शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

विशाल पाटील यांना पाडण्यासाठी सुपारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी ...

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी घेतली होती, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांबरोबर झालेल्या छोट्याशा बैठकीत गटबाजीवर चर्चा करण्यात आली.

पटोले यांनी रविवारी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, इंग्रजांची अन्यायी, जुलमी सत्ता घालविण्यासाठी काँग्रेसची निर्मिती झाली; परंतु देशात पुन्हा एकदा इंग्रजांप्रमाणे राजवट सुरू झाली आहे. देशभरात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यासाठी मोठा लढा दिला. वसंतदादांनीही क्रांती लढ्यात गोळ्या झेलल्या, त्यामुळे सांगलीच्या काँग्रेसलाही मोठा इतिहास आहे. दुसरीकडे भाजप देशातील संविधानाविरोधात काम करीत आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांची जगण्याची कसरत सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांची पोटे भरणारी व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे.

काँग्रेसने कष्टाने देश उभारला असताना भाजप तो भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी क्रांतिकारकांनी गोळ्या झेलून, संघर्ष करून इंग्रजांची सत्ता उलथवली. आता केवळ काँग्रेसने एकसंध झाल्यास भाजपची इंग्रजांसारखीच सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तौफिक मुलाणी, नामदेवराव मोहिते, प्रा. शिकंदर जमादार, मनीषा रोटे, वहिदा नायकवडी, नगरसेवक मनोज सरगर, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

गटबाजीवर चर्चा

सांगली जिल्ह्यात काहीजण काँग्रेसच्या पराभवासाठी व भाजपचे लोक निवडून यावेत म्हणून काम करीत आहेत. विशाल पाटील यांचा पराभव अशाच लोकांकडून झाला आहे. येथे पराभव झाला नसता, पण अशा उपद्रवी लोकांमुळे तो झाला, असे पटोले म्हणाले. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याची तक्रार ऐकायला मिळाली; परंतु त्याला गटबाजी म्हणता येणार नाही, तर ती खऱ्याअर्थाने लोकशाही आहे, असेही ते म्हणाले.