शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

भोजनातील सबठेकेदारी रद्द करणार

By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST

दिलीप कांबळे : वसतिगृहांसाठी जिल्हास्तरावरच निविदा काढण्यासाठी यापुढे प्रयत्न --लोकमतचा दणका

सांगली : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांना चांगला नाष्टा आणि जेवण मिळाले पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. पैसे खाण्याचे उद्योग बंद करून अधिकाऱ्यांनीही दर्जेदार जेवण न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देऊन, ठेकेदार स्वत: काम करीत नसेल आणि सबठेके देत असेल, तर त्यांचा ठेका त्वरित रद्द करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (सोमवारी) सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. राज्य आणि विभागस्तरावरून ठेका न देता जिल्हास्तरावरून जेवण पुरवठ्याची निविदा काढून गरजू बचत गटाकडे ते काम सोपविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, पुणे विभागातील ३७ वसतिगृहांना भोजन पुरविण्याचा ठेका मुंबई येथील एका कंपनीला दिला आहे. त्यांना प्रतिविद्यार्थी ४३०० रुपये दिले जातात. या रकमेतून पोषण आहार, जेवण, नाष्टा देण्याचे ठरले आहे. त्या कंपनीने पुन्हा उपठेका (सब कॉन्ट्रॅक्ट) दिले आहे. ते प्रतिविद्यार्थी ३२०० रुपये आहे. म्हणजे काहीही न करता मुख्य ठेकेदार महिन्याला लाखो रुपये उकळत आहे. सबठेकेदार विद्यार्थ्यांना चांगले जेवणही देत नाहीत. या ठेकेदारांच्या विरोधात पुणे विभागातून विद्यार्थ्यांसह पालकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी आहेत. ‘लोकमत’मधून आलेल्या बातम्यांची कात्रणेही माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. मागासवर्गीयांची वसतिगृहे म्हणजे कोणाला पोसण्यासाठी, मोठे करण्यासाठी नसून, गरीब मुलांना चांगले जेवण देण्यासाठी आहेत, याचे भान ठेवून अधिकाऱ्यांनीही ठेकेदारावर कठोर कारवाई करावी. यापुढे वसतिगृहातील ठेकेदारी कदापीही चालू देणार नाही. ठेकेदार सबठेकेदारीतून केवळ पैसेच उकळण्याचे उद्योग करीत असेल, तर त्यांचा ठेका तात्काळ रद्द करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. याचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. पुणे विभागातील सर्व वसतिगृहांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा ठेका आणि सबठेके कोठे-कोठे आहेत, याचा वस्तुनिष्ठ अहवाल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल. आठवड्याभरात संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्यादृष्टीने शासन निर्णय घेईल.अचानक तपासणीचा इशाराकांबळे यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहास अचानक भेट दिली. यावेळी वसतिगृहामध्ये स्वच्छता होती, जेवणही उत्तम पध्दतीचे होते. पण, हे केवळ आजच्या दिवसापुरतेच असणार, हे स्वत: मंत्री कांबळे यांनीच अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये चांगले जेवण मिळत नाही, विद्यार्थी-विद्यार्थिनींना चांगली वागणूक दिली जात नाही, याबद्दलच्या तक्रारी असल्याचे ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त दिलीप घाटे यांनी सांगितले. यातून अधिकारी, ठेकेदारांनी ‘आपण सुटलो’ म्हणण्याचे कारण नाही. आपण स्वत: अचानक जिल्ह्यातील वसतिगृहांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचा इशाराही कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिला.