शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी

By admin | Updated: December 21, 2015 00:51 IST

अजित सूर्यवंशी : पुन्हा राज्यभरात आंदोलन उभारणार; पान दुकानदारांचा मेळावा

सांगली : सुगंधित तंबाखू विक्री करण्यावर राज्य शासनाने घातलेली बंदी तातडीने उठवावी, अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला. रविवारी पटेल चौकातील साने गुरुजी उद्यानमध्ये महापालिका क्षेत्रातील पान दुकानदारांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, १८ जुलै २०१३ पासून शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पान व्यवसाय अडचणीत आला आहे. पान दुकानदारांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा हा डाव आहे. राज्यातील ५० लाख पान दुकानदार व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाला सुगंधित तंबाखूवर बंदी आणायची असेल, तर जिथे या तंबाखूचे उत्पादन होते, तिथे बंदी आणावी. कायद्याचा आधार घेऊन अन्न, औषध प्रशासन व पोलीस विनाकारण पान दुकानदार व फेरीवाल्यांना त्रास देत असतील, तर आम्ही सहन करणार नाही. पोलिसांनी प्रथम जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, त्यानंतर सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करावी. जिल्हा पान असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, शासनाच्या गुटखा बंदीला पान दुकानदारांनी पाठिंबा दिला. पण आता सुगंधित तंबाखूवर घालण्यात आलेली बंदी ही अन्यायकारक आहे. शासन बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण पान व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. देशात आणि राज्यात दारु व सिगारेटमुळे लाखो लोकांचा बळी जात आहे. पण त्यावर बंदी घालण्यासाठी शासन पुढाकार घेत नाही. सुगंधित तंबाखूवर बंदी घालून, राज्यातील लाखो पान दुकानदार व फेरीवाल्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, शहर अध्यक्ष मयूर बांगर यांनीही मनोगत व्यक्त केले. खजिनदार राजू पागे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष युसूफ जमादार, कार्याध्यक्ष बाबू कारंडे, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, राजू खोत, प्रकाश मोरे, रफीक मुजावर, अफजल चाऊस, रावसाहेब सरगर, राजू फोंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविणार सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात प्रथम उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद, बोंबाबोंब, भीक मांगो व मोर्चा अशी टप्प्या-टप्प्याने आंदोलने केली जातील. यातूनही शासनाने तंबाखूवरील बंदी उठवली नाही, तर राज्य पातळीवर व्यापक आंदोलन उभे केले जाईल.