शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:03 IST

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र ...

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केला.देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना रासपने पाठिंबा दिल्याचे सांगून जानकर म्हणाले की, गत लोकसभेवेळी एक जागा रासपला दिली होती, तर विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. यंदाही आम्ही बारामती, माढा मतदारसंघाची मागणी केली होती. युद्धात आम्ही हरलो असलो, तरी तहात जिंकलो आहे. पक्षाचे दोन आमदार, ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ नगराध्यक्ष आहेत. पुढील विधानसभेवेळी जागा वाढवून घेऊ.मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षण देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याबाबत जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. तेव्हा समाजातील तरुणांचे जीव वाचविण्यासाठी मी, फडणवीस, पंकजा मुंडे आंदोलकांना भेटलो, तेव्हा असे आश्वासन दिले होते. पण चळवळीत बोलणे वेगळे व संसदीय कार्यपद्धती वेगळी असते, याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली. मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणही लटकू नये, यासाठी सर्व अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार यात शंका नाही.भाजप सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. धनगर समाजासाठी स्वतंत्र बजेट दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीपालन महामंडळाला मी ५० कोटीचा निधी दिला. आता सरकारकडून एक हजार कोटीची तरतूद केली जाणार आहे, असेही जानकर म्हणाले.मला गुलाल नाही, तरीही समाधानलोकसभेच्या तीन ते चार निवडणुका मी लढविल्या. अगदी सांगलीतूनही निवडणूक लढलो आहे. पण मला कधीच गुलाल लागला नसला तरी, नाराज नाही. समाजाला प्रकाश देण्याचे काम आपण केल्याचे जानकर म्हणाले.पडळकरांचा विषय संपलागोपीचंद पडळकर यांच्याविषयी विचारता ते म्हणाले की, ते माझ्यासोबत होते, तेव्हा कौतुक करीत. आता विरोधात गेल्यावर टीका करणारच. रासपमधून गेल्यानंतर माझ्यासाठी त्यांचा विषय संपला आहे. त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही.