शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

वाळवा-शिराळ्यात भाजपच ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:03 IST

अशोक पाटील ।इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात भाजपची हवा केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख , खासदार राजू शेट्टी यांची आघाडी होत आहे.शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसला जवळ केले आहे. त्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता दोन्ही तालुक्यात ...

ठळक मुद्देराष्टवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी : हुतात्मा, महाडिक गटाची भूमिका गुलदस्त्यात

अशोक पाटील ।इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात भाजपची हवा केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, खासदार राजू शेट्टी यांची आघाडी होत आहे.

शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसला जवळ केले आहे. त्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता दोन्ही तालुक्यात आघाडीचे भाजप हेच टार्गेट असणार आहे. याउलट राजकारणात तग धरून असलेले वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला खा. राजू शेट्टी यांनी कडवे आव्हान दिले होते. शेट्टी यांच्याविरोधात अंतिम टप्प्यापर्यंत उमेदवारच नव्हता. अखेरच्याक्षणी काँग्रेसचे कल्लापाण्णा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. यावेळी खासदार शेट्टी यांच्या पाठीशी हुतात्मा गट, महाडिक गट, भाजप व काँग्रेसचे काही चेहरे दिसत होते. परंतु यावेळेला राजकीय समीकरणे बदलली आहेत. खा. शेट्टी यांनी महायुतीतून बाहेर पडून काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे जे गतवेळेला सोबत होते, ते आता विरोधात जाणार आहेत. गतवेळी जी अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीची होती, तीच वेळ भाजपवर आली आहे. त्यामुळे भाजपला लोकसभेला उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

शिराळ्यात आ. शिवाजीराव नाईक यांच्याबरोबर खा. शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत प्रचार यंत्रणेत होते. आता मात्र शिराळा मतदारसंघात उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. आ. नाईक यांनी सदाभाऊ खोत यांची साथ घेऊन विकास कामांचा धूमधडाका सुरु केला आहे, तर खा. शेट्टी यांनी काँग्रेसला जवळ केल्यामुळे आगामी काळात दोन भाऊंच्या साथीला शेट्टी असणार आहेत. त्यामुळे दोन भाऊंच्या समझोता एक्स्प्रेसला गती मिळणार आहे. त्यांच्याकडून भाजप हाच पक्ष टार्गेट असणार आहे.इस्लामपूर मतदार संघातही शेट्टींच्या पाठिंब्यामुळे समीकरणे बदलणार आहेत. शेट्टी ऊस दर आंदोलनावेळी आ. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत होते. परंतु आता आ. पाटीलच शेट्टी यांच्या सभांमधून भाजपवर टीका करताना दिसतील.राजू शेट्टींची : शिट्टी घुमणारआ. जयंत पाटील यांच्या प्रचार सभांमधून खा. शेट्टी यांची शिट्टी घुमणार आहे. दोघांपुढे भाजपचा टिकाव लागणार का, हे येणारा काळ ठरवेल. पेठनाक्यावरील महाडिक व वाळव्याचे नायकवडी यांनी स्वत:चे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि संस्थांचा विकास साधण्यासाठी गरज पडेल त्या नेत्याला जवळ केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यातच राहिली आहे.