शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘बोल’ जयंत पाटील यांचे, ‘हल्ला’ सदाभाऊंवर,इस्लामपुरात आज राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:53 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले

ठळक मुद्दे हल्लाबोल यात्रा : , नेत्यांच्या भाषणांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

अशोक पाटील ।इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले नाहीत. अगदी मोदी लटेतही ते तरले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून सोडलेले सदाभाऊ अस्त्र राष्ट्रवादीला धक्के देऊ लागले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत हेच ‘टार्गेट’ राहणार आहेत.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव होते. इस्लामपूर मतदारसंघात वसंतदादा घराण्यातील नेते आणि पतंगराव कदम यांनी जयंतविरोधी नेतृत्वाला खतपाणी घातले; परंतु ते वाया गेले.

गत लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांनी महाआघाडीत सामील होऊन जयंत पाटील यांना अडचणीत आणले होते. मोदी लाटेचा फायदा शेट्टी यांना झाला. विधानसभेला मात्र जयंतविरोधी नेत्यांमध्ये बिघाडी झाली. कॉँग्रेस, शिवसेनेचा सवतासुभा, बळीराजाचे बी. जी. पाटील यांची वेगळी भूमिका पाटील यांच्या पथ्यावर पडली. राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बरांना धक्के बसले. शिराळ्यात राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला. पाटील यांना विधानसभेत विरोधी गटनेते पदावर समाधान मानावे लागले.

सदाभाऊंना मंत्रीपद मिळाल्यापासून त्यांनी राष्ट्रवादीला धक्कातंत्र देण्यास सुरुवात केली आहेत. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी पहिला धक्का दिला. शिवाय ३१ वर्षांची सत्ता उलथवण्याची कामगिरीही पार पाडली. त्यावेळी केवळ जयंत पाटील यांनाच टार्गेट केले गेले. याचा वचपा काढण्यासाठी जयंत पाटीलही सरसावले आहेत. गुरुवारी इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपबरोबरच सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले जाणार आहे.कोणाचाच असर नाही!वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे कधीही सख्य जमले नाही. युती सरकारच्या काळात अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक मंत्री होते. मात्र त्यांचीही मात्रा जयंत पाटील यांच्यावर लागू झाली नाही. उलट नंतर डांगे यांनी पाटील यांच्यासोबत येऊन राष्ट्रवादीला बळ दिले.