शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

भाजपला टक्कर देण्याचे मिरजेत काँग्रेससमोर आव्हान-सर्वपक्षीय पाठिंब्यामुुळे भाजप उमेदवाराचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:38 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. गेल्या पाच वर्षात भाजपने ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत यश मिळविल्याने, भाजपला टक्कर देणे काँग्रेस

ठळक मुद्देमिरज विधानसभा

सदानंद औंधे ।मिरज : गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. गेल्या पाच वर्षात भाजपने ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत यश मिळविल्याने, भाजपला टक्कर देणे काँग्रेस उमेदवारासाठी आव्हान ठरणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भाजपवरील नाराजी व आ. सुरेश खाडे व खा. संजयकाका पाटील यांच्यातील छुप्या संघर्षाचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेस उमेदवाराला करावा लागणार आहे.

गत लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागासह शहरातही भाजपने मताधिक्य मिळवून काँग्रेसला धक्का दिला. खा. संजय पाटील यांच्या विजयानंतर मिरज मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मिरज पूर्व भागात माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे काँग्रेस कार्यकर्ते आता खा. पाटील यांच्या गोटात आहेत. आ. सुरेश खाडे यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस व राष्टÑवादी नेत्यांशी खा. पाटील यांचे चांगले संबंध आहेत. त्याचा निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर मिरज पूर्व भागात काँग्रेस अस्तित्वहीन आहे. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी असल्याने खा. पाटील यांचा गट प्रभावी आहे.

मात्र गत निवडणुकीत भाजपचे काम करणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे खा. पाटील यांच्यावर नाराज आहेत. मिरज पूर्व भागातील अनेक गावात घोरपडे यांच्या विकास आघाडीचे अस्तित्व आहे. घोरपडे गट यावेळी काँग्रेस उमेदवाराला मदत करण्याची शक्यता आहे. आ. खाडे यांचाही खासदारांसोबत छुपा संघर्ष आहे. मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्याने दोघांतील संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे. खा. पाटील यांनी काँग्रेस व राष्टÑवादीतील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आणले आहे. मिरज पूर्व भागात एरंडोली व भोसे वगळता सर्वच ठिकाणी भाजपने यश मिळविले आहे. शहरातही महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविल्याने गेल्या पाच वर्षात भाजपची ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांना आव्हान देणे काँग्रेस उमेदवारासाठी कठीण ठरणार आहे.कॉँग्रेसमधील गटबाजी अडचणीचीमिरज विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. गत लोकसभा निवडणुकीत या इच्छुक उमेदवारांना जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र इच्छुक उमेदवारांनाही तेथे प्रभाव पाडता आला नाही. इच्छुक उमेदवार काँग्रेसमधील वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थक असून त्यांच्या परस्परांवर कुरघोड्या सुरू असल्याने, काँग्रेसमधील गटबाजी उमेदवारासाठी अडचणीची ठरणार आहे.घोरपडेंचा पाठिंबा कोणाला?मिरज पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपने पंचायत समितीत सत्ता मिळविली आहे. मात्र पंचायत समितीत पदाधिकारी निवडीवरून खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्यात संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितराव घोरपडे समर्थक शालन भोई यांची सभापतीपदी निवड केली आहे. मात्र घोरपडे लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली