शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सहकारी बँकांबाबत धोरणे आखताना खबरदारी हवी-- भगवंत आडमुठे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:00 IST

शेतकरी जिद्दीने शेतीचे चित्र बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना मदत करता येईल, अशी शासनाची धोरणे हवीत. - भगवंत आडमुठे

ठळक मुद्दे सिंचन योजनांमुळे शेतीचे चित्र बदलतेय

अविनाश बाड ।शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सहकारी बॅँकांना कर्जपुरवठा करता येत नाही. सिंचन योजनांमुळे शेतीचे चित्र बदलत आहे. शेतीपूरक कर्जपुरवठा केल्यास शेतकऱ्यांकडे पीक गेल्यावरच त्यांच्या हाती पैसे येणार असताना, महिन्याचा हप्ता आता आकारावा लागत आहे. शासनाने आणि रिझर्व्ह बॅँकेने सहकारी बॅँकांबाबत शेतकरीपूरक धोरणे आखण्याची गरज आहे, असे मत दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवंत आडमुठे यांनी व्यक्त केले.प्रश्न : सांगली जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी १० हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे, हे कसे शक्य झाले?उत्तर : सहकारी बॅँकांवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. ठेवींवर विमा आहे. राष्टÑीयीकृत बॅँकांच्या तुलनेत प्रत्यक्ष चांगली सेवा दिली जात आहे. राष्टÑीयीकृत बॅँकेत १५-१५ दिवस खाते उघडत नाहीत. नंतर १५ दिवसांनी चेकबुक मिळते. इथे आम्ही तासात खाते उघडून पुस्तक देतो. एक-दोन दिवसांत चेकबुक देतो. पॅनकार्ड आम्ही (सहकारी बॅँका) खर्च करून खातेदारांना काढून देतोय. तीन-तीन वर्षांचा आयकर परतावा आणि किचकट कागदपत्रे मागून गरजूंना हेलपाटे मारायला लावत नाही. गरजेच्या वेळी कर्ज देतो. त्यामुळे व्यवसाय आपोआप वाढू लागला.

प्रश्न : सध्या सहकारी बॅँकांपुढे कोणती आव्हाने आहेत?उत्तर : ठेवींवर सध्या सरासरी ९ टक्के व्याज द्यावे लागते. त्यामुळे कर्जाचा व्याजदर १२ ते १४ टक्के आकारावा लागतो. राष्टÑीयीकृत बॅँका ५ ते ७ टक्के व्याजदराने ठेवी घेतात. त्यामुळे ते ९ ते १० टक्के व्याजदराने कर्जे देतात. त्यामुळे मोठे कर्जदार राष्टÑीयीकृत बॅँकांना पसंती देतात. शसनाची सगळी खाती, सबसिडी खाती राष्टÑीयीकृत बॅँकेत आहेत. त्यामुळे त्यांना बिनव्याजी कोट्यवधींचा फंड मिळतो. सहकारी बॅँका ग्रामीण भागात जादा असल्याने नेट बॅँकिंग, मोबाईल बॅँकिंग, एटीएम सुविधा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. इंटरनेट सुविधा वेगवान मिळत नाही.शासनाकडून अपेक्षा काय?शासन आणि रिझर्व्ह बॅँक यापैकी एकाचेच सहकारी बॅँकांवर नियंत्रण हवे. दोघांचे बंधन सध्या आहे. दोघांचे नियम वेगवेगळे आहेत. दुहेरी नियंत्रण असल्याने अनेकदा काम करणे कठीण होते. एनपीएचा कालावधी १८० दिवसांचा करावा. सध्या एक लाखापर्यंत कर्ज जसे ई-कराराचा बोजा नोंदवून देता येते. तसे १० लाख कर्जापर्यंत देता यायला हवे. रजिस्टर मॉरगेज (गहाणखत)चा भुर्दंड कर्जदाराला पडणार नाही. नफ्यावरील आयकर १० टक्के असावा.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक