शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी ती आली बेल्जियमहून

By admin | Updated: April 15, 2016 00:50 IST

खटावच्या माहेरवाशिणीची कहाणी : परदेशी पतीही वातावरणाने भारावला--गावकऱ्यांनाही त्यांचे अप्रूप

प्रताप महाडिक-- कडेगाव --आयुष्यभराचे सोबती झालेले ‘ते’ दोघे बेल्जियमहून थेट ‘तिच्या’ माहेरी खटाव तालुक्यात आले, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश देणाऱ्या महापुरुषाच्या जयंतीसाठी! गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आलेले हे जोडपे भेटले कडेगाव-खटावच्या सीमेवर. स्वाती कांबळे आणि पप्पेन हंसेन्स हे या दाम्पत्याचे नाव. स्वातीच्या मनात असलेली बाबासाहेबांच्या जयंतीची आस पाहून पप्पेन भारावून गेले...पूर्वाश्रमीची स्वाती मुकंद कांबळे ही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधच्या पायथ्याशी असलेल्या त्रिमली या गावची. तिचा जन्म मुंबईत झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. वडील गिरणी कामगार. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण घेतले. बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेली स्वाती कधीच खचली नाही. बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र तिला गप्प बसू देत नव्हता. मुंबई येथे निर्मला निकेतनमधून पदवीधर झालेली स्वाती पुढील शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली. तत्पूर्वी भारतीय दलित महिलांवरील अन्याय-अत्याचाराने ती सुन्न झाली होती आणि तोच तिच्या अभ्यासाचा विषयही झाला. स्वित्झर्लंड येथे जीनिव्हा विद्यापीठात ती सध्या पीएच.डी. करीत आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील दलित महिलांवरील अन्याय, अत्याचाराबाबत तिने सर्वेक्षण करून प्रबंध सादर केला आहे. दरम्यान, तिला स्वित्झर्लंडमध्ये बेल्जियम येथील पप्पेन हंसेन्स भेटले. स्वातीच्या बेल्जियममधील मैत्रिणीने पप्पेन यांची ओळख करून दिली. ओळखीचे प्रेमात आणि प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले. पप्पेनशी तिने १२ डिसेंबर २०१५ रोजी तेथेच नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर नुकताच म्हणजे १५ दिवसांपूर्वी मुंबई येथे बौद्ध पध्दतीने विवाह केला. या विवाहास दोघांच्याही नातेवाईकांनी पाठिंबा दिला. बेल्जियम सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या पप्पेन यांना सामाजिक कार्याची विलक्षण आवड आहे. रात्रंदिवस ते बालकामगारांच्या प्रश्नात व्यस्त असतात. भारतातील संस्कृतीने आपण भारावून गेल्याचे ते सांगतात. डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेशी आपण स्वातीमुळे जोडलो गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वेळ व्यतित करायचा, असे ठरवून दोघेही त्रिमलीला भेट देण्यासाठी आले होते. (वर्ताहर)कडेपूर-पुसेसावळी रस्त्यावर कडेगाव-खटाव तालुक्याच्या सरहद्दीवर एका कालव्यात पप्पेन यांना पोहण्याचा मोह टाळता आला नाही. गुरुवारी सगळीकडे निर्माण झालेले ‘भीममय’ वातावरण पाहून आणि स्वातीची आस पाहून ते भारावून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जगभरात रुजण्याची गरज आहे, असे पप्पेन व स्वाती यांनी सांगितले. विशेष म्हणजे दोघांनाही समाजसेवा करून बालकामगारांचे अश्रू पुसायचे आहेत. त्यांच्या व्यथा-वेदनांवर फुंकर घालायची आहे. त्यांच्या या जिद्दीचे कडेगाव-खटाव तालुक्यातील गावकऱ्यांना अप्रूप वाटले नसते तरच नवल!