शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऐवज- वाचावे असे काही

By admin | Updated: February 17, 2017 01:10 IST

जगातील भाषांतील गाजलेली आत्मकथनेच खरा साहित्यिक ऐवज.

माणूस जगण्यासाठी खातो आणि सुसंस्कृत, प्रगल्भ होण्यासाठी वाचतो. सकस अन्न शरीराला पुष्ट करते म्हणून चौरस आहारास पौष्टिक मानले जाते. तसे आपले वाचनही चतुरस्र हवे. ते आपणास चतुर, व्यासंगी बनविते. वाचनात निवड हवी. सारासार विवेक हवा. भारंभार प्रकाशित होण्याच्या आजच्या काळात मी असे पाहतो आहे की, माणसे वाचनाऐवजी पाहण्यात वेळ वाया घालवितात. चॅटस्, मॅसेजिस, क्लिप्स, कोटेशन्स, पिक्चर्स, मेल्स्, आदी मोबाईल्स, संगणकावरील हवीहवीशी वाटणारी सामुग्री, क्षणिक महत्त्वाची खरी, पण क्षणाक्षणाने दिवस निघून जातात आणि मन आणि मेंदू रिकामाच राहतो. क्षणिक रंजनाने माणूस नाही घडत. सातत्यपूर्ण वाचन, विचार आणि आचारांतून माणूस आकारतो. महाराष्ट्र संस्कृतीचे एक वैशिष्ट्य तुम्हास कुठल्याच राज्यात, राष्ट्रात पाहता येणार नाही, ते म्हणजे आपले ‘दिवाळी अंक!’ मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या प्रांगणात दिवाळी अंकाची परंपरा सन १९०९ मध्ये सुरू झाली. त्यालाही पाहता पाहता शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली. ‘मनोरंजन’ नावाचे एक मासिक त्यावेळी निघत असे. त्याचे संपादक होते काशिनाथ रघुनाथ मित्र. तो पहिला-वहिला अंक माझ्या संग्रही आहेच. शिवाय ‘मौज’ मासिकाचा सन १९२४चा दिवाळी अंकही. वृत्तपत्रे, नियतकालिकांचे पहिले अंक म्हणजे आपला सांस्कृतिक ठेवा, ऐवजच ना! संगीतात ठेवणीतल्या रागदारीस ‘चिजा’ म्हटले जाते, असे किती ऐवज, चिजा मजकडे आहेत म्हणून सांगू? ‘दैनिक केसरी’ पहिला अंक (मंगळवार, दि. ११ जानेवारी १८८१), ‘दैनिक मराठा’ पहिला अंक (गुरुवार, दि. १५ नोव्हेंबर १९५६), ‘मासिक मौज’ (दिवाळी अंक १९२४), ‘मासिक सत्यकथा’ पहिला अंक (नोव्हेंबर १९३३), साप्ताहिक सोबत पहिला अंक (मे १९६६), माणूस मासिक पहिला अंक (जून १९६१) असे कितीतरी. शिवाय हे दिवाळी अंक विशिष्ट काळानंतर आपल्या अंकातील निवडक साहित्याचे विशेष अंक, संस्मरणीय ग्रंथ प्रकाशित करीत असतात. असे ‘निवडक अबकडइ’ (रौप्यमहोत्सवी २०१२), ‘श्री दीपलक्ष्मी क्लासिक्स’ (निवडक - १९५८-२०००), ‘ऐवज’ (ऋतुरंग दिवाळी - १९९३-२००९) ही माझ्या संग्रही आहेत. खरे तर या सर्वच अंकांबद्दल लिहायला हवे. पण, आज मी फक्त ‘ऐवज’बद्दलच तुम्हास सांगायचे ठरविले आहे. ‘ऋतुरंग’ दिवाळी अंक मराठी दिवाळी अंक परंपरेत सन १९९३ मध्ये दाखल झाला. त्याचे संपादक आहेत अरुण शेवते. मूळ कवी मनाचा हा मित्र मनुष्य वेल्हाळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्यांनी व्यक्तिचित्र, नाटक, लेख लिहिले, तरी त्यांचा मूळ पिंड संपादकाचाच. ‘हाती ज्यांच्या शून्य होते’, ‘नापास मुलांची गोष्ट’, ‘मद्य नव्हे मंतरलेले पाणी’, ‘रंगल्या रात्री’, ‘मला उमगलेली स्त्री’ ही त्यांच्या दिवाळी अंकाची नंतर झालेली पुस्तके. त्यांचा प्रत्येक दिवाळी अंक नंतर ग्रंथ म्हणून प्रकाशित होतो. कारण तो एका विषयावर अनेकांना लिहिते करतो. ही अरुणची किमया! अरुण शेवते यांनी कुणाकुणाला लिहिते केले सांगू? अमृता प्रीतम, सोनिया गांधी, एम. एफ. हुसेन, गुलजार, बेगम परवीन सुलताना, यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, दीप्ती नवल, किशोरी अमोणकर, सुशीलकुमार शिंदे, बाबासाहेब पुरंदरे, ना. धों. महानोर, डॉ. रघुनाथ माशेलकर, शबाना आझमी आणि कित्येक़ मराठीत लिहिलेले भारतीय सेलेब्रिटी अशी सूची कुणाला तयार करायची, तर ऋतुरंग दिवाळी १९९३ ते २०१७ ची नुसती अनुक्रमणिका डोळ्याखाली घातली तरी सूची तयार!‘ऋतुरंग’चा ‘ऐवज’ ग्रंथ (२०१०) म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, संगीत, राजकारण, पत्रकारिता, आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवडक आत्मकथनांचा संग्रह होय. अरुण शेवते त्यांना कळायला लागल्यापासून दोनच कामे करतात. मे ते आॅक्टोबर अंक विषय निश्चित करणे, लेखकांना भेटणे, त्यांच्याकडून लिहून घेणे, जाहिराती मिळविणे व अंक वेळेत तयार करणे. नोव्हेंबर ते एप्रिल अंक वितरण, जाहिरात वसुली, अंकास ग्रंथरूप देणे, असा यांचा ऋतु आणि रंग एकच, तो म्हणजे दिवाळी. आहे की नाही गंमत? कोणत्याही गोष्टीचा नावलौकिक लीलया कधीच होत नसतो. त्यामागे असतात माणसाचे कष्ट, चिकाटी, चिंतन!गुलजार अरुण शेवते यांना लेखन तर देतातच; पण न विसरता दिवाळी भेटही देतात. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या प्रत्येक अंकात लिहितात. मंगेश पाडगावकर-हा अरुण शेवते नावाचा भन्नाट माणूस काही न करता (नोकरी वा अन्य उद्योग!) ‘दिवाळी अंक एके दिवाळी अंक’ जगतो म्हणून.... सांस्कृतिक, सामाजिक कार्य करतो, म्हणून मानधन घेणे नाकारतात. विठाबाई नारायणगावकर अंगात फणफणता ताप असताना फडाफड फडातल्या रात्री जाग्या करते. यमुनाबाई वाईकर तासभर बोलून टेप बंद होता लक्षात आल्यावर आनमान न करता परत ‘वन्समोअर’ बोलत राहतात. हे सर्व अशक्य ते शक्य होते. शेवतेंच्या सायासामुळे, जिद्द, चिकाटीमुळे.एकदा अरुण शेवते ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा एक लेख वाचत होते. त्यांना वाचताना लक्षात आले की, महात्मा गांधी एकदा परीक्षेत नापास झाले होते. झाले दिवाळी अंकाचा विषय ठरला. ‘नापास मुलांची गोष्ट’ (२००४). कोणकोण नापास विद्यार्थी मिळाले माहीत आहे? - इंदिरा गांधी, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, आर. के. लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. नरेंद्र जाधव, अमिताभ बच्चन, व्ही. शांताराम, दादा कोंडके, नेल्सन मंडेला, डॉ. अनिल अवचट, डॉ. अच्युत गोडबोले, अभिनेते गणपत पाटील, डॉ. श्रीराम लागू, किशोरी अमोणकर या थोरामोठ्यांची यादी वाचून आता मला ‘मी पण नापास झालो होतो’ हे सांगायला लाज वाटत नाही. ‘ऐवज’मध्ये मैत्र जिवाचे, सहजीवन, मला उमगलेली स्त्री, माझं घर, मी व माझे मद्यपान, एकच मुलगी (ज्यांना एक मुलगी झाली तरी त्यांनी दुसरे अपत्य जन्माला घातले नाही, अशांची आत्मकथने), सिनेमाचे दिवस, रंगल्या रात्री, स्वप्नी जे देखिले, प्रेमस्वरूप आई, मनातला पाऊस, नातेसंबंध, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अविस्मरणीय दिवस, माझं जगणं, माझी भूमिका, यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर दया पवार, मेघना पेठे, प्रा. मे. पु. रेगे, बाबा कदम, रवींद्र पिंगे, कुमार केतकर, दिनकर रायकर, निळू फुले, आर. आर. पाटील (आबा), सुरेखा पुणेकर, देव आनंद, रामदास भटकळ, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, डॉ. सदानंद मोरे, प्रभृती मान्यवरांचे लेख वाचायला मिळतात आणि आपले जगच बदलून जाते. जीवन बदलायचे तर बाह्य जग समजून घ्यायला हवेच.मराठी आत्मकथनात्मक साहित्य भारतीय भाषातील श्रेष्ठ मानले जात असले तरी जगातील भाषांतील गाजलेली आत्मकथनेच खरा साहित्यिक ऐवज. ‘द डायरी आॅफ यंग गर्ल’(अ‍ॅनाफ्रँक), ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ (नेल्सन मंडेला), ‘माय लाईफ’ (इझाडोरा डंकन), ‘जखन छोटो चिलो’ (सत्यजित राय), ‘कन्फेशन’ (लिओ टॉलस्टॉय), ‘द वर्ड’ (ज्या पां सार्त्र), ‘अप फ्रॉम स्लेव्हरी’(बुकर ही वॉशिंग्टन) ही आत्मकथने वाचली नसली तरी मिळवून वाचा.---- डॉ. सुनीलकुमार लवटे(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत)