शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

खराब टायरींनी वाढविले शहराचे सौंदर्य, सांगली स्वच्छ करायचा युवकांनी घेतला वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:51 IST

गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.

ठळक मुद्देखराब टायरींनी वाढविले शहराचे सौंदर्यसांगलीनगरी स्वच्छ करायचा युवकांनी घेतला वसा

सांगली : गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.सांगलीत स्वच्छतेसाठी खूळ लागलेल्या काही तरुण पोरांनी एकत्र येऊन सांगलीनगरी स्वच्छ करायचा वसा घेतला आहे. राकेश दड्डण्णावर याने यात पुढाकार घेतला आहे. आज त्याच्याच धडपडीने सांगलीचे काही कोपरे, काही भाग माणसात आले आहेत. या युवकांनी एकत्र येऊन निर्धार संघटना या ग्रुपच्या माध्यमातून १ मे २०१८ महाराष्ट्र दिनापासून स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, कचरामुक्त सांगली या संकल्पनेचा निर्धार केला. स्वच्छता यात्रा सांगली हे अभियान प्रभागानुसार सुरू केले.

नागरिकांना आवाहन केलं, पण त्यांची वाट बघण्यात वेळ घालवला नाही. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता राकेश दड्डणावर आणि त्यांचे सहकारी सांगली शहरात दररोज एका ठिकाणी एखादा परिसर साफसफाई करताना दिसतात. त्यांचं हे स्वच्छता अभियान आता स्वच्छतेतून सुंदरतेकडे निघाले आहे.

राकेशचा ग्रुप आता सांगलीत स्वच्छ केलेले पॉईंट सुशोभित करण्याची मोहीम राबवतो आहे. त्यासाठी त्यांना हवे आहेत खराब झालेले टायर, झाडाचे बुंधे, रंग, ट्री गार्ड..आजपर्यंत त्यांच्याकडे ४० टायर जमा झालेत. ते रंगवायचं कामही जोरात सुरु आहे. या टायरमध्ये झाडी लावण्यात येणार आहेत. नारळाच्या झाडाचे बुंधेही रंगवायचे सुरु आहे. बऱ्याच प्लास्टिक बाटल्या पण सुशोभीकरणाच्या कमी येत आहेत. आम्हाला कचरा, भंगार द्या..आम्ही तोही सुंदर करू असं राकेश सांगत आहे

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली