शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भाजप, जनसुराज्यला पक्षवाढीचे आव्हान; : पक्षांना अपेक्षित यश नाही; जनसुराज्यच्या राजकारणाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:20 IST

शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता.

ठळक मुद्देशिरोळ विधानसभा मतदारसंघ

संदीप बावचे।जयसिंगपूर : शिरोळ विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी १५ वर्षांनंतर जनसुराज्यच्या माध्यमातून लढविलेली ही निवडणूक पक्षाला बळ देणारी ठरली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश मिळाले असले, तरी पक्षाची नव्याने पेरणी या निमित्ताने झाली आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षातील नेत्यांसमोर पक्षवाढीचे आव्हान असून, आगामी राजकारणाची दिशा कशी ठरते, यावरच पक्षाचे देखील भवितव्य ठरणार आहे.

शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता. भाजपचे नेते व ‘गोकुळ’चे संचालक अनिलकुमार यादव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेतला. यादव यांच्या उमेदवारीतून शिवसेना विरोधात बंडखोरी स्पष्ट झाली होती. शिरोळ विधानसभा निवडणूक जनसुराज्य पक्षामुळे चौरंगी झाली. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी पक्षाने घेतलेल्या जाहीर सभांनी गर्दीचा उच्चांक देखील मोडला होता. मात्र, निकालानंतर त्याचे रूपांतर मतात दिसून आले नाही. यादव यांच्या निमित्ताने १५ वर्षांनंतर जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून भाकरी परतण्याचे आवाहन पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी जयसिंगपूर येथील सभेत केले होते. शिवाय कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी या निवडणुकीत उल्हास पाटील यांना पाडणार हा केलेला दावा देखील यशस्वी करून दाखविला.

निवडणुकीत डांगे यांच्याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी विरोधी उमेदवारांवर टीकेची झोडदेखील उठविली होती. निवडणुकी दरम्यान घेण्यात आलेल्या जयसिंगपूरच्या सभेत ‘तुमचं काय चुकलं’ हे सांगणाऱ्या निंबाळकर यांना देखील मतदारांनी यड्रावकर हेच बरोबर आहेत, अशी मतपेटीतून मतदारांनी चपराक दिली. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांनी यादव यांना स्वीकारले नसल्याचे आणि नेत्यांची बेरजेची गणिते चुकल्याचे दिसून आले. १५ वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसुराज्य पक्षाने भाजपच्या मदतीने शिरोळच्या राजकीय पटलावर नवीन नेत्यांच्या माध्यमातून पट मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी आगामी काळात नव्या नेतृत्वावर पक्षवाढीचे आव्हान असणार आहे. एकूणच विधानसभेचा निकाल नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला असून, आगामी राजकारणाची दिशा कशी ठरते? यावरच नेत्यांचे देखील भवितव्य ठरणार आहे.

भाजपवर थेट आरोपविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे काही नगरसेवक, कार्यकर्ते जनसुराज्य पक्षाच्या प्रचारात दिसले होते. खासदार संजय मंडलिक यांनीही शिवसेनेचे उल्हास पाटील यांचा पराभव होण्यास भाजपची ‘बी’ टीमच कारणीभूत ठरल्याचा थेट आरोप केला आहे. निवडणूक निकालानंतर जनसुराज्य पक्षाच्या प्रचारात दिसलेले पदाधिकारी जनसुराज्य पक्षातच राहणार की पुन्हा भाजपवासी होणार याबाबतही उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण