शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

‘बोल’ जयंत पाटील यांचे, ‘हल्ला’ सदाभाऊंवर,इस्लामपुरात आज राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:53 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले

ठळक मुद्दे हल्लाबोल यात्रा : , नेत्यांच्या भाषणांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

अशोक पाटील ।इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले नाहीत. अगदी मोदी लटेतही ते तरले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून सोडलेले सदाभाऊ अस्त्र राष्ट्रवादीला धक्के देऊ लागले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत हेच ‘टार्गेट’ राहणार आहेत.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव होते. इस्लामपूर मतदारसंघात वसंतदादा घराण्यातील नेते आणि पतंगराव कदम यांनी जयंतविरोधी नेतृत्वाला खतपाणी घातले; परंतु ते वाया गेले.

गत लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांनी महाआघाडीत सामील होऊन जयंत पाटील यांना अडचणीत आणले होते. मोदी लाटेचा फायदा शेट्टी यांना झाला. विधानसभेला मात्र जयंतविरोधी नेत्यांमध्ये बिघाडी झाली. कॉँग्रेस, शिवसेनेचा सवतासुभा, बळीराजाचे बी. जी. पाटील यांची वेगळी भूमिका पाटील यांच्या पथ्यावर पडली. राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बरांना धक्के बसले. शिराळ्यात राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला. पाटील यांना विधानसभेत विरोधी गटनेते पदावर समाधान मानावे लागले.

सदाभाऊंना मंत्रीपद मिळाल्यापासून त्यांनी राष्ट्रवादीला धक्कातंत्र देण्यास सुरुवात केली आहेत. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी पहिला धक्का दिला. शिवाय ३१ वर्षांची सत्ता उलथवण्याची कामगिरीही पार पाडली. त्यावेळी केवळ जयंत पाटील यांनाच टार्गेट केले गेले. याचा वचपा काढण्यासाठी जयंत पाटीलही सरसावले आहेत. गुरुवारी इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपबरोबरच सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले जाणार आहे.कोणाचाच असर नाही!वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे कधीही सख्य जमले नाही. युती सरकारच्या काळात अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक मंत्री होते. मात्र त्यांचीही मात्रा जयंत पाटील यांच्यावर लागू झाली नाही. उलट नंतर डांगे यांनी पाटील यांच्यासोबत येऊन राष्ट्रवादीला बळ दिले.