शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

विशाल पाटील यांना पाडण्यासाठी सुपारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी ...

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी घेतली होती, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांबरोबर झालेल्या छोट्याशा बैठकीत गटबाजीवर चर्चा करण्यात आली.

पटोले यांनी रविवारी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, इंग्रजांची अन्यायी, जुलमी सत्ता घालविण्यासाठी काँग्रेसची निर्मिती झाली; परंतु देशात पुन्हा एकदा इंग्रजांप्रमाणे राजवट सुरू झाली आहे. देशभरात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यासाठी मोठा लढा दिला. वसंतदादांनीही क्रांती लढ्यात गोळ्या झेलल्या, त्यामुळे सांगलीच्या काँग्रेसलाही मोठा इतिहास आहे. दुसरीकडे भाजप देशातील संविधानाविरोधात काम करीत आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांची जगण्याची कसरत सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांची पोटे भरणारी व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे.

काँग्रेसने कष्टाने देश उभारला असताना भाजप तो भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी क्रांतिकारकांनी गोळ्या झेलून, संघर्ष करून इंग्रजांची सत्ता उलथवली. आता केवळ काँग्रेसने एकसंध झाल्यास भाजपची इंग्रजांसारखीच सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तौफिक मुलाणी, नामदेवराव मोहिते, प्रा. शिकंदर जमादार, मनीषा रोटे, वहिदा नायकवडी, नगरसेवक मनोज सरगर, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

गटबाजीवर चर्चा

सांगली जिल्ह्यात काहीजण काँग्रेसच्या पराभवासाठी व भाजपचे लोक निवडून यावेत म्हणून काम करीत आहेत. विशाल पाटील यांचा पराभव अशाच लोकांकडून झाला आहे. येथे पराभव झाला नसता, पण अशा उपद्रवी लोकांमुळे तो झाला, असे पटोले म्हणाले. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याची तक्रार ऐकायला मिळाली; परंतु त्याला गटबाजी म्हणता येणार नाही, तर ती खऱ्याअर्थाने लोकशाही आहे, असेही ते म्हणाले.