शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वाळवा-शिराळ्यात भाजपच ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:03 IST

अशोक पाटील ।इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात भाजपची हवा केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख , खासदार राजू शेट्टी यांची आघाडी होत आहे.शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसला जवळ केले आहे. त्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता दोन्ही तालुक्यात ...

ठळक मुद्देराष्टवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी : हुतात्मा, महाडिक गटाची भूमिका गुलदस्त्यात

अशोक पाटील ।इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात भाजपची हवा केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, खासदार राजू शेट्टी यांची आघाडी होत आहे.

शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसला जवळ केले आहे. त्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता दोन्ही तालुक्यात आघाडीचे भाजप हेच टार्गेट असणार आहे. याउलट राजकारणात तग धरून असलेले वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला खा. राजू शेट्टी यांनी कडवे आव्हान दिले होते. शेट्टी यांच्याविरोधात अंतिम टप्प्यापर्यंत उमेदवारच नव्हता. अखेरच्याक्षणी काँग्रेसचे कल्लापाण्णा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. यावेळी खासदार शेट्टी यांच्या पाठीशी हुतात्मा गट, महाडिक गट, भाजप व काँग्रेसचे काही चेहरे दिसत होते. परंतु यावेळेला राजकीय समीकरणे बदलली आहेत. खा. शेट्टी यांनी महायुतीतून बाहेर पडून काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे जे गतवेळेला सोबत होते, ते आता विरोधात जाणार आहेत. गतवेळी जी अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीची होती, तीच वेळ भाजपवर आली आहे. त्यामुळे भाजपला लोकसभेला उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

शिराळ्यात आ. शिवाजीराव नाईक यांच्याबरोबर खा. शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत प्रचार यंत्रणेत होते. आता मात्र शिराळा मतदारसंघात उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. आ. नाईक यांनी सदाभाऊ खोत यांची साथ घेऊन विकास कामांचा धूमधडाका सुरु केला आहे, तर खा. शेट्टी यांनी काँग्रेसला जवळ केल्यामुळे आगामी काळात दोन भाऊंच्या साथीला शेट्टी असणार आहेत. त्यामुळे दोन भाऊंच्या समझोता एक्स्प्रेसला गती मिळणार आहे. त्यांच्याकडून भाजप हाच पक्ष टार्गेट असणार आहे.इस्लामपूर मतदार संघातही शेट्टींच्या पाठिंब्यामुळे समीकरणे बदलणार आहेत. शेट्टी ऊस दर आंदोलनावेळी आ. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत होते. परंतु आता आ. पाटीलच शेट्टी यांच्या सभांमधून भाजपवर टीका करताना दिसतील.राजू शेट्टींची : शिट्टी घुमणारआ. जयंत पाटील यांच्या प्रचार सभांमधून खा. शेट्टी यांची शिट्टी घुमणार आहे. दोघांपुढे भाजपचा टिकाव लागणार का, हे येणारा काळ ठरवेल. पेठनाक्यावरील महाडिक व वाळव्याचे नायकवडी यांनी स्वत:चे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि संस्थांचा विकास साधण्यासाठी गरज पडेल त्या नेत्याला जवळ केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यातच राहिली आहे.