शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

ऊसतोड मजूर, मुकादमांकडून कोट्यवधींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST

सांगली : गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ...

सांगली : गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ऊसतोडीसाठी लाखो रुपयांची उचल घ्यायची आणि ऐन हंगामात परागंदा व्हायचे, असे प्रकार सुरू आहेत. काही कारखान्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत.

जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांकडे दरवर्षी प्रत्येकी ४०० ते ५०० टोळ्यांचे करार होतात. सुमारे ५ ते ६ हजार टोळ्या येतात. एका टोळीत २० ते ५० मजूर असतात. वाहतूकदार संघटनेकडे १ हजार ६०० ऊस वाहनांची नोंद आहे. प्रत्येक मजूर ७० ते ८० हजारांची उचल घेतो. हंगामाआधी प्रत्येक मुकादमाला कारखान्याकडून सरासरी सात ते दहा लाख रुपये उचल मिळते.

जिल्ह्यात सामान्यत: बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर तसेच विजापूर, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यांतून ऊसतोड टोळ्या येतात. यंदा पुरेशा संख्येने टोळ्या आलेल्या नाहीत, त्याचा फटका ऊसतोडीला बसला आहे. ऊसतोड मंदगतीने सुरू आहे. यंत्राद्वारे ऊसतोडीवर मर्यादा आहेत. कमी क्षेत्राची तोड यंत्राने करणे परवडणारे नसल्याचा फायदा टोळ्या घेतात. त्यामुळे यंदा ऊस शेतकऱ्यांनी स्वत:च टोळ्या बनवून तोड सुरू केली आहे. पैरा पद्धतीने एकमेकांच्या शेतातील ऊस तोडून कारखान्याला पाठविला जात आहे.

चौकट

चांगल्या पाऊसमानामुळे कामगारांची पाठ

गेल्या दोन वर्षांपासून विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार शेतीमध्येच रमले आहेत. त्यांनी स्वत:च ऊस लागवड सुुरू केली आहे, त्यामुळेही कामगारांनी पश्चिम महाराष्ट्राकडे पाठ फिरविली आहे.

चौकट

आगाऊची पद्धत बंद करा

साखर आयुक्त शेखर गायकवाड पंधरवड्यापूर्वी कोल्हापूरला आले होते, तेव्हा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी त्यांची भेट घेतली. ऊसतोड कामगार व मुकादमांना हंगामापूर्वी आगाऊ उचल देण्याची पद्धत बंद करावी, काम होईल त्याप्रमाणे पैसे देण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे त्यांनी केली.

---------------