शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आटपाडीचा पाऊस सरासरी ३0 दिवसांचा --दुष्काळाचे दुष्टचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:09 IST

या पावसाचा कसलाच उपयोग नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कोरड्या पावसाळ्यांना या भागाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे कोरडेपणाच : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कधीही घेतले नाही पूर्ण क्षमतेने उत्पादन

अविनाश बाड ।आटपाडी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशात चार ऋतू मानले आहेत. उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा आणि हिवाळा. यापैकी पावसाळा आणि परतीचा मान्सून हे दोन ऋतू एकत्र करून आटपाडी तालुक्यातील पर्जन्यवृष्टी मोजली जाते. गेल्या ६६ वर्षात या दोन ऋतूत सरासरी फक्त ३० दिवस पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमान ३५५ मि.मी. म्हणजे तालुक्यात पडणाºया पावसाच्या दिवशीही सरासरी ११ ते १२ मि.मी. पाऊस पडतो. या पावसाचा कसलाच उपयोग नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कोरड्या पावसाळ्यांना या भागाला सामोरे जावे लागत आहे.

आटपाडी तालुक्यात जून ते आॅक्टोबर असा दोन्ही ऋतूंचा एकत्रित पाऊस मोजला जातो आणि त्याची सरासरी ३५५ मि.मी. एवढी आहे. दि. १५ जून ते १५ जुलै हा खरीप हंगामाचा पेरणीचा काळ आहे. पण गेल्या ६६ वर्षात जून आणि जुलै महिन्यात सरासरी फक्त ११ ते १२ दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. वर्ष-वर्ष पाण्यासाठी तहानलेच्या जमिनीची तहान या तुरळक पावसाने कधीही भागत नाही. मोठ्या पावसाचे प्रमाण नेहमी कमी असते. त्यामुळे ओढे, नाले न वाहिल्याने आणि पेरणी करण्याएवढी सुद्धा ओल न झाल्याने वर्षानुवर्षे खरीप हंगाम इथे यशस्वी झालेला नाही. ज्यावर्षी पेरणी झाली, त्यानंतर पावसात मोठा खंड पडल्याने उगवलेली पिके वाळून गेली. त्यामुळे इथला शेतकरी कधीही खरीप हंगामाचे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेऊ शकला नाही.

१९५३ पासून २०१८ पर्यंत जून ते आॅक्टोबर या महिन्यात २००६ दिवस तालुक्याला पावसाने तोंड दाखविले आहे. म्हणजे सरासरी ३० ते ३१ दिवस पावसाने दरवर्षी या पाच महिन्यात हजेरी लावली. वाईट म्हणजे यामध्ये एक मि.मी. ते ५ मि.मी. पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. या पावसाचा तापमान कमी करण्याशिवाय काहीच उपयोग होत नाही. या पावसाचा ना शेतीला, ना भूजल पातळी वाढण्याला कसलाही उपयोग होत नाही.३७ वर्षात मोठा पाऊस नाही!१९८१ मध्ये आटपाडीत ८२२ मि.मी. पाऊस झाला. त्यावर्षी दि. २२ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १६६ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर सलग ५ वर्षे दुष्काळ पडला. गेल्या ३७ वर्षात एका दिवशी तर नाहीच, पण एका वर्षातही एवढा सरासरी पाऊस झाला नाही. १९८१ पूर्वी १९६८ मध्ये ९२४, तर १९६२ मध्ये ८९६ मि.मी. पावसाची नोंद आहे. गेल्या ६६ वर्षात फक्त तीन वर्षे विक्रमी पाऊस झाला. उर्वरित पावसाळे कोरडेच.आटपाडी की जैसलमेर?देशात सर्वात कमी पाऊस राजस्थानातील जैसलमेर येथे वार्षिक सरासरी १२० मि.मी. एवढा पडतो. आटपाडी तालुक्याने अनेकवेळा जैसलमेरएवढा पाऊस अनुभवला आहे. १९७२ मध्ये तालुक्यात फक्त १० दिवस पाऊस आला. त्यावर्षी १६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २००२ मध्ये २७ दिवस पाऊस येऊनही खरसुंडीत ११७ मि.मी., तर तालुक्यात १७१ मि.मी., २००३ मध्ये खरसुंडीत १११ मि.मी., तर तालुक्यात १२३ मि.मी. आणि २०१८ मध्ये आटपाडीत १२५ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीFarmerशेतकरी