शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

भोजनातील सबठेकेदारी रद्द करणार

By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST

दिलीप कांबळे : वसतिगृहांसाठी जिल्हास्तरावरच निविदा काढण्यासाठी यापुढे प्रयत्न --लोकमतचा दणका

सांगली : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांना चांगला नाष्टा आणि जेवण मिळाले पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. पैसे खाण्याचे उद्योग बंद करून अधिकाऱ्यांनीही दर्जेदार जेवण न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देऊन, ठेकेदार स्वत: काम करीत नसेल आणि सबठेके देत असेल, तर त्यांचा ठेका त्वरित रद्द करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (सोमवारी) सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. राज्य आणि विभागस्तरावरून ठेका न देता जिल्हास्तरावरून जेवण पुरवठ्याची निविदा काढून गरजू बचत गटाकडे ते काम सोपविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, पुणे विभागातील ३७ वसतिगृहांना भोजन पुरविण्याचा ठेका मुंबई येथील एका कंपनीला दिला आहे. त्यांना प्रतिविद्यार्थी ४३०० रुपये दिले जातात. या रकमेतून पोषण आहार, जेवण, नाष्टा देण्याचे ठरले आहे. त्या कंपनीने पुन्हा उपठेका (सब कॉन्ट्रॅक्ट) दिले आहे. ते प्रतिविद्यार्थी ३२०० रुपये आहे. म्हणजे काहीही न करता मुख्य ठेकेदार महिन्याला लाखो रुपये उकळत आहे. सबठेकेदार विद्यार्थ्यांना चांगले जेवणही देत नाहीत. या ठेकेदारांच्या विरोधात पुणे विभागातून विद्यार्थ्यांसह पालकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी आहेत. ‘लोकमत’मधून आलेल्या बातम्यांची कात्रणेही माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. मागासवर्गीयांची वसतिगृहे म्हणजे कोणाला पोसण्यासाठी, मोठे करण्यासाठी नसून, गरीब मुलांना चांगले जेवण देण्यासाठी आहेत, याचे भान ठेवून अधिकाऱ्यांनीही ठेकेदारावर कठोर कारवाई करावी. यापुढे वसतिगृहातील ठेकेदारी कदापीही चालू देणार नाही. ठेकेदार सबठेकेदारीतून केवळ पैसेच उकळण्याचे उद्योग करीत असेल, तर त्यांचा ठेका तात्काळ रद्द करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. याचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. पुणे विभागातील सर्व वसतिगृहांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा ठेका आणि सबठेके कोठे-कोठे आहेत, याचा वस्तुनिष्ठ अहवाल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल. आठवड्याभरात संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्यादृष्टीने शासन निर्णय घेईल.अचानक तपासणीचा इशाराकांबळे यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहास अचानक भेट दिली. यावेळी वसतिगृहामध्ये स्वच्छता होती, जेवणही उत्तम पध्दतीचे होते. पण, हे केवळ आजच्या दिवसापुरतेच असणार, हे स्वत: मंत्री कांबळे यांनीच अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये चांगले जेवण मिळत नाही, विद्यार्थी-विद्यार्थिनींना चांगली वागणूक दिली जात नाही, याबद्दलच्या तक्रारी असल्याचे ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त दिलीप घाटे यांनी सांगितले. यातून अधिकारी, ठेकेदारांनी ‘आपण सुटलो’ म्हणण्याचे कारण नाही. आपण स्वत: अचानक जिल्ह्यातील वसतिगृहांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचा इशाराही कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिला.