शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पक्ष मजबुतीसाठी बूथ रचना महत्त्वाची : पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:15 IST

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत.

ठळक मुद्देभाजपची ताकद वाढलीरेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत. पक्ष मजबुतीसाठी बूथरचना महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत पक्ष टिकविण्याचे काम विक्रम पाटील यांनी केले आहे. यापुढेसुध्दा पक्षाची ताकद वाढविण्याचे इंद्रधनुष्य त्यांनी पेलावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.

येथे वाळवा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत देशमुख बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. देशमुख म्हणाले, देशात व राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वच योजना चांगल्याप्रकारे राबविल्या जात असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हतबल झालेला आहे. वाळवा तालुक्यात नवीन लोक पक्षात घेऊन पक्ष मजबूत करावा.

आमदार नाईक म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे भूमिपूजन केले. ही योजना पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले आहे. शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान होऊ नये म्हणून पाईपद्वारे ही योजना पूर्ण होईल. रेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात निघेल.नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात परिवर्तन घडवू. साखराळे गावातील ज्या बूथवर जयंत पाटील मतदान करतात, तेथे ग्रामपंचायत निवडणुकीत जादा मतदान घेतले आहे. येडेमच्छिंद्र येथे आमचा सरपंच झालेला आहे.

जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आपण आष्टा तालुक्याची मागणी केली आहे. ती लवकरच मार्गी लागेल. आष्टा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन करावा, यासाठी सामुदायिक प्रयत्न करू. राहुल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष सयाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी भगवानराव साळुंखे,जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, गजानन फल्ले, रणधीर नाईक, स्वरुपराव पाटील, तालुकाध्यक्ष शंकर पाटील, प्रसाद पाटील, समीर आगा, संदीपराज पवार, खुदा खिलारे, बजरंग माने, भानुदास पाटोळे, बबनराव शिंदे, युवराज खामकर, नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.आता वन बूथ-टेन बूथ भाजप नेते विक्रम पाटील म्हणालेकी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अशोकदादा पाटील यांना ३१ हजार ५०० मते मिळाली होती. त्यावेळी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही निर्माण केले. या कार्यकर्त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक आमिषे दाखवली. परंतु स्वाभिमानी कार्यकर्ते आमच्यापासून दूर गेले नाहीत. आतावन बूथ-टेन बूथ ही योजना पूर्ण करु.