शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

भाजप, जनसुराज्यला पक्षवाढीचे आव्हान; : पक्षांना अपेक्षित यश नाही; जनसुराज्यच्या राजकारणाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:20 IST

शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता.

ठळक मुद्देशिरोळ विधानसभा मतदारसंघ

संदीप बावचे।जयसिंगपूर : शिरोळ विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी १५ वर्षांनंतर जनसुराज्यच्या माध्यमातून लढविलेली ही निवडणूक पक्षाला बळ देणारी ठरली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश मिळाले असले, तरी पक्षाची नव्याने पेरणी या निमित्ताने झाली आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षातील नेत्यांसमोर पक्षवाढीचे आव्हान असून, आगामी राजकारणाची दिशा कशी ठरते, यावरच पक्षाचे देखील भवितव्य ठरणार आहे.

शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता. भाजपचे नेते व ‘गोकुळ’चे संचालक अनिलकुमार यादव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेतला. यादव यांच्या उमेदवारीतून शिवसेना विरोधात बंडखोरी स्पष्ट झाली होती. शिरोळ विधानसभा निवडणूक जनसुराज्य पक्षामुळे चौरंगी झाली. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी पक्षाने घेतलेल्या जाहीर सभांनी गर्दीचा उच्चांक देखील मोडला होता. मात्र, निकालानंतर त्याचे रूपांतर मतात दिसून आले नाही. यादव यांच्या निमित्ताने १५ वर्षांनंतर जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून भाकरी परतण्याचे आवाहन पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी जयसिंगपूर येथील सभेत केले होते. शिवाय कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी या निवडणुकीत उल्हास पाटील यांना पाडणार हा केलेला दावा देखील यशस्वी करून दाखविला.

निवडणुकीत डांगे यांच्याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी विरोधी उमेदवारांवर टीकेची झोडदेखील उठविली होती. निवडणुकी दरम्यान घेण्यात आलेल्या जयसिंगपूरच्या सभेत ‘तुमचं काय चुकलं’ हे सांगणाऱ्या निंबाळकर यांना देखील मतदारांनी यड्रावकर हेच बरोबर आहेत, अशी मतपेटीतून मतदारांनी चपराक दिली. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांनी यादव यांना स्वीकारले नसल्याचे आणि नेत्यांची बेरजेची गणिते चुकल्याचे दिसून आले. १५ वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसुराज्य पक्षाने भाजपच्या मदतीने शिरोळच्या राजकीय पटलावर नवीन नेत्यांच्या माध्यमातून पट मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी आगामी काळात नव्या नेतृत्वावर पक्षवाढीचे आव्हान असणार आहे. एकूणच विधानसभेचा निकाल नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला असून, आगामी राजकारणाची दिशा कशी ठरते? यावरच नेत्यांचे देखील भवितव्य ठरणार आहे.

भाजपवर थेट आरोपविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे काही नगरसेवक, कार्यकर्ते जनसुराज्य पक्षाच्या प्रचारात दिसले होते. खासदार संजय मंडलिक यांनीही शिवसेनेचे उल्हास पाटील यांचा पराभव होण्यास भाजपची ‘बी’ टीमच कारणीभूत ठरल्याचा थेट आरोप केला आहे. निवडणूक निकालानंतर जनसुराज्य पक्षाच्या प्रचारात दिसलेले पदाधिकारी जनसुराज्य पक्षातच राहणार की पुन्हा भाजपवासी होणार याबाबतही उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण