शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

मिरजेत पाणी योजनांंवरून अधिकारी धारेवर

By admin | Updated: February 9, 2015 23:56 IST

चौकशीसाठी समिती : पंचायत समिती सभेत सदस्यांचा सभात्याग

मिरज : मिरज तालुक्यातील भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल पाणी योजनांच्या अपूर्ण कामांबद्दल आज (सोमवारी) जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यास सदस्यांनी धारेवर धरले. जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यापेक्षा ठेकेदारांना पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप करीत, कार्यकारी अभियंता एस. जी. सादिलगे यांचा निषेध करीत सदस्य सतीश निळकंठ यांनी सभात्याग केला. शिंदेवाडी पाणी योजनेवरून सदस्यांतही वादावादी झाली. तालुक्यातील अपूर्ण पाणी योजनांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला.मिरज पंचायत समितीची सभा सभापती दिलीप बुरसे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती तृप्ती पाटील, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुक्यातील भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अपूर्ण कामांवरुन सभेत जोरदार खडाजंगी झाली. सिध्देवाडी येथील भारत निर्माण योजनेचे काम पूर्ण असल्याचे सांगितले जाते. योजना पूर्ण असताना जलशुध्दीकरणाची व्यवस्था न करता तलावातून दूषित पाणीपुरवठा का केला जातो, असा सवाल सतीश निळकंठ यांनी केला. या योजनेतून सात वर्षात शुध्द पाणी मिळत नाही, कागदोपत्री खर्च दाखवून निधी हडप केल्याने या योजनेवर खर्च करण्यात आलेला १ कोटी ३० लाखांचा निधी पाण्यात गेल्याचा आरोपही केला. हा प्रश्न आपल्या शिंदेवाडीत सुरु असलेल्या पाणी योजनेचा असल्याचा समज झाल्याने सदस्य शंकर पाटील यांनी, आमच्या गावाच्या योजनेच्या प्रश्नावर कोणी चर्चा करायची नाही, असे बजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निळकंठ, बाबासाहेब कांबळे व पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. पाटील यांच्या वक्तव्यावर सभापती दिलीप बुरसे यांनीही आक्षेप घेतला. शिंदेवाडी योजनेचा वारंवार उल्लेख झाल्याने वाद टोकाला पोहोचला.मल्लेवाडी योजनेच्या कामाचे अद्याप मूल्यांकन नसताना, बिले काढण्याचा प्रशच्न येत नाही, मग बिले काढण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकनाथ नागरगोजे यांच्यावरील कारवाईवर निळकंठ व कांबळे यांनी आक्षेप घेतला. आठ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असताना बिले अदा केली जात आहेत. ठेकेदारांना पाठीशी घालून तालुक्यातील पाणी योजनांची वाट लावण्यास सादिलगे कारणीभूत असून त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगत निळकंठ यांनी सभागृह सोडले. राणी देवकारे यांनी टाकळी-बोलवाड योजनेच्या चाचणी काळातील वीज बिलाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी तालुक्यातील अपूर्ण व वादग्रस्त पाणी योजनांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. सभेस अधिकाऱ्यांनीच उपस्थित राहावे, प्रतिनिधींना येण्यास मज्जाव केला जाईल, असे सभापती बुरसे यांनी सांगितले. चर्चेत अशोक मोहिते, प्रवीण एडके यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)सभापतींनी कामाचा अहवाल मागविलामिरज तालुक्यातील भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजेल योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा निधी व कामाच्या मूल्यांकनाची माहिती मागूनही देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असा आदेश सभापती बुरसे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठरावखंडेराजुरी आरोग्य केंद्राबाहेर महिलेच्या प्रसुतीच्या कारणावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. शासनाकडून उपलब्ध असणाऱ्या औषधांचा वापर न करता औषधे विकत आणण्यास सांगितली जात आहेत. तक्रारीमुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची खंडेराजुरीतून बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.