शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’त फूट पाडण्याची भाजपची खेळी

By admin | Updated: May 26, 2015 00:55 IST

निवडीला काहींचा विरोध : सदाभाऊंऐवजी राजू शेट्टी यांना मंत्रीपद देण्याच्या हालचाली

अशोक पाटील -इस्लामपूर -जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचे लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. परंतु त्यांच्या या निवडीला काहींचा विरोध आहे. याला पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांना केंद्रातील राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या खेळ्या भाजपच्या काही नेत्यांच्यातून सुरू आहेत. यामागे फक्त स्वाभिमानी संघटनेत फूट पाडण्याचाच कट रचला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच राजू शेट्टी हे विजयी होणार, याची खात्री पटली होती. ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून परिचित असल्याने त्यांना देशाचे कृषीमंत्री पद मिळणार, अशी हवाही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पसरवली होती. यासाठी राजू शेट्टी यांनी दिल्लीत तळही ठोकला होता. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत शेट्टी यांची कोणीही दखल घेतली नाही. लोकसभा निवडणुकीतच स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हाढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांना कडवी झुंज दिली. खोत यांचा निसटता पराभव झाला असला, तरी त्यांचे भाजप नेत्यांनी मोठे कौतुक केले. याचेच बक्षीस म्हणून खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी खलबते झाली. परंतु यालाही बराच कालावधी गेल्याने खोत यांनी नाराजी व्यक्त करून भाजप सरकारवर तोफ डागली. उसाच्या एफआरपीवरून भाजप सरकार आणि स्वाभिमानी संघटनेतील दरी रुंदावेल का? अशीही हवा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाच्या लालसेपोटी ऊसदर आंदोलनाची आक्रमकता कमी केली. परंतु ज्या ऊस उत्पादकांच्या जिवावर निवडून आले, ते शेतकरी मात्र संघटनेवर नाराज झाले आहेत.सदाभाऊ खोत हे शिराळा मतदारसंघातील नेते आहेत. याच मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचाराच्या सभेत दिला होता. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी परिषदेत गडकरी यांनी पुन्हा एकदा आ. नाईक यांना मंत्रीपद देण्याचा पुनरुच्चार केला आहे. एका मतदारसंघात दोन मंत्रीपदे देण्यापेक्षा खोत यांच्याऐवजी शेट्टी यांना केंद्रात स्थान दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करता येईल, अशी चर्चा आहे. भाजपला स्वाभिमानी संघटनेत फूट पाडण्याची राजकीय खेळी असण्याची शक्यता आहे.आपणास मंत्रिपदाची संधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने शांतता बाळगली आहे. माझ्याऐवजी राजू शेट्टी यांना मंत्रीपद देण्याच्या हालचालीबाबत आपणास काहीही माहीत नाही. त्यांना संधी मिळाल्यास मला आनंदच होईल.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना