शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भाजपने लसींचे राजकारण थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा ...

सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा होत आहे तरीही राज्यात गतीने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे भाजपने केंद्र सरकारकडून अधिक लसी मिळविण्यासाठी प्रयत्न करत, लसीकरणावरून राजकारण थांबवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात केवळ जालना जिल्ह्यातच सर्वाधिक लसींचे वितरण करण्यात आल्याचा आरोप केला होता यावर पाटील यांनी प्रत्युत्तर देत राजकारण न करण्याचे आवाहन केले.

पाटील म्हणाले, लसीकरणाचे वाटप केंद्र सरकारकडून होत असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या पुरवठ्यानुसारच वाटप केले जात आहे. त्यात लसींचे वाटप करताना कुठेही जिल्ह्याचे नाव त्यावर टाकले जात नाही. जालना येथे लसी एकत्रित केल्यानंतर त्यांचे संपूर्ण मराठवाड्यात वितरण करण्यात आले आहे. मात्र, शेलार हे विसरले असावेत.

राज्याच्या मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. त्यामुळे अनेकांना पहाटे पाच वाजेपासून लसीकरण केंद्रावर जाऊन बसावे लागत आहे. दुसरा डोससाठी ८४ दिवसांची अट घालण्यात आली. मात्र, यानंतरही अनेकांना लस मिळाली नाही. त्यामुळे शेलार आणि भाजपनेही कुठली लस कुठे गेली हे बघत बसण्यापेक्षा राज्यासाठी लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

चौकट

प्रत्येक गोष्टीवर बोलणे आवश्यक नाही

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या विधानाबद्दल जयंत पाटील म्हणाले की, नाना पटोले नेमके काय बोलले याची मला माहिती नाही. आणि प्रत्येक गोेष्टीवर बाेलले पाहिजे, असेही नाही.