शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सांगलीत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ला भाजपचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:55 IST

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शहर सुधार समितीही मैदानात असली तरी सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे, तर भाजपपुढे चांगली कामगिरी करण्याचे ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शहर सुधार समितीही मैदानात असली तरी सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे, तर भाजपपुढे चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.एक आॅगस्टला मतदान व ३ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. महापालिकेत महाआघाडीची पाच वर्षे वगळता १५ वर्षे काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या गटाकडे सत्ता आहे. मदन पाटील आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे आता काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. आमदार विश्वजित कदम, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असून, त्यांनी राष्टÑवादीच्या हाकेला प्रतिसाद देत आघाडी केली आहे.काँग्रेसला ४० तर राष्टÑवादी २९ जागा लढवत आहे. पाच जागांवर या दोन पक्षातच मैत्रीपूर्ण लढत आहे. राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आ. जयंत पाटील यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.माजी आमदार संभाजी पवार गटाने शिवसेनेशी सवतासुभा घेत स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महापलिकेतील भ्रष्टाचारावर आवाज उठवणाऱ्या शहर सुधार समितीचे शिलेदारही लढत देत आहेत. सत्तेच्या या सारीपाटावर उत्कंठा वाढवत ३५ अपक्षांनी आघाडी केली आहे.यंदा १८ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन जागा आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रभागात ऐन पावसाळ्यात संपर्क साधताना उमेदवारांची दमछाक होत आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, आमदार पावसाळी अधिवेशनात गुंतले होते. त्यामुळे प्रचाराची खरी रणधुमाळी शेवटच्या आठवड्यातच दिसणार आहे.सत्तेसाठ भाजपची मोठी फौज कामालाएक खासदार, चार आमदारांच्या जोरावर भाजपने जिल्हा परिषद जिंकल्यानंतर आता महापालिकेची सत्ता खेचण्यासाठी मोठी फौज कामाला लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेनेतृत्व असून खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे त्यांच्या साथीला आहेत. भाजप सर्व ७८ जागा लढवत आहे.