शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील यांना पाडण्यासाठी सुपारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी ...

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी घेतली होती, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांबरोबर झालेल्या छोट्याशा बैठकीत गटबाजीवर चर्चा करण्यात आली.

पटोले यांनी रविवारी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, इंग्रजांची अन्यायी, जुलमी सत्ता घालविण्यासाठी काँग्रेसची निर्मिती झाली; परंतु देशात पुन्हा एकदा इंग्रजांप्रमाणे राजवट सुरू झाली आहे. देशभरात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यासाठी मोठा लढा दिला. वसंतदादांनीही क्रांती लढ्यात गोळ्या झेलल्या, त्यामुळे सांगलीच्या काँग्रेसलाही मोठा इतिहास आहे. दुसरीकडे भाजप देशातील संविधानाविरोधात काम करीत आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांची जगण्याची कसरत सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांची पोटे भरणारी व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे.

काँग्रेसने कष्टाने देश उभारला असताना भाजप तो भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी क्रांतिकारकांनी गोळ्या झेलून, संघर्ष करून इंग्रजांची सत्ता उलथवली. आता केवळ काँग्रेसने एकसंध झाल्यास भाजपची इंग्रजांसारखीच सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तौफिक मुलाणी, नामदेवराव मोहिते, प्रा. शिकंदर जमादार, मनीषा रोटे, वहिदा नायकवडी, नगरसेवक मनोज सरगर, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

गटबाजीवर चर्चा

सांगली जिल्ह्यात काहीजण काँग्रेसच्या पराभवासाठी व भाजपचे लोक निवडून यावेत म्हणून काम करीत आहेत. विशाल पाटील यांचा पराभव अशाच लोकांकडून झाला आहे. येथे पराभव झाला नसता, पण अशा उपद्रवी लोकांमुळे तो झाला, असे पटोले म्हणाले. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याची तक्रार ऐकायला मिळाली; परंतु त्याला गटबाजी म्हणता येणार नाही, तर ती खऱ्याअर्थाने लोकशाही आहे, असेही ते म्हणाले.