शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

सहकारी बँकांबाबत धोरणे आखताना खबरदारी हवी-- भगवंत आडमुठे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:00 IST

शेतकरी जिद्दीने शेतीचे चित्र बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना मदत करता येईल, अशी शासनाची धोरणे हवीत. - भगवंत आडमुठे

ठळक मुद्दे सिंचन योजनांमुळे शेतीचे चित्र बदलतेय

अविनाश बाड ।शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सहकारी बॅँकांना कर्जपुरवठा करता येत नाही. सिंचन योजनांमुळे शेतीचे चित्र बदलत आहे. शेतीपूरक कर्जपुरवठा केल्यास शेतकऱ्यांकडे पीक गेल्यावरच त्यांच्या हाती पैसे येणार असताना, महिन्याचा हप्ता आता आकारावा लागत आहे. शासनाने आणि रिझर्व्ह बॅँकेने सहकारी बॅँकांबाबत शेतकरीपूरक धोरणे आखण्याची गरज आहे, असे मत दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवंत आडमुठे यांनी व्यक्त केले.प्रश्न : सांगली जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी १० हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे, हे कसे शक्य झाले?उत्तर : सहकारी बॅँकांवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. ठेवींवर विमा आहे. राष्टÑीयीकृत बॅँकांच्या तुलनेत प्रत्यक्ष चांगली सेवा दिली जात आहे. राष्टÑीयीकृत बॅँकेत १५-१५ दिवस खाते उघडत नाहीत. नंतर १५ दिवसांनी चेकबुक मिळते. इथे आम्ही तासात खाते उघडून पुस्तक देतो. एक-दोन दिवसांत चेकबुक देतो. पॅनकार्ड आम्ही (सहकारी बॅँका) खर्च करून खातेदारांना काढून देतोय. तीन-तीन वर्षांचा आयकर परतावा आणि किचकट कागदपत्रे मागून गरजूंना हेलपाटे मारायला लावत नाही. गरजेच्या वेळी कर्ज देतो. त्यामुळे व्यवसाय आपोआप वाढू लागला.

प्रश्न : सध्या सहकारी बॅँकांपुढे कोणती आव्हाने आहेत?उत्तर : ठेवींवर सध्या सरासरी ९ टक्के व्याज द्यावे लागते. त्यामुळे कर्जाचा व्याजदर १२ ते १४ टक्के आकारावा लागतो. राष्टÑीयीकृत बॅँका ५ ते ७ टक्के व्याजदराने ठेवी घेतात. त्यामुळे ते ९ ते १० टक्के व्याजदराने कर्जे देतात. त्यामुळे मोठे कर्जदार राष्टÑीयीकृत बॅँकांना पसंती देतात. शसनाची सगळी खाती, सबसिडी खाती राष्टÑीयीकृत बॅँकेत आहेत. त्यामुळे त्यांना बिनव्याजी कोट्यवधींचा फंड मिळतो. सहकारी बॅँका ग्रामीण भागात जादा असल्याने नेट बॅँकिंग, मोबाईल बॅँकिंग, एटीएम सुविधा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. इंटरनेट सुविधा वेगवान मिळत नाही.शासनाकडून अपेक्षा काय?शासन आणि रिझर्व्ह बॅँक यापैकी एकाचेच सहकारी बॅँकांवर नियंत्रण हवे. दोघांचे बंधन सध्या आहे. दोघांचे नियम वेगवेगळे आहेत. दुहेरी नियंत्रण असल्याने अनेकदा काम करणे कठीण होते. एनपीएचा कालावधी १८० दिवसांचा करावा. सध्या एक लाखापर्यंत कर्ज जसे ई-कराराचा बोजा नोंदवून देता येते. तसे १० लाख कर्जापर्यंत देता यायला हवे. रजिस्टर मॉरगेज (गहाणखत)चा भुर्दंड कर्जदाराला पडणार नाही. नफ्यावरील आयकर १० टक्के असावा.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक