शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

२००१ पूर्वीचीच निकाली निघणार

By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST

गुंठेवारीचा प्रश्न प्रलंबितच : राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

सांगली : गुंठेवारीचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला असून, केवळ २००१ पूर्वीचीच कायदेशीर असणारी प्रकरणे निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. २००१ पूर्वीची जिल्ह्यातील सुमारे पाच हजारहून अधिक प्रकरणे आता नियमित होणार असल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या वीस वर्षात गुंठेवारीचा प्रश्न फोफावला आहे. शेतजमिनीची बेकायदा फोड करुन नागरिकांनी आपल्या सोयीनुसार गुंठेवारीमध्ये घरे बांधून ते निवास करीत आहेत. हा गंभीर प्रश्न उद्भवल्यानंतर राज्य शासनाने एका अध्यादेशाद्वारे जानेवारी २००१ नंतरच्या गुंठेवारी खरेदी-विक्रीवर बंदी घातली. मुद्रांक घोटाळ्यामुळे २००१ पूर्वीचेही गुंठेवारीचे अनेक प्रस्ताव रखडले. यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये २००१ नंतरचे पंधरा हजारहून अधिक, तर २००१ पूर्वीचे सुमारे पाच हजारहून अधिक गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव रखडले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २००१ पूर्वीचे गुंठेवारीचे करारपत्र नोंदणी करुन घेण्यासाठी प्रशासनाकडून पत्र दिले जाणार आहे. या नोंदणीनंतर अकृषक कर भरुन एन ए (अकृषक) करण्याची प्रक्रिया तात्काळ केली जाणार आहे. त्यामुळे २००१ पूर्वीचे गुंठेवारीचे प्रस्ताव नियमितीकरण होण्यास मदत होणार आहे. २००१ नंतरची गुंठेवारी प्रक्रिया रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांनी परवानगी न घेताच घराचे बांधकाम केले आहे. त्यामुळे याबाबत शासन काय निर्णय घेणार, याकडे गुंठेवारीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)