शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

हमाल, शेतकºयांच्या पेन्शनसाठी लढा उभारू :  बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:15 IST

राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.

ठळक मुद्देसांगलीत हमाल, माथाडी कामगारांचा मेळावाजेल भरो आंदोलनाचा आढाव यांचा इशाराबीड येथे २५ व २६ नोव्हेंबर रोजी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन

सांगली : राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केले.

सांगलीत हमाल, मापाडी, हळद महिला कामगारांचा मेळावा व ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांना गाडी प्रदान समारंभ असा संयुक्त कार्यक्रम झाला, यावेळी डॉ. आढाव बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, महामंडळाचे सहचिटणीस राजकुमार घायाळ, माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ उपस्थित होते.

आढाव म्हणाले की, आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, पण कष्टकºयांना पेन्शन नाही. हमालांना पेन्शन लागू करण्याची मागणी होत आहे. आता केवळ हमालांपुरतीच लढाई हाती घेतली जाणार नाही, तर या लढ्यात शेतकरी, शेतमजुरांनाही सहभागी करून रस्त्यावरची लढाई हाती घेतली जाईल. त्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा. राज्यातील सर्व तुरूंग कष्टकºयांनी भरले पाहिजेत. मग पेन्शनची मागणी धुडकाविण्याची हिम्मत राज्यकर्त्यांना होणार नाही.

हमाल पंचायतीने अनेक वर्षे लढा देऊन बºयाच मागण्या मान्य करून घेतल्या. पण आता त्याच्या मुळावरच सरकार उठले आहे. जातपात, धर्म, स्त्री, पुरूष असे भेद विसरून तुम्ही एकत्र येऊन न्याय मिळविला आहे. तसाच लढा शेतकºयांनीही उभारला आहे. त्यांना केवळ कर्जमुक्ती देऊन चालणार नाही, तर शेतीमालाला हमीभाव देण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाने स्वीकारली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पतंगराव कदम म्हणाले की, सांगली बाजार समितीत हमाल, व्यापारी, संचालक मंडळात कुठलाही तंटा नाही. त्यामुळे राज्यात सांगली बाजार समितीने पहिला क्रमांक मिळविला आहे. हमालांची पेन्शनची मागणी रास्त आहे. शेतकºयांसोबत हमालांनाही पेन्शन मिळाली पाहिजे. सरकारला धडा शिकविल्याशिवाय ते हलत नाही. त्यामुळे हा प्रश्न धसास लावण्यासाठी सर्वांनी एकत्र पुढाकार घेऊया.

बापूसाहेब मगदूम म्हणाले की, वयाच्या पंधराव्या वर्षापासून कष्टकºयांच्या लढ्यात सहभागी झालो. कष्टकºयांना पेन्शन मिळाल्याशिवाय थांबणार नाही. डिसेंबरमध्ये शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी यांची एकत्रित परिषद घेणार आहोत. राजकुमार घायाळ म्हणाले की, कष्टकºयांनी लढा देऊन जे मिळविले, ते काढून घेण्याचे शासनाचे धोरण आहे.

गोवा, राजस्थान, दिल्लीत हमालांना पेन्शन दिली जाते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. यावेळी प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत शेजाळ, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांचीही भाषणे झाली.

हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, बाजार समितीचे सचिव पी. एस. पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, गोविंद सावत, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, श्रीमंत बंडगर, शालन मोकाशी, बजरंग खुटाळे, वसंत यमगर, बाबासाहेब गडदे उपस्थित होते.लोकांचे नव्हे, धर्माचे राज्यडॉ. बाबा आढाव यांनी केंद्र व राज्य शासनावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, लाल झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही लढा दिला. आता तोच झेंडा, समाजवाद काढून टाकण्याची भाषा केली जात आहे. लाल झेंडा गेला, तर कष्टकºयांचे काहीच चालणार नाही. सध्या देशात उलटे वारे वाहू लागले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर घाव घातला जात आहे. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात जात, धर्म आडवे येत आहेत. लोकांचे नव्हे, तर धर्माचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली.

बीडला अधिवेशनराज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी बीड येथे होत आहे. या अधिवेशनाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पणनमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.