शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:03 IST

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र ...

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केला.देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना रासपने पाठिंबा दिल्याचे सांगून जानकर म्हणाले की, गत लोकसभेवेळी एक जागा रासपला दिली होती, तर विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. यंदाही आम्ही बारामती, माढा मतदारसंघाची मागणी केली होती. युद्धात आम्ही हरलो असलो, तरी तहात जिंकलो आहे. पक्षाचे दोन आमदार, ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ नगराध्यक्ष आहेत. पुढील विधानसभेवेळी जागा वाढवून घेऊ.मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षण देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याबाबत जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. तेव्हा समाजातील तरुणांचे जीव वाचविण्यासाठी मी, फडणवीस, पंकजा मुंडे आंदोलकांना भेटलो, तेव्हा असे आश्वासन दिले होते. पण चळवळीत बोलणे वेगळे व संसदीय कार्यपद्धती वेगळी असते, याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली. मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणही लटकू नये, यासाठी सर्व अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार यात शंका नाही.भाजप सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. धनगर समाजासाठी स्वतंत्र बजेट दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीपालन महामंडळाला मी ५० कोटीचा निधी दिला. आता सरकारकडून एक हजार कोटीची तरतूद केली जाणार आहे, असेही जानकर म्हणाले.मला गुलाल नाही, तरीही समाधानलोकसभेच्या तीन ते चार निवडणुका मी लढविल्या. अगदी सांगलीतूनही निवडणूक लढलो आहे. पण मला कधीच गुलाल लागला नसला तरी, नाराज नाही. समाजाला प्रकाश देण्याचे काम आपण केल्याचे जानकर म्हणाले.पडळकरांचा विषय संपलागोपीचंद पडळकर यांच्याविषयी विचारता ते म्हणाले की, ते माझ्यासोबत होते, तेव्हा कौतुक करीत. आता विरोधात गेल्यावर टीका करणारच. रासपमधून गेल्यानंतर माझ्यासाठी त्यांचा विषय संपला आहे. त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही.