आमच्यापासून दूर गेले नाहीत. आतावन बूथ-टेन बूथ ही योजना पूर्ण करु.