शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

मतदान यंत्र घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता

By admin | Updated: April 16, 2017 22:52 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चातर्फे मिरजेत व्याख्यान

मिरज : मतदान यंत्रे विश्वसनीय व पारदर्शक नाहीत. मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच देशात भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसनेही यापूर्वी हीच पध्दत वापरली होती. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाद्वारे राजकीय फायद्यासाठी तीन तलाक व समान नागरी कायद्याची चर्चा भाजपकडून सुरू असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सांगितले. भारत मुक्ती मोर्चातर्फे भीमा कोरेगाव मुक्ती संग्राम द्विशताब्दी व छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मिरजेत आयोजित कार्यक्रमात वामन मेश्राम यांनी, भावनिक मुद्द्यांवर ध्रुवीकरण करून बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. वामन मेश्राम म्हणाले, मतदान यंत्राविरोधात भाजपचे सुब्रम्हण्यम स्वामी यापूर्वी न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायालयाने मतदानाची नोंद होणारे व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्याचे आदेश दिले होते. मात्र काँग्रेसने न्यायालयाचा आदेश जुमानला नाही. मतदान यंत्राविरोधात बामसेफ सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर निवडणूक आयोगानेही पारदर्शक मतदान प्रक्रियेची जबाबदारी झटकली. ते म्हणाले, कोणतीही मुस्लिम महिला न्यायालयात गेली नसताना, सर्वोच्च न्यायालयात तीन तलाक प्रथेबाबत सुनावणी सुरू आहे. देशातील पाच कोटी मुस्लिम महिलांनी शरीयत कायदा मान्य असल्याचे सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना दिले आहे. तीन तलाक रद्द केल्यानंतर नवीन कायद्यामुळे मुस्लिम महिला हिंसाचाराला बळी पडण्याची भीती आहे. तीन तलाक व समान नागरी कायद्याची चर्चा राजकीय फायद्यासाठी सुरू आहे. राज्यघटनेने अल्पसंख्याक, आदिवासी, भटके विमुक्तांना त्यांच्या धार्मिक पध्दतीने आचरणाचे स्वतंत्र दिले असताना, त्यावर अतिक्रमण करता येणार नाही. देशात ५२ टक्के ओबीसींची संख्या आहे. त्यांनाही एससी, एसटीप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी ओबीसींची जनगणना आवश्यक आहे. मात्र जनगणना केल्यास ओबीसींची सत्ता येईल, या भीतीने ओबीसींची जनगणना करण्यात येत नसल्याचे मेश्राम यांनी सांगितले. उद्योजक राजेंद्र खाडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्पादन शुल्क सहआयुक्त अश्विनकुमार उके, मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती जुबेर साहब, फादर पास्टर जोएल पळसकर, लिंगायत सभेचे नामदेव कोरे यांचीही भाषणे झाली. मनोज लोकरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत नागवंशी यांनी सूत्रसंचालन केले. अरूण खरमाटे, प्रभाकर सनमडीकर, दत्ताजीराव नलवडे, उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, नामदेव करगणे, पृथ्वीराज पवार उपस्थित होते. (वार्ताहर)