शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

भाजपचं मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:09 IST

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा ...

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा सवाल विचारला जात होता. अर्थातच चर्चेच्या केंद्रस्थानी भाजप आणि कदम घराण्याचे कट्टर विरोधक देशमुख होते. कारण कदम-देशमुखांचा दुरंगी सामना १९८५ पासून चालत आलेला. त्यामुळं आता काय होणार, हे विचारलं जाणं, स्वाभाविकच होतं. काँग्रेसनं विश्वजित यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि राष्टÑवादीनं पाठिंबा जाहीर केला. पण भाजपनं मागच्या बुधवारी पत्ते ‘ओपन’ केले... तेही अर्धवटच. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचं नाव पुढं करण्याची चाल भाजपनं खेळली. खासदार-चार आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनानं अर्जही भरला. त्यातून कार्यकर्ते रिचार्ज झाले... तयारीला लागले....पण अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेतली नेत्यांची भाषणं भाजपच्या चालीचा अंदाज देऊन जात होती. ‘पक्षानं कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्याच्याशी बांधील आहोत...’ असं प्रत्येकजण सांगत होता, अगदी देशमुखही! तो ‘कोणताही’ निर्णय म्हणजे काय होतं, हे आता समजलं! विशेष म्हणजे अर्ज गुरुवारी भरल्यानंतर रविवारपर्यंत देशमुख गटाची कोणतीच हालचाल दिसत नव्हती. ना सभा, ना बैठका, ना चर्चा! पलूस-कडेगावात नेहमी देशमुखांबोबत असलेले राष्टÑवादीचे अरुण लाडही ‘सोमवारनंतर बघू,’ असं सांगत होते. सोमवारी या नाट्याची अखेर झाली. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्र्यांचा सांगावा घेऊन आलेले. त्यांनी जिल्ह्याच्या कोअर कमिटीसह देशमुखांना निर्णय सांगितला... आणि अर्ज मागे घेण्यात आला. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावच्या पोटनिवडणुकीत भाजपने आर. आर. आबांच्या पत्नीला पाठिंबा दिला होता. तोही अर्ज भरण्याचं नाटक वगैरे न करता. मग इथं पाठिंबा द्यायचं ठरलंच होतं, तर अर्ज का भरला, आम्हाला तोंडावर का पाडलं, असा सवाल लढाईच्या तयारीत असलेले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते करणार नाहीत का? पण पक्षाचा उदोउदो आणि मार्केटिंग करण्याचा डाव आखलेल्या वरिष्ठांना ते कसं समजणार?पतंगरावांच्या निधनामुळे विश्वजित यांच्या पाठीशी सहानुभूती राहणार, हे भाजपला पक्कं माहीत होतं. शिवाय पुढील विधानसभा निवडणूक वर्षभरात होतेय. त्यामुळं वर्षभरात दोनदा शक्ती खर्च करण्यापेक्षा पुढच्यावेळीच ताकद लावावी, असं स्पष्ट मत भाजपमधल्या चाणक्यांनी मांडलं होतं. तेव्हाच सगळं ठरलं होतं... पण त्यातूनही संधी साधता येते का, हे पाहिलं गेलं.यादरम्यान पद्धतशीर वातावरण तापवलं गेलं. १९९६ मध्ये तत्कालीन आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पतंगराव कदम यांनी निवडणूक बिनविरोध केली नव्हती. हा मुद्दा उचलण्यात आला. तो सर्वदूर पसरवण्यात आला. आपण रिंगणात उतरणारच, असा शड्डू ठोकत कार्यकर्ते आणि समर्थकांना चेतवण्यात आलं. मधूनच ‘पालघर आम्हाला सोडा, पलूस-कडेगाव आम्ही सोडतो’, असा न चालणारा अतार्किक पत्ता टाकला गेला. दबावतंत्रात माहीर असलेल्या भाजपनं काँग्रेसला हवेवर ठेवलं. एकीकडं संग्रामसिंहांच्या भविष्यातील वाटचालीसाठी केलेली ही पेरणी होती, तर दुसरीकडं पक्षाचा उदोउदो करण्यासाठी मुद्दाम मिळवण्यात आलेली संधी होती.जाता-जाता : पलूस-कडेगावच्या राजकीय स्थितीचा नेमका अंदाज भाजपला आला. सहानुभूतीच्या लाटेत आपण टिकणार नाही, याची खात्री असल्यानंच इथं माघार घ्यायचं ठरलं. माघारीमुळं राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणेचा खर्च, वेळ आणि मेहनत वाचली, असा मेसेज जाईल, पक्षाची प्रतिमाही उंचावेल, असा अंदाज बांधला गेला. विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास आणि त्याच्या घरातला उमेदवार उभा असल्यास तिथं उमेदवार उभा न करण्याची परंपरा भाजपनंच पाळल्याचे नगारे वाजवायला सुरुवात झाली... याच मार्केटिंगसाठी होता सगळा अट्टहास!