शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:03 IST

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र ...

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केला.देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना रासपने पाठिंबा दिल्याचे सांगून जानकर म्हणाले की, गत लोकसभेवेळी एक जागा रासपला दिली होती, तर विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. यंदाही आम्ही बारामती, माढा मतदारसंघाची मागणी केली होती. युद्धात आम्ही हरलो असलो, तरी तहात जिंकलो आहे. पक्षाचे दोन आमदार, ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ नगराध्यक्ष आहेत. पुढील विधानसभेवेळी जागा वाढवून घेऊ.मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षण देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याबाबत जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. तेव्हा समाजातील तरुणांचे जीव वाचविण्यासाठी मी, फडणवीस, पंकजा मुंडे आंदोलकांना भेटलो, तेव्हा असे आश्वासन दिले होते. पण चळवळीत बोलणे वेगळे व संसदीय कार्यपद्धती वेगळी असते, याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली. मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणही लटकू नये, यासाठी सर्व अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार यात शंका नाही.भाजप सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. धनगर समाजासाठी स्वतंत्र बजेट दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीपालन महामंडळाला मी ५० कोटीचा निधी दिला. आता सरकारकडून एक हजार कोटीची तरतूद केली जाणार आहे, असेही जानकर म्हणाले.मला गुलाल नाही, तरीही समाधानलोकसभेच्या तीन ते चार निवडणुका मी लढविल्या. अगदी सांगलीतूनही निवडणूक लढलो आहे. पण मला कधीच गुलाल लागला नसला तरी, नाराज नाही. समाजाला प्रकाश देण्याचे काम आपण केल्याचे जानकर म्हणाले.पडळकरांचा विषय संपलागोपीचंद पडळकर यांच्याविषयी विचारता ते म्हणाले की, ते माझ्यासोबत होते, तेव्हा कौतुक करीत. आता विरोधात गेल्यावर टीका करणारच. रासपमधून गेल्यानंतर माझ्यासाठी त्यांचा विषय संपला आहे. त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही.