शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

बायपास घाटावर विसर्जनास बंदी

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

महापालिकेची कारवाई : गणेश भक्तांच्या मृत्यूनंतर जाग

सांगली : शहरातील बायपास रोडजवळील कृष्णा नदीच्या घाटावर विसर्जन करताना दोन गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नगरसेवक शेखर माने व इतरांनी गणेश विसर्जनासाठी हा घाट बंद करण्याची मागणी केली. अखेर प्रशासनानेही या मागणीची दखल घेत या घाटावर विसर्जनास बंदी घातली आहे. शिवाय शिवशंभो चौकातून कर्नाळ चौकीमार्गे विसर्जनासाठी रस्ता खुला केला आहे. गणेश विसर्जनाच्या पाचव्यादिवशी इस्लामपूर बायपास पुलाजवळील घाटावर अहिल्यानगरमधील दोन तरुण विसर्जनासाठी गेले होते. गणेशाचे विसर्जन करीत असताना या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पुलाखालील घाटावर विसर्जन धोकादायक झाले होते. महापालिकेच्या दफ्तरी विसर्जनासाठी केवळ सरकारी घाटाचीच नोंद आहे. तरीही नदीकाठच्या माई घाट, विष्णू घाटावरही विसर्जन होते. या घाटावर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन होत असल्याने घरगुती गणपती विसर्जनासाठी नागरिक इतर घाटांवर जातात. त्यामुळेच बायपास पुलाखालील घाटावर घरगुती गणेशाचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होते; पण या घाटावर महापालिका, पोलीस प्रशासनाने विसर्जनाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. दोन गणेश भक्तांच्या मृत्यूनंतर या घाटावर विसर्जनास बंदी घालण्याची मागणी होत होती. नगरसेवक शेखर माने यांनी आयुक्त अजिज कारचे, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांची भेट घेऊन तशी मागणी केली. बुधवारी महापालिकेने बायपास पुलाजवळून घाटाकडे जाणारा रस्ता बंद केला. तसेच तिथे फलक लावून विजर्सनास बंदी घातली. चिंतामणीनगर, पंचशीलनगर, अहिल्यानगर भागातील विविध मंडळे व घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी हा घाट सोयीचा होता. त्यात शिवशंभो चौकातून कर्नाळ पोलीस चौकीकडे येणारा मार्ग पोलिसांनी बंद केला होता. या मार्गावर विसर्जन मिरवणुकीला बंदी होती. त्यामुळे या भागातील नागरिक व मंडळांना कॉलेज कॉर्नर, इंदिरा भुवनमार्गे सरकारी घाटावर जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन शेखर माने यांनी पोलिसांना विनंती करून विसर्जनासाठी शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी हा मार्ग खुला करून घेतला. (प्रतिनिधी)