शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी

By admin | Updated: December 21, 2015 00:51 IST

अजित सूर्यवंशी : पुन्हा राज्यभरात आंदोलन उभारणार; पान दुकानदारांचा मेळावा

सांगली : सुगंधित तंबाखू विक्री करण्यावर राज्य शासनाने घातलेली बंदी तातडीने उठवावी, अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला. रविवारी पटेल चौकातील साने गुरुजी उद्यानमध्ये महापालिका क्षेत्रातील पान दुकानदारांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, १८ जुलै २०१३ पासून शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पान व्यवसाय अडचणीत आला आहे. पान दुकानदारांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा हा डाव आहे. राज्यातील ५० लाख पान दुकानदार व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाला सुगंधित तंबाखूवर बंदी आणायची असेल, तर जिथे या तंबाखूचे उत्पादन होते, तिथे बंदी आणावी. कायद्याचा आधार घेऊन अन्न, औषध प्रशासन व पोलीस विनाकारण पान दुकानदार व फेरीवाल्यांना त्रास देत असतील, तर आम्ही सहन करणार नाही. पोलिसांनी प्रथम जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, त्यानंतर सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करावी. जिल्हा पान असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, शासनाच्या गुटखा बंदीला पान दुकानदारांनी पाठिंबा दिला. पण आता सुगंधित तंबाखूवर घालण्यात आलेली बंदी ही अन्यायकारक आहे. शासन बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण पान व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. देशात आणि राज्यात दारु व सिगारेटमुळे लाखो लोकांचा बळी जात आहे. पण त्यावर बंदी घालण्यासाठी शासन पुढाकार घेत नाही. सुगंधित तंबाखूवर बंदी घालून, राज्यातील लाखो पान दुकानदार व फेरीवाल्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, शहर अध्यक्ष मयूर बांगर यांनीही मनोगत व्यक्त केले. खजिनदार राजू पागे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष युसूफ जमादार, कार्याध्यक्ष बाबू कारंडे, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, राजू खोत, प्रकाश मोरे, रफीक मुजावर, अफजल चाऊस, रावसाहेब सरगर, राजू फोंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविणार सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात प्रथम उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद, बोंबाबोंब, भीक मांगो व मोर्चा अशी टप्प्या-टप्प्याने आंदोलने केली जातील. यातूनही शासनाने तंबाखूवरील बंदी उठवली नाही, तर राज्य पातळीवर व्यापक आंदोलन उभे केले जाईल.