शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आटपाडीकरांच्या पाण्याला मधमाशांचा अडथळा

By admin | Updated: December 15, 2015 00:45 IST

नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने : मोहोळ काढणाऱ्यांचा शोध; चाचणी रखडल्याने भटकंतीची वेळ

अविनाश बाड --- आटपाडी ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने’ या म्हणीप्रमाणे आटपाडीकरांच्या पाणीपुरवठा योजनेने अनेक अडथळे पार केल्यानंतर आता मधमाशांच्या मोहोळाचे विघ्न आले आहे. १६ कोटी खर्चाच्या, भारत निर्माण योजनेतून आटपाडीकरांसाठी केलेल्या या योजनेच्या पाण्याची चाचणी आता, सध्या जुन्या पाण्याच्या टाक्यांवर मधमाशांचे मोहोळ असल्याने थांबली आहे. ग्रामपंचायतीचे कारभारी, ‘कुणी मोहोळ काढता का मोहोळऽऽ?’ असे म्हणत मोहोळ काढणाऱ्यांच्या शोधात आहेत.आटपाडी गावाची वाढती लोकसंख्या आणि जुनाट झालेली पाणीपुरवठा योजना, यामुळे येथे पाणीटंचाई कायमचीच असते. त्यात आटपाडी तलावातून थेट सायफनने पाणी विहिरीत टाकून ते पाणी गावाला पुरविले जाते. भारत निर्माण योजनेतेतून जलशुध्दीकरण प्रकल्पासह नवी योजना झाल्याने गावाला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली. ही योजना थेट आटपाडी तलावातून पाणी आणून ते शुध्द करुन गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरवठा होणार आहे.या योजनेचे पाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या भवानी हायस्कूलच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या टाक्यांमध्ये सोडण्यात आले. हे पाणी जुन्या योजनेच्या तुलनेत कमी दाबाने पडत असल्याचे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कमी पाणी आल्याने टाक्या भरण्यास वेळ लागतो. त्यामुळे गावाला वेळेत पाणी मिळत नाही.वास्तविक जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे २० अश्वशक्तीच्या दोन मोटारी आहेत. नव्या योजनेत ४० अश्वशक्तीच्या पंपाने तलावाजवळील पाण्याच्या टाकीत पाणी सोडून ते सायफन पध्दतीने गावातील टाकीमध्ये सोडण्यात येत आहे. ‘सायफन’ने पाण्याचा दाब अधिक येणे अपेक्षित आहे. यावर प्रत्यक्षात टाकीवर दोन्हीही योजनांचे पाणी किती दाबाने पडते, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी अभियंत्यांना टाकीवर चढून पाहणी करावयाची आहे. पण भवानी हायस्कूलच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाक्या २० वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत. त्या टाक्यांवर मधमाशांनी मोहोळ तयार करून पिंगा घातला आहे. प्रत्येक टाकीला तीन ते चार मोहोळ आहेत. काही जुनाट मोहोळांनी टाकीला जुनाट दाढीचे स्वरुप दिले आहे. त्यामुळे कुणीही टाकीवर जाणाचा प्रयत्न केल्यास त्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजना होऊनही आटपाडीकरांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. नव्या योजनेचे पाणी कमी वेगाने टाक्यांमध्ये पडत असल्याची पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी टाकीवर प्रत्यक्ष जाण्यासाठी मोहोळ काढणाऱ्या माहीतगारांचा शोध घेत आहोत.- स्वाती सागर, सरपंच, ग्रामपंचायत आटपाडीटाकीत प्रत्यक्ष पाणी किती दाबाने पडते हे पाहिल्यानंतर, आवश्यक ती तांत्रिक सुधारणा करता येणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना टाक्यांवरील मोहोळ काढण्यास सांगितले आहे. ते काढताच २-३ दिवसात पाणी पुरवठा सुरू करणे शक्य आहे.- ए. आर. आत्तार, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, विटा.पाणी हवे असेल तर : आधी लगीन मधमाशांचेआटपाडीला पिण्याचे शुध्द पाणी मिळायचे असेल, तर आधी पाण्याच्या टाक्यांवरील मधमाशांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी मधमाशांवर मात करणाऱ्या शूरांच्या शोधात गावाचे कारभारी आहेत. या पाण्याच्या टाक्यांवर गेल्या २० वर्षात कुणीही चढलेले नाही. त्यामुळे पायऱ्याही निकामी झाल्या आहेत. गेल्या २० वर्षात या गावाला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्याही कधी धुतलेल्या नाहीत. नागरिकांची तरीही अस्वच्छ पाण्याबद्दल तक्रार नाही. कसले का असेना, पाणी मिळावे, एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.