शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

भाजपने लसींचे राजकारण थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा ...

सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा होत आहे तरीही राज्यात गतीने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे भाजपने केंद्र सरकारकडून अधिक लसी मिळविण्यासाठी प्रयत्न करत, लसीकरणावरून राजकारण थांबवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात केवळ जालना जिल्ह्यातच सर्वाधिक लसींचे वितरण करण्यात आल्याचा आरोप केला होता यावर पाटील यांनी प्रत्युत्तर देत राजकारण न करण्याचे आवाहन केले.

पाटील म्हणाले, लसीकरणाचे वाटप केंद्र सरकारकडून होत असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या पुरवठ्यानुसारच वाटप केले जात आहे. त्यात लसींचे वाटप करताना कुठेही जिल्ह्याचे नाव त्यावर टाकले जात नाही. जालना येथे लसी एकत्रित केल्यानंतर त्यांचे संपूर्ण मराठवाड्यात वितरण करण्यात आले आहे. मात्र, शेलार हे विसरले असावेत.

राज्याच्या मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. त्यामुळे अनेकांना पहाटे पाच वाजेपासून लसीकरण केंद्रावर जाऊन बसावे लागत आहे. दुसरा डोससाठी ८४ दिवसांची अट घालण्यात आली. मात्र, यानंतरही अनेकांना लस मिळाली नाही. त्यामुळे शेलार आणि भाजपनेही कुठली लस कुठे गेली हे बघत बसण्यापेक्षा राज्यासाठी लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

चौकट

प्रत्येक गोष्टीवर बोलणे आवश्यक नाही

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या विधानाबद्दल जयंत पाटील म्हणाले की, नाना पटोले नेमके काय बोलले याची मला माहिती नाही. आणि प्रत्येक गोेष्टीवर बाेलले पाहिजे, असेही नाही.