शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

विशाल पाटील यांना पाडण्यासाठी सुपारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी ...

सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी घेतली होती, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांबरोबर झालेल्या छोट्याशा बैठकीत गटबाजीवर चर्चा करण्यात आली.

पटोले यांनी रविवारी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, इंग्रजांची अन्यायी, जुलमी सत्ता घालविण्यासाठी काँग्रेसची निर्मिती झाली; परंतु देशात पुन्हा एकदा इंग्रजांप्रमाणे राजवट सुरू झाली आहे. देशभरात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यासाठी मोठा लढा दिला. वसंतदादांनीही क्रांती लढ्यात गोळ्या झेलल्या, त्यामुळे सांगलीच्या काँग्रेसलाही मोठा इतिहास आहे. दुसरीकडे भाजप देशातील संविधानाविरोधात काम करीत आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांची जगण्याची कसरत सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांची पोटे भरणारी व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे.

काँग्रेसने कष्टाने देश उभारला असताना भाजप तो भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी क्रांतिकारकांनी गोळ्या झेलून, संघर्ष करून इंग्रजांची सत्ता उलथवली. आता केवळ काँग्रेसने एकसंध झाल्यास भाजपची इंग्रजांसारखीच सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तौफिक मुलाणी, नामदेवराव मोहिते, प्रा. शिकंदर जमादार, मनीषा रोटे, वहिदा नायकवडी, नगरसेवक मनोज सरगर, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

गटबाजीवर चर्चा

सांगली जिल्ह्यात काहीजण काँग्रेसच्या पराभवासाठी व भाजपचे लोक निवडून यावेत म्हणून काम करीत आहेत. विशाल पाटील यांचा पराभव अशाच लोकांकडून झाला आहे. येथे पराभव झाला नसता, पण अशा उपद्रवी लोकांमुळे तो झाला, असे पटोले म्हणाले. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याची तक्रार ऐकायला मिळाली; परंतु त्याला गटबाजी म्हणता येणार नाही, तर ती खऱ्याअर्थाने लोकशाही आहे, असेही ते म्हणाले.