शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने लसींचे राजकारण थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा ...

सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा होत आहे तरीही राज्यात गतीने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे भाजपने केंद्र सरकारकडून अधिक लसी मिळविण्यासाठी प्रयत्न करत, लसीकरणावरून राजकारण थांबवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात केवळ जालना जिल्ह्यातच सर्वाधिक लसींचे वितरण करण्यात आल्याचा आरोप केला होता यावर पाटील यांनी प्रत्युत्तर देत राजकारण न करण्याचे आवाहन केले.

पाटील म्हणाले, लसीकरणाचे वाटप केंद्र सरकारकडून होत असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या पुरवठ्यानुसारच वाटप केले जात आहे. त्यात लसींचे वाटप करताना कुठेही जिल्ह्याचे नाव त्यावर टाकले जात नाही. जालना येथे लसी एकत्रित केल्यानंतर त्यांचे संपूर्ण मराठवाड्यात वितरण करण्यात आले आहे. मात्र, शेलार हे विसरले असावेत.

राज्याच्या मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. त्यामुळे अनेकांना पहाटे पाच वाजेपासून लसीकरण केंद्रावर जाऊन बसावे लागत आहे. दुसरा डोससाठी ८४ दिवसांची अट घालण्यात आली. मात्र, यानंतरही अनेकांना लस मिळाली नाही. त्यामुळे शेलार आणि भाजपनेही कुठली लस कुठे गेली हे बघत बसण्यापेक्षा राज्यासाठी लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

चौकट

प्रत्येक गोष्टीवर बोलणे आवश्यक नाही

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या विधानाबद्दल जयंत पाटील म्हणाले की, नाना पटोले नेमके काय बोलले याची मला माहिती नाही. आणि प्रत्येक गोेष्टीवर बाेलले पाहिजे, असेही नाही.