शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापालिकेत बहुमत भाजपचे अन्‌ इच्छुकांची गर्दी राष्ट्रवादीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेत सत्ता भाजपची, अडीच वर्षे महापौर भाजपचा, तरीही सत्ताधाऱ्यांच्या महापौर निवडीवरून सध्या तरी शांतता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेत सत्ता भाजपची, अडीच वर्षे महापौर भाजपचा, तरीही सत्ताधाऱ्यांच्या महापौर निवडीवरून सध्या तरी शांतता दिसत आहे. दुसरीकडे केवळ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीमध्ये मात्र महापौर पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रम करतील आणि महापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, म्हणून अनेकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत. दुसरीकडे महापालिकेत राष्ट्रवादीचा मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसला मात्र कुणीच विचारेना झाले आहे.

महापालिकेत भाजपचे ४३, काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. विद्यमान महापौर सुतार यांची मुदत ८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे यंदा महापौर पदासाठी भाजपसह सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी दिसत आहे. तशीच गर्दी राष्ट्रवादीकडे दिसत आहे. राष्ट्रवादीकडे केवळ १५ इतके संख्याबळ आहे, तर बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसच्या २० नगरसेवकांचा पाठिंबा राष्ट्रवादीने गृहित धरला आहे. त्यात राज्यात सत्तांतर झाल्यापासून महापालिकेतही सत्ताबदल होईल, अशी स्वप्ने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पडू लागली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी महापालिकेत लक्ष घातले तर भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल, अशी आसही राष्ट्रवादीला लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी आधी महापौर पदाची तयारी चालविली होती. पण आता त्यांनाही पक्षातून आव्हाने मिळू लागली आहेत. नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, शेडजी मोहिते या ज्येष्ठ नगरसेवकांनीही महापौर पदाची निवडणूक लढविण्याची इच्छा जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने तयारी चालविली असताना, त्यांचा मित्र असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. त्यांना राज्यपातळीवरील नेत्यांचे बळ नसल्याने काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे.

चौकट

बावडेकरांच्या राजीनाम्याची धाकधुक

भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते महापौर पदाच्या शर्यतीत आले आहेत. त्यामुळे इतर इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. सध्या भाजपकडून निरंजन आवटी, धीरज सुर्यवंशी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सध्या तरी भाजपच्या गडावर शांतता आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडे असलेले नगरसेवकांचे बळ पाहता, भाजपने सावध भूमिका घेतली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना टोललत ठेवले जाणार आहे.